स्पर्धक क्रमांक ८ गायत्री दीपक घाडगे नंदुरबार - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ८ गायत्री दीपक घाडगे नंदुरबार

राजा शिवछत्रपती 

        हे हिंदु नृसिंह प्रभो शिवाजी राजा, बांध के पगडी जब शिवाजी महाराज तयार होते, उठाकर तलवार जब घोडे पे सवार होते, झुकते सब अल्ला के बंदे और केहते काश हम भी मराठा होते....!! 
        ३०० किलोमीटर लांबीची भिंत बांधायला १५० वर्षे लागली, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची लांबी ४००० किलोमीटर भरेल. चीनच्या भिंतीला जग आश्चर्य मानतं तर मग हे काय आहे..? ब्रिटिश लोकं ओम (🕉️) या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम (🕉️) म्हटल्याने शरीरात उर्जा निर्माण कशी होते, खर तर संशोधन हे 'छत्रपती शिवाजी महाराज' या नावावर करायला हवं, कारण हे नाव घेताचं अंगावर काटा येतो, ह्रदयाचे ठोके वाढतात, छाती अभिमानाने फुलते असे का..? 
१२ महिने 
११ खेळाडू 
१० बोटे 
९ ग्रह 
८ दिशा 
७ आश्चर्य 
६ संवेदना 
५ महासागर 
४ वेद 
३ ऋतू 
२ डोळे 
आणि फक्त १ शिवबा....
फार वर्षांपूर्वी महाराष्ट्राची भूमी ही दंडकारण्य म्हणून ओळखली जायची, पण जस जशी भूमीवर कला,विद्या,शास्रे,संस्कृती रुजू लागली तस तशी दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. महाराष्ट्राच्या वैभवाची बातमी दिल्ली पार पोहचली आणि महाराष्ट्राला जणू नजरच लागली. भूमीवर सुलतानी सत्ता राज्य करु लागल्या. गुलामीचे, हालाखीचे जीवन सुरू झाले. प्रजेत छळ व निराशा पसरू लागली. 
        अशा वातावरणात दि. १९ फेब्रुवारी १६६० या शुभ दिवशी किल्ले शिवनेरी वर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वडिल शहाजीराजे व मातोश्री जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबा मोठे होऊ लागले. 
        १६ मे १६४० रोजी शिवबा व सईबाई निंबाळकर यांचा विवाह झाला. २७ एप्रिल १६४५ मध्ये दुर्गदुर्गेश्वर श्रीमंत किल्ले रायगडावर रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ७ मार्च १६४७ रोजी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. याच प्रमाणे असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्यात येऊ लागले. १४ मे १६५७रोजी महाराणी सईबाई यांच्या पोटी शंभूबाळ राजे जन्माला आले. १० नोव्हेंबर १६५९ मध्ये अफजलखानाचा वध केला तसेच सिद्धी जोहर, शाहिस्तेखान सारख्या संकटावर मात केला. स्वराज्य अभिमानाने वाढू लागले. ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. जनतार्दनाने शिवरायांना 'जाणते राजे' हा किताब बहाल केला. 
        जिजाऊंचे स्वप्न साकार झाले. हिंदवी स्वराज्याची स्थापना बघून मातेच्या डोळ्याचे पारणे फेडले. १७ जून १६७४ जिजामातांच्या कर्तव्यने त्या इतिहासात अमर झाल्या. 
        शिवरायांचे वैभवी राज्य म्हणून 'स्वराज' सर्वत्र ओळखले जाऊ लागले. परंतु अखंड परिश्रमाने, दगदगीने महाराजांची प्रकृती बिघडू लागली. आता आपले फार दिवस नाही राहिले नाहीत हे त्यांनी ओळखले. महाराजांनी सर्वांना जवळ बोलवून घेतले, '' आम्ही गेल्यावर सर्वांनी एका दिलाने या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करावे, हिच आमची शेवटची इच्छा आहे ''. ऐवढे बोलून शिवरायांनी डोळे मिटले ते कायमचेच .... तो दिवस म्हणजे ३ एप्रिल १६८० शिवरायांनी स्वर्गारोहण केले. 
     अशा शिवप्रभुंच्या चिंरतन स्मृतीला आमचे लाख, लाख प्रणाम....
 
जय शिवराय
Previous article
Next article

3 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads