स्पर्धक क्रमांक ७९ अर्पिता शिवाजी पाटील कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ७९ अर्पिता शिवाजी पाटील कोल्हापूर

राजा शिवछत्रपती

     सहयाद्रीच्या कुशीतून 
     एक हिरा चमकला,
     भगवा टिळा चंदनाचा 
     शिवनेरीवर प्रकटला,
     हातात घेऊनी तलवार
     शत्रूवर गरजला,
     महाराष्ट्रात असा एकच
     शिवाजी राजा होऊन गेला.
          परकीय सत्तांच्या जुलमी जोखडाखाली दबून गेलेल्या रयतेमध्ये स्वतःच्या राज्याची म्हणजे 'स्वराज्या' ची चेतना निर्माण करून त्याची सक्षमपणे उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील एकमेवद्वितीय व आदर्श राजे होते.छत्रपती शिवरायांनी आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत स्वराज्याचे बीज पेरले, अंकुरले व त्याचा वटवृक्ष होण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचा क्षण अन् क्षण वेचला.
    महाराष्ट्राच्या पावनभूमीत सह्याद्रीच्या कुशीतील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.सन १६३३ पर्यंत त्यांचे वास्तव्य शिवनेरीवरच होते.
ना शिवशंकर.तो कैलाशपती,
ना लंबोदर.तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो 
राजा शिवछत्रपती !!
      अफजलखान हा अतिशय कपटी व पातळयंत्री होता.त्याने हजारोंच्या संख्येने पायदळ,घोडदळ व युद्धसामग्री सोबत घेऊन स्वराज्याच्या दिशेने आक्रमणाची कूच केले.जावळीच्या खानाला आणून  त्याला संपवायचे हा विचार शिवरायांनी पक्का केला.अफजल खानाच्या सैन्यात वेगवेगळ्या अफवा पसरवून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे तंत्र शिवयांनी अवलंबिले. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानास तब्बल चार महिने शिवरायांचे नखही दृष्टीस न पडल्याने त्याचा आत्मविश्वास डगमळीत झाला. खानाला अडीच तास वाट पाहत रेंगाळून ठेवून त्याचे लक्ष विचलित केले.खानाने महाराज्यांवर  कट्टयारीचा वार केला पण चिलखतामुळे तो व्यर्थ ठरला.लगेचच त्याला रणनीती बनविन्याची संधी न देताच महाराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली.
        रयतेचे राजे शिवछत्रपती यांनी पाहिलेल्या रयतेच्या राज्याचे स्वप्न पर्यायाने स्वराज्याचे  स्वप्न साकार झाले होते. 
        सिंहाची चाल,
        गरुडाची नजर ,
        स्त्रियांचा आदर ,
        शत्रूचे मर्दन,
  असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
   हीच छत्रपती शिवाजी  महाराजांची शिकवण.....….
      शिवाजी महाराज्यांची संशोधनवृत्ती ही अशी शक्ती होती की ज्यामुळे मूठभर मावळयांनी मोगलांना या पाचही शाह्यांना पाणी पाजले.मग ते शस्त्रसंशोधन असो की दुर्गसंशोधन !महाराजांनी त्यांच्या संशोधनशक्तीचा वापर करून शत्रूवर मात करण्याच्या नवनवीन युक्त्या शोधून काढल्या. गनिमी कावा हे महाराजांनी राबवलेले सर्वात यशस्वी तंत्र आहे. 
       शिवकाळात गडांना विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे.'ज्याचे किल्ले  त्याचे राज्य' अशी परिस्थिती होती.किल्ला जिंकण्याएवढाच नवीन किल्ले बांधन्याकडेही महाराजांचा कल  होता. 
   जगणारे ते मावळे होते 
   जगवणारा तो महाराष्ट्र होता 
   पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
   जनतेकडे मायेने हात फिरवणारा
   तो आपला' शिवबा' होता .....
छत्रपती शिवराय हे कडक शिस्तीचे होते. प्रशासन,सैन्य यामध्ये कमालाची शिस्त होती. प्रत्येकाला नेमून दिलेले काम चोखपणे पार पाडलेच पाहिजे अन्यथा खैर नसे ! शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले .आरमाराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या लाकडाची गरज कशी भागवावी याचे दिशानिर्देश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते .
      ३ एप्रिल १६८० रायगड  स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि ऊन , वारा, पाऊस ,दिवस, रात्र ,वेळ, काळ या सर्वांवर मात करुन जीवाचे रान करून वेचणाऱ्या महापराक्रमी,चारित्र्यवान, मुत्सद्दी  छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत मावळली ....  
  एक होता शिवाजी ,
  भिती नव्हती ज्यांना जगाची , 
  चिंता नव्हती परिणामांची ,
  कारण त्यांना साथ होती मावळयांची ,
   आणि शिकवण होती जिजाऊंची,
   त्यांची जात होती मर्द मराठयांची,
   देशात लाट आणली भगव्या झेंडयाची,  
   आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, 
    म्हणूनच म्हणतात....... 
 जय जिजाऊ, जय शिवाजी ..... 
Previous article
Next article

20 Comments to

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचे विषयी अतिशय अभ्यास पूर्वक सादरीकरण, छान 👍👌

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर व अप्रतिम लेख लिहला आहे ...

    उत्तर द्याहटवा
  3. मस्तच अर्पिता जय जिजाऊ जय शिवराय

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads