स्पर्धक क्रमांक ६६ भारती राजू बोरे बुलढाणा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ६६ भारती राजू बोरे बुलढाणा

राजा शिवछत्रपती निबंध

शिवरायांचा जन्म  19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊ चा पोटी जुन्नर तालुकातील शिवनेरी गडावर झाला. त्याच्या आईचे नाव जिजामाता तर वडिलाचे नाव शहाजीराजे भोसले     असे होते.शहाजीराजे हे त्याकाळी   सरदार म्हणून कार्यरत होते.शिवरायांचे बालपण हे अति सस्कारित असे घडले होते.बालपणी सर्व वर्षी ही नितिमत्त राजव्यवस्था, युद्धकला, गनिमि कावा आणि घोडेस्वरी शिकणयात गेली.कधीकधी आसपास राहणारी मावळयची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवगडी होते.माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरूषाचा कथा बाल शिवाजीना सागर असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणी शिवाजिचा अंगी बाणवले गेले.शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळालास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत.शिवरायांचे लग्न लहानपणी झाले होते.जिजाऊनी फलटनचा नाईक निबाळकर घराण्यातली सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केली.शिवराय मोठे होताना त्यांना परकिय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होते.त्त्यामुळे त्यानी रायरेश्वराचा मदिरात स्वराज निर्मीतिची प्रतिना घेतली.आदिलशाह, निजामशाही आणि मुगल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागनार होते.स्वराज निर्मितीचा मुहुर्तमेढ म्हणून त्यानी किल्ले तोरना अत्यंत लहान वयात जिकला,अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.अफजलखिन वध, शायीस्ते खानाची बोटे कापणे या प्रसगातून त्याचा पराक्रम दिसून येतो.स्वकीय शत्रूना देखिल शिवरायानी चांगलाच धडा शिकवला.याव्यतिरिक्त पुरंदर तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका.या विकट प्रसगात संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.शिवरायांना स्वराज निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांची सोबतीने प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायासाठी पर्यायाने स्वराज साठी प्राणाचे मोल चुकवले.तानाजी मालुसरे, बाजिप्रभू देशपाडे , प्रताबराव गुजकर व मुरारबाजी ही शूरवीर तर स्वराज्या साठी धारातीर्थी पडले.इ.स 1674 मध्ये शिवरायांचा राज्यभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रतील रयतेन राजा छत्रपती मिळाले होते. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडल स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवला. शिवाजीराजे असताना त्याच्या पाठिमागे त्याचा मुलगा छत्रपति संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याचा शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपति शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तानी  शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते. छत्रपति शिवाजी महाराजची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वस घेतला.

3 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads