स्पर्धक क्रमांक १११ ऋतुजा विश्वनाथ जोगडे रायगड - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक १११ ऋतुजा विश्वनाथ जोगडे रायगड

राजा शिवछत्रपती

 'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,अखंड महाराष्टाचे कुलदैवत ,गरिबांचा
 कैवारी ,दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणजेच आपल्या सर्वांचे आधारस्तंभ राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज !
        "झाले बहू !होतील बहू !आहेतही बहू !परंतु यासम हाच ,हे वर्णन ज्यांना चपलखपणे लागू होते. ते म्हणजे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत 'राजे छत्रपती शिवाजी महाराज ',अशा या शूरवीराचा जन्म '१९ फेब्रुवारी १६३० 'या दिवशी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ शिवनेरी किल्ल्यावर झाला .आणि तो सोन्याचा दिवस उजाडलाच  खरा ,तर शिवनेरीच्या नखरखान्यात सनई -चौघडा वाजू लागला ,किल्ल्यावर आनंदी -आनंद झाला .शिवाई देवीच्या आशिर्वादाने बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
         मुखी आनंदाचे हसू उमटू लागले ,आणि या माझ्या राजाची "वीरमाता जिजाई "काही सामान्य स्री नव्हती ,तर ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढय सरादाराची कन्या आणि शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती ,'जिजाबाईंनी मनाशी निश्ययच केला होता कि " माझा शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही ,तर तो आपल्या लोकांचे राज्य अर्थात् स्वराज्य स्थापन करील "आणि याच विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या .
          अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायानी आपल्या सवंगड्यासह शपथ घेतली.महाराज म्हणाले,-" गड्यांनो! आपला मार्ग ठरला,आपल्या ध्येयासाठी आपण सर्वानी झटायाचे ,प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे;आणि आपले ध्येय म्हणजे "हिंदवी स्वराज्य "!परक्यांची गुलामी आता नको ,उठा !या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू .
         'सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले ,रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा  केली ,पण केवढे अवघड कार्य होते ते.'दिल्लीचा मुघल बादशाह ,विजापुरचा अदिलशाही सुलतान,गोव्याचे पोर्तुगीज  आणि जंजिरा चा सिद्दी 'अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हूकमत गाजवत होत्या ,या सत्तांचा दरारा खूप मोठा होता,त्यांच्याविरूध्द एक शब्द बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती .अशा बिकट परिस्थितित माझ्या शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता.कुठे शत्रुच्या फौजाचे अफाट बळ आणि कुठे शिवाजीराजांच्या सवंगडयाचं अल्प बळ! पण शिवरायांचा निश्यय अढळ होता,आणि त्यातूनच बळ निर्माण झाले.
        तोरणागडावर महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले .शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम म्हणजे धिप्पाड देहाचा सरदार अफजलखान याच्याशी केलेली झटापट .त्या अफजलखानास वाटले कि या 'अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद !हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो |आपण जावे आणि एका भेटीत त्याला चिरडून टाकावे ,पण त्या धिप्पाड देहाला काय माहित कि ,माझा शिवबा " शेरास सव्वाशेर " आहे तो .अफजलखानास ठार केले ,आणि हि बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला ,शिवरायांनी हां हां म्हणता विजापूरचा सर्वात सरदारास धुळीस मिसळवला ,शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले ,त्यांच्या परक्रमाचे पोवाडे कडेकपारीत घुमू लागले.
         त्या नंतर मुघल सत्तेचा शायिस्तेखान् याची बोटे उडविली ,मुघल सत्तेला बसलेला हा तडाखा जबरदस्त होता.शिवराय फत्ते होवून आले ,तोफा उडाल्या.अवघ्या महाराष्ट्रात आनंदी -आनंद झाला.
        आपल्या हयातीत महाराजांनी अनेक घडामोडी केल्या,तीस-पस्तीस वर्ष सतत कष्ट घेतले .पण वयच्या ५० व्या वर्षी त्यांनी एप्रिल १६८० मध्ये सर्वांना दुःख सागरात लोटून जगाचा निरोप घेतला .रयतेचा वाली गेला ,पण अखिल भारतात त्यांच्या कार्याला तोड नाही.अशा या महान राज्याला मी कोटी कोटी प्रणाम करते.

     जय हिंद !जय महाराष्ट्र !जय शिवराय !
Previous article
Next article

30 Comments to

  1. खूपच छान ताई आपल्या राज्यात स्फुर्त करणार वर्णन केलंस तू आई भवानी तुला यशस्वी करो 😇🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर अप्रतीम जय शिवराय

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads