स्पर्धक क्रमांक ११९ अमृत प्रशांत पाटील सांगली - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ११९ अमृत प्रशांत पाटील सांगली

'छत्रपती शिवाजी महाराज कि जय'
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान वाटतो. शिवाजी महाराजांचा जन्म १९ त्याचा संबंध फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर शेजारी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरीवर शिवाई देवीचे मंदिर होते आणि म्हणून त्यांचे नाव 'शिवाजी' असे ठेवण्यात आले.
        महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले सरदार होते . ते खूप शूर होते. जेव्हा महाराज जन्मले होते तेव्हा शहाजीराजे जिजाऊंना म्हणाले होते की आपल्या पुत्राने कधीच नोकरी करू नये.त्यांनी स्वतःचे राज्य स्वराज्य निर्माण करावे. स्वराज्य व्हावे हे शहाजी राजे यांचे स्वप्न होते.
         जिजाऊंनी त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. जिजाऊंनी त्यांना राम,भीम,कृष्ण,अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्य विषयी उत्सुकता वाढवली आणि महाराजांनीही आपणही असेच पराक्रम गाजवायला पाहिजे असे वाटू लागले.
           जेव्हा ते बारा-तेरा वर्षांची झाले तेव्हा त्यांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीचा रक्ताचा अभिषेक त्यांनी रायरेश्वराला घातला. पाणी म्हणाले " हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा". शहाजीराजांनी राजमुद्रा महाराजांकडे सोपवली.
          महाराजांना शास्त्राचे शिक्षण दिल्यावर आणि स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर एक-एक गडावर भगवा फडकला लागला. महाराजांनी तोरणा, मुरूम देव, कोंढाणा आणि पुरंदर असे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी मुरुमदेवाचा किल्ला दुरुस्त केला आणि त्याला राजगड नाव दिले आणि राजगडाला स्वराज्याची राजधानी बनवली.
         महाराजांनी १६६५ मध्ये जावळीवर आक्रमण केले आणि आपल्या जावळी घेतली आणि तिथून महाराजांना मुबलक प्रमाणात धन मिळाले. जावली ला महाराजांनी रायगड असे नाव दिले. महाराजांनी सिद्धी, पोर्तुगीज आशा शत्रूंशी लढण्यासाठी नेव्हीची स्थापना केली.
         ही घोडदौड मला पटली नाही आणि बडी बेगम ने अफझलखान नावाच्या बलाढ्य सरदाराला महाराजांचा खात्मा करण्यासाठी पाठवले. खान वाईला आला. त्याला वाई चा भाग चांगलाच माहीत होता. तो रयतेचे खूप हाल करू लागला. महाराज त्याच्याशी समोरा समोर युद्ध करू शकत नव्हते कारण खानाचे सैन्य खूप होते.
           महाराजांनी खानाला भेटीचा संदेश पाठवला. भेटीचा दिवस उजाडला. महाराजांनी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला आणि खानाच्या भेटीसाठी निघाले. खान आणि महाराज दोघेही समोरासमोर आले. खान हसरी हाक मारत होता. महाराजांनी त्याला मिठी मारली आणि खान महाराजांना आपल्या मिठीमध्ये दाबत होता आणि त्याने महाराजांच्या पाठीवर बिचव्याचा वार केला पण महाराजांनी चिलखत घातल्यामुळे खानाचा वार फुका गेला. महाराजांनी वेळ न घालवता लगेच आपल्या डाव्या हातातील कट्यार काढून खानाच्या पोटात घुसवली आणि वाघनखांचा मारा केला. खान ओरडू लागला हा आवाज ऐकून बडा सय्यद शामियान्यात आला आणि तो महाराजांच्या वर वार करणार इतक्यात जीवा महाल ने त्याला ठार केले. संभाजी कावजी ने खानाचे मुंडके उडवले आणि ते राजगडावर नेले आणि आऊसाहेबांच्या आज्ञेनुसार ते पाली दरवाजा मध्ये चिरडले.
            महाराजांचा आणि मावळ्यांचा हा पराक्रम खूपच प्रेरणादायी होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अफजलखानाच्या मृत्यूची बातमी जेव्हा विजापुरात पोचली तेव्हा बडी बेगमने स्वराज्यावर आणखी एक संकट पाठवले ते म्हणजे सिद्धी जोहर. महाराज तेव्हा पन्हाळ्यावर होते. सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला आणि हा वेडा त्याने सलग पाच महिने घातलेला होता. महाराज पन्हाळ्यावरून मोठ्या युक्तीने निसटले आणि विशाळगडावर पोचले आणि तिथून राजगडावर गेले यामध्ये बाजीप्रभू देशपांडे फनी शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी आपला जीव दिला. बाजीप्रभु चा मृत्यू खिंडीत सिद्धीचे सैनिकांबरोबर लढताना झाला ही बातमी जेव्हा महाराजांना कळली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेल्या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले. महाराज जेव्हा पन्हाळ्यावर होते तेव्हा स्वराज्यावर शाहिस्तेखानाचे संकट आलेले होते नंतर महाराजांनी दोन वर्षांनी त्या संकटावर ही गनिमी कावा करून शाहिस्तेखानाची तीन बोटे कापून त्याला पळवून लावले. महाराजांनी अशा कित्येक संकटांवर मात करत हे स्वराज्य वाढवले. महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही.
           महाराज गरीब रयतेचे आधार होते. प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर ते झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रनेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.
              दक्षिण दिग्विजय नंतर तीन वर्षांनी म्हणजेच ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचा मृत्यू झाला. या घटनेने  अख्ख स्वराज्य थरथरून गेलं आणि पोर की झाली. अशा या राजाला प्रत्येक मातीच्या असे राजाला प्रत्येक किल्ल्याचा, दरोडेखोरांचा, सह्याद्रीचा, महाराजांमुळे मोकळा श्वास घेत असलेल्या प्रत्येक जीवाचा, साडेतीनशे वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा मानाचा मुजरा!!!!!
जय शिवराय.
Previous article
Next article

7 Comments to

  1. खुपच छान.
    महाराजांच्या पराक्रमाचे आशययुक्त वर्णन.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान प्रयत्न अमृत. मला पुन्हा एकदा चौथीच्या वर्गात गेल्यासारख वाटलं . तुला मनःपूर्वक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान प्रयत्न अमृत. मला पुन्हा एकदा चौथीच्या वर्गात गेल्यासारख वाटलं . तुला मनःपूर्वक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads