Blog
स्पर्धक क्रमांक १०५ प्रणाली राहुल कुडचे इचलकरंजी
मूर्तीकेचे पावित्र्य तव राखीले..
स्वराज्यस्वप्न तव साकारिले..
गर्जुनिया केलासी
हिंदोत्सव साजरा...
शिवराजा तूज
मानाचा मुजरा ...
स्वतंत्र्य साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक ..
श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले. हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते त्यांनी शुन्यातून किलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वासाठी प्रेरणादायी आहे . शिवरायांच्या जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाऊंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला . त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते . शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते . शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते . बालपणाची सर्व वर्षे नीतिमत्ता ,राज्यव्यवस्था , युद्धकला , गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली . कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत . मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते . माता जिजाऊ रामायण , महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत . शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते . जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई यांना सून म्हणून पसंत केले . शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता . त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली. आदिलशाही , निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते . स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणुन त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयातच जिंकला . त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले .'अफजलखान वध ' , 'शाहिस्ते खानाची बोट छाटणे ' या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो . स्वकीय शत्रुंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला . याव्यतिरिक्त पुरंदरचा तह , दिल्लीतील ओरंगजेब भेट आणि तेथून सुटका या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे .
शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पूढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाने मोल चुकवले . तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे , प्रतापराव बजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले .
इ.स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला . आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता . राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले . आरमार , सुयोध्य कर वसुली , गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरण मोहिमा राबवल्या .
धगधगत्या त्या लाव्यासारखा ,
सूर्य होवून गेला...
जिजाऊंचा पुत्र शिवबा ,
छत्रपती होवून गेला...
चारही दिशांना गुंज त्यांची ,
दिल्लीला हलवून गेला... अफजलखानाला ठार करूनी ,
शिवबा छत्रपती होवून गेला..
गोरगरिबांचा बाप होवूनी ,
पालनपोषण त्यांनी केला....
रयतेचा कैवारी शिवबा
छत्रपती होवून गेला...
यशवंत! कीर्तिवंत! सामर्थ्यवंत! वरदवंत! पुण्यवंत! नीतिवंत !जाणता राजा!! छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे , की त्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच ....ते एकाच वेळी द्रष्टे , स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती , संघटक , स्फूर्तिदाते , युगपुरुषोत्तम होते . त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच तर आत्ताच्याही कित्येक शतकांत तोड नाही , असा हा राजा केवळ पुण्यवत राजा नव्हता , तर तो आदर्श नीतिवंत राजा होता.....
निश्चयाचा महामेरू!!
बहुत जनांसी आधारु!!
अखंड स्थितीचा निर्धारु!!
श्रीमंत योगि!!!!
अशा साक्षपुर्ण शब्दांत या जाणत्या राजाचे वर्णन समर्थांनी केले आहे . शिवाजी महाराज श्रीमंत तर होतेच , पण योगीही होते . दक्षता , कणखरता आणि तत्परता असा स्थायीभाव असलेल्या शिवछत्रपतींच्या शब्दकोशात आळस नव्हता , उत्साह होता , चंचलता नव्हती निग्रह होता , मोह नव्हता , ममता होती , भेदभाव नव्हता , त्यागवाद होता . ..
अष्टपैलु , अष्टावधानजाग्रूत,आदर्श राज्यकर्ता , थोर सेनानी , लोकहितदक्ष , धर्माभिमानीपणा परधर्मसहिष्णु , चारित्र्यसंपन्न असा हा जाणता राजा होता . शिवाजी राज्याचे राज्य प्रजेचे राज्य होते . ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते . 'श्रीमानयोगी ' होते . छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले , तेव्हा त्यांना शहाजीराजांनी स्वतंत्र्य राजमुद्रा तयार करून दिली . '
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा
मुद्रा भद्राय राजते।।
या राजमुद्रेचा अर्थ असा की , प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा
लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
ॐ बोलल्यावर मनाला शांती मिळते ,साईबोलल्याने मनाला शक्ती मिळते , राम बोलल्याने पापमुकती मिळते आणि जय शिवराय बोलल्यावर आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते .
शेवटी इतकंच म्हणेन की,
विजेसारखी तलवार
चालवूनि गेला ....
निधड्या छातीने
हिंदूस्तान हलवून गेला ....
वाघनख्याने अफजलखानाचा
कोथळा फाडून गेला....
मूठभर मावळ्यांना घेवून
हजारो शैतानांना नडुन गेला....
स्वर्गात गेल्यावर देवांनी
ज्यांना झुकुन मुजरा केला ....
असा एक मर्द मराठा
माझा शिवबा होवून गेला .....
जय शिवराय
Previous article
Next article
खूपच छान...........
उत्तर द्याहटवाKup cha mast
हटवाइतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. 💐💐
उत्तर द्याहटवाखूप छान असा इतिहास डोळ्यासमोर उभा केला आहे ,,,,खूप छान , जय महाराष्ट्र
खूप छान .
उत्तर द्याहटवाVery good pranali
उत्तर द्याहटवाJay Shivray
jay Jijau
👍👍👍 मस्तच
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती दिली ताई आम्ही आभारी आहोत 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
उत्तर द्याहटवाBest
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाBest
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवा“नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला!”
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
Really very nice essay, Pranali
Nice 👍
उत्तर द्याहटवाNicely written pranali! ��
उत्तर द्याहटवाGreat job ��
वंदन त्या थोर शिवरायाला �� ��
Pranali, well done!
उत्तर द्याहटवाBeautifully written✍️��
जय शिवराय��������