Blog
स्पर्धक क्रमांक १० सविता बारवकर पिंपरी चिंचवड
झाले बहु, होतील बहु परी न ऐसा राजा होणे नाही. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी दाखवलं त्या वीर माता जिजाऊ दैवताला माझा त्रिवार मुजरा. प्रत्यक्ष आई भवानीचा शुभ आशिष त्यांना लाभला. माता जिजाऊ त्यांनी एक स्वप्न पाहिलं ते म्हणजे हिंदवी स्वराज्य नर्माण करण्याचं. आणि माझ्या राजान
ते साकारलं.
निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी.
दक्षता, कणखरता, आणि तत्परता
असा स्थायीभाव असलेल्या. छत्रपतींच्याशब्दकोशात आळस हा नव्हताच उत्साह होता, चंचलता नव्हती. निग्रह होता. मोह नव्हता. ममता होती, असा हा माझा थोर पराक्रमीराजा होता.
शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले.
राजांचे बालपण अति संस्कारित घडले. लहानपणीच बालमनावर शूरवीरांच्या कथा कोरल्या गेल्या. रामायण ,महाभारत यातील आध्यात्मिक संस्कार बाल मनावर कोरले. गेले यामधूनच राजांना न्याय नीतिमत्ता, दक्षता ,निर्णय क्षमता ,अशा गुणांचा विकास होत गेला. दिवसागणिक राजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवलं जात होत.घडवले जात होतं ,अन्यायाविरुद्ध चेतवल जात होतं , आई बहिणींची. किंमत कशी करायची सन्मान कसा द्यायचा हे बाल मनावर कोरलं जात होतं. लहानपणापासून युद्धाचे धडे आणि जुलमी सत्तेविरूद्ध लढण्याची तयारी राज्यामध्ये ठासूनभरण्याचं काम लहानपणी झालं. पुढे जाऊन राजांनी एकेक मावळा गोळा करत. दऱ्याखोऱ्यातून बारा बलुतेदारांच्या मधून. एक एक हिरा गोळा केला. आणि प्रत्येक हिऱ्याला एक विशिष्ट मानसन्मान देऊन हिंदवी स्वराज्याच्या निर्मिती साठी तयार केलं. सर्व गुणवंतांना सैन्यात प्रवेश दिला कडक शिस्त ठेवण्यास सांगितली. दुष्टांचा काळ पण गरिबांचा कनवाळू सिकंदर. रयतेस पोटच्या पोराप्रमाणे सांभाळू लागले राजांची एक एक युद्ध शैली, गनिमी काव्याचं तंत्र राज्यांनी खूप छान पद्धतीने वापरलं.. जुलमी सत्तेला शह देत राजांनी अनेक गड किल्ले आपल्याकडे करून घेतले त्यामध्ये कित्येक मावळे कामी आले कित्येक मावळे अमर झाले अशा या राजांचा इसवी सन स1674मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला संपूर्ण रयतेला छत्रपती मिळाला .राज्यकारभार चालविण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केली आरमार व्यवस्था सुयोग्य कर गडकिल्ले सुरक्षा विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे न्यायाच्या कामात कोणाची भिड न धरणारे दुष्टांचा काळ गरिबांचा कनवाळू अशा या राजाची प्राणज्योत अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर मालवली कर्तृत्वाने आणि पराक्रमाने माझेराजेछत्रपती म्हणून अनंत काळासाठी अजरामर झाले......... अशा या माझ्या छत्रपतींचा जय जयकार असो त्रिवार जय जयकार असो
जय जय जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
धन्यवाद.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा