स्पर्धक क्रमांक १०२ अभिजित मेघशाम जळवी सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक १०२ अभिजित मेघशाम जळवी सिंधुदुर्ग

सतराव्या शतकातील तो काळ आपल्या महाराष्ट्रासह पुर्ण भारत देश मोगलांच्या जुलमी ने त्रस्त झाला होता. चारही बाजूनी अंधार मय  झालेली सामान्य जनता गनिमांचा याच्याला, अत्याचारांना बळी पडत होती. आदिलशाही- निजामशाही भर दिवसा ढवळ्या आपल्या आयांवर बायांवर  अत्याचार करत होते ,भर दिवसा ढवळ्या उचलून घेऊन जात होते, पिकांची नासाडी करत होते ,घरदार लुटली जात होती ,आगी लावल्या जात होत्या.......अशातच अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक तेजस्वी सूर्य १९ फेब्रुवारी १६३०रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मला. शिवाई देवीच्या नावावरून बालकाचे नामकरण करण्यात आले शिवाजी  शहाजीराजे भोसले.लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान असणाऱ्या राजांवर जिजाऊंनी महाभारत रामायण यांसारख्या गोष्टींचा चांगला प्रभाव पाडला होता त्यामुळेच परकीय सत्तेविरुद्ध लढाई करून रयतेला सुखी करून  स्वराज्य स्थापन करायचे असा बाल  शिवाजींनी   निश्चय केला.  लढाई करण्यासाठी आवश्यक असे  मार्गदर्शन त्यांना दादोजी कोंडदेव यांच्याकडून मिळवले. 
          अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी आपल्या निवडक साथीदारांसह रायरेश्वराच्या समक्ष स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ,त्याच बरोबर इसवी सन  १६४७ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.  तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले.  त्यानंतर  शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्णता नियंत्रण मिळवले.  याशिवाय तोरणा गडाचा समोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे रायगड असे नामकरण केले.  शिवराय पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली ती  पुढील  प्रमाणे , "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते" म्हणजे ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र  वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तसेच शहाजी राजांचा पुत्र शिवाजीची हि मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. 
        आदिलशाहीशी इमान राखून असणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीकडे कुरापती काढत असे त्याला धडा शिकविण्यासाठी १६५६ चाली शिवरायांनी रायरीचा किल्ला  सर केला व चंद्रराव मोरे चा बंदोबस्त केला इसवी सन१६५९ पर्यंत शिवरायांनी पश्चिम घाटातील आणि कोकणातील जवळपास 40 किल्ले जिंकले होते.  शिवरायांच्या या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी आदिलशाहाने १६५९ साली अफजलखानाला  शिवरायांविरुद्ध पाठवले.अफजलखान मोठा विध्वंस करत , आई तुळजाभवानी मूर्ती भंग करीत  त्याने स्वराज्यात पाऊल ठेवले.  प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ यांनी 10 नोव्हेंबर १६५९ या दिवशी अफजलखान व शिवरायांची भेट ठरवली . अफजलखान दगाबाज होता याची पूर्वकल्पना शिवरायांना या आधीच होती . कारण याच क्रूर अफजलखानान  शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कपटाने ठार मारले होते.  त्यामुळे शिवरायांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच हाताच्या पंजाब मध्ये वाघनखे ठेवली जेव्हा खानाने शिवरायांना मिठीत घेतले, त्याच वेळी दगाफटका करून त्याने शिवरायांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला.  परंतु चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले.  खानाचा दगा पाहून शिवरायांनी आपली  वाघनखे खानावर चालवली आणि बिचव्याने  अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला व त्याच वेळी अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. शामियान्या  मधून बाहेर पडताना सय्यद बंडाने  शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच मध्ये उडी घेत  जिवा महालाने सय्यद बंडाचा हात त्याच्या धडापासून वेगळा केला आणि शिवराय बचावले. .  यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. तिकडे जखमी अवस्थेतील अफझलखानाला पालखीमधून उचलून नेत असताना संभाजी कावजी या महाराजांच्या सैनिकाने पालखीच्या भोइंचे  पाय तोडले आणि अफजलखानाचे शिर धडापासून तलवारीने वेगळे करून ते जिजाऊंना भेटीसाठी पाठवले. खानाच्या वधानंतर छावणीच्या बाहेर झाडीत लपून बसलेल्या मराठ्या मावळ्यांनी खानाच्या सैन्याला कापून काढले. 
         शिवरायांनी अफझलखानाचा केलेल्या  वधामुळे  आदिलशाहीत जबरदस्त धक्का बसला त्याच बरोबर शिवरायांचा पराक्रम व त्यांचे नाव पूर्ण भारतभर पसरले.  खानाचा वधामुळे चिडलेल्या आदिलशहाने सिद्धी जौहर या आपल्या सेनापतीला १६६० साली प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चाल करून पाठवले.  सिद्धी जोहरच्या आक्रमणाच्या वेळी शिवराय पन्हाळगडावर होते ,सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने पन्हाळ्याला वेढा दिला आणि या गडाची रसद तोडली.  शिवरायांनी काही दिवस गडावर काढले.  पण सिद्दीचा वेढा काही उठण्याचे लक्षण दिसेना तेव्हा शिवरायांनी आपल्या सरदारांशी खलबते करून विशालगडावर पोहोचावे असा निर्णय झाला.  या योजनेनुसार एके रात्री शिवराय गुप्त रस्त्याने शिताफीने विशाल गडाकडे निसटले . याचा पत्ता सिद्दी जौहरला लागताच त्याने सिद्दी मसऊद याच्या बरोबर काही सैन्य शिवरायांच्या पाठलागावर पाठवले पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत घोडखिंडीत सिद्धी मसऊद ने राजांना व राज्यांच्या सैन्याला गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली.  त्याच वेळी विश्वासू व पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवरायांना विनंती केली की "राजे, तुम्ही विशाळगडा कडे प्रयाण करा व गडावर पोहोचल्यावर तीन तोफांचे गोळे डागा तोपर्यंत मी एक भी गनिमाला इथून पुढे सरकू देत नाही".  शिवरायांना हे पटेना पण बाजींच्या हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि शिवराय विशाळगडाकडे गेले पुढे बाजीप्रभु व सिद्धी मध्ये जोरदार युद्ध झाले आणि आपल्या अवघ्या सहाशे साथीदारांसह  बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. यात बाजीप्रभू प्राणांतिक रीतीने घायाळ झाले. त्याच वेळी त्यांना राजे विशाळगडाकडे  पोहोचल्यामुळे तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि राजांचा  हा संदेश समजतात बाजीप्रभूंनी आपले प्राण खिंडीमध्ये सोडले शिवरायांना ही बातमी फार चटका लावून गेली .. नंतर बाजीप्रभू ज्या  खिंडीत लढले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे ठेवले.. 
       मोगल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडील विस्तार तसेच शिवरायांच्या स्वराज्य विस्ताराला वेसण घालण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानला स्वराज्यावर मोठा फौजफाटा देऊन पाठवले वाटेत येताना त्याने लागणाऱ्या गावात जमेल तेवढा विध्वंस केला शेवटी त्याने पुण्यातील राजांच्या लाल महालातच तळ ठोकला खानाचा बंदोबस्त करण्यासाठी यासाठी शिवरायांनी धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. एका रात्री शिवराय आपल्या मोजक्या सैनिकांच्या साथीने लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन लाल महालात शिरले . लाल महालमध्ये अचानक झटापट  सुरू झाल्याने शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवराय समोर आल्याने आपला जीव वाचवण्यासाठी शाहिस्तेखानाने खिडकीतून खाली उडी घेतली ,पण त्याच वेळी शिवरायांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर त्याची तीन बोटे कापली गेली ..पण या झालेल्या हल्ल्यामुळे शाहिस्तेखानाने शिवरायांचे धास्ती घेतली व लगेच दुसऱ्या दिवशी दिल्लीकडे कूच  केले.
     सततची युद्धे आणि त्यामुळे रिक्त  होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित असत.  मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता.  अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची लुट! आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते . आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते म्हणून शिवरायांनी इसवी सन १६६४ साली सुरतेवर हल्ला करून सुरत शहराची लूट केली या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि स्वराज्याच्या खजिन्यात भर . लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे ,त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते शिवरायांच्या आज्ञेनुसार स्त्रिया ,मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली . चर्च ,मस्जिद  सारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
      शिवरायांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन तत्कालीन क्रूर मुगल सम्राट औरंगजेबाने इसवी सन १६६५ मध्ये औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले.  स्वराज्यावर मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत आले.   मिर्झाराजांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्या पुढे मराठ्यांच्या टिकाव लागणे फारच अवघड होते तिची चाहूल लागताच शिवरायांनी मिर्झाराजा सोबत बोलणी सुरु केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही.  त्यानंतर मुघल सरदार दिलेरखानाने १६६५साली  घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांनी गडावरील सैन्य घेऊन किल्ला झुंजावण्याची  शर्थ केली.  या  कठीण परिस्थितीत देखील  मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर फार शर्थीने लढवला अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या मुरारबाजींचा या लढाईत अंत झाला.  स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तब्बल दीड महिने पुरंदर लढत ठेवून ११जून १६६५  या दिवशी अखेरचा श्वास घेतला .  एक महान वीर मातीत  मिसळला.  दिलेरखानाचा बाण लागून मुरारबाजी पुरंदर  किल्ल्यावर पडले. या निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला यात शिवाजीराजांना तहाच्या अटीनुसार तेवीस किल्ले द्यावे लागले त्याच बरोबर स्वतः ला आग्रा येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
           सन १६६६ मध्ये औरंगजेबाने शिवरायांना दिल्ली येते भेटीसाठी बोलावले त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले त्यांच्यासोबत नऊ वर्षांचे बाल संभाजीराजे देखील होते परंतु भर दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवरायांचा औरंगजेबाने उपमर्द केला . या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले.  लवकरच त्यांची रवानगी मिर्झाराजे जयसिंग यांचे पुत्र रामसिंग यांच्याकडे करण्यात आली शिवरायांबद्दल आधीपासूनच औरंगजेबाला धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता.  काही दिवस निघून गेले, शिवरायांनी केलेले सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते शेवटी शिवरायांनी एक योजना आखली त्यांनी आजारी पडल्याचे नाटक केले . आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले.  सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी नंतर नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले.  कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत राहिला.  शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला.  बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही म्हणून  मुघल सैनिक गेले असता तेथे त्यांना कोणीही आढळले नाही, आणि सत्य परिस्थिती त्यांना समजली तोपर्यंत शिवराय निसटून 24 तास झाले होते.  शिवराय औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले यात यशस्वी झाले होते . आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरे कडे गेले ,तेथे संभाजी राजांना त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले शिवरायांनी स्वतः एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला,तरी  देखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या, त्यांचा उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात आपण पडायचा नाही.  यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे की दिल्लीभेटीपूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता.  हे शिवरायांचे आणि त्यांच्या अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश होते.
     शिवराय  स्वराज्यात परतल्यानंतर त्यांच्या झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले तेवीस किल्ले जिंकून घेण्याचे स्वराज्यातील मावळ्यांनी ठरवले . त्यात पहिला  कोंढाणा किल्ला घ्यायचा हे ठरवले गेले. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी स्वतः शिवरायांनी उचलली होती परंतु ही बाब जेव्हा तानाजी मालुसुरे यांना समजली तेव्हा त्यांनी कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.  स्वतःच्या मुलाचे लग्न असतानासुद्धा तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यापायी कोंढाणा घेण्याचे ठरवले . अतिशय शूर असलेले तानाजी मालुसरे हे लहानपणापासूनच शिवरायांचे सवंगडी होते . त्यावेळी जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभान सारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला.आधी   लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे अशी शपथ त्यांनी घेतली होती.  तिकडे कोंढाणा किल्ल्यावर उदयभान राठोड च्या हाताखाली सुमारे पंधराशे जणांची फौज होती ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री तानाजी मालसुरे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य सिंहगडाच्या पायथ्याशी येउन पोचले .  ती भयाण काळोखी रात्र होती कोंढाण्यावर जाण्याचा त्यांनी मार्ग निवडला तो शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.  या कड्यावर रात्रीच्या वेळी आपल्या यशवंती या घोरपडीला वर पाठवून तिच्या शेपटीला दोर बांधला होता त्या दोरीला पकडून सर्व मावळे वर चढून गेले, व अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर तलवारीचे घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच नंतरच स्वतः तानाजींनी आपले प्राण सोडले.  मात्र त्यांच्यामागुन सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी नेतृत्व  करून कोंढाणा काबीज केला.  दुसऱ्या दिवशी शिवराय सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना तानाजींच्या मृत्युची बातमी समजताच त्यांना फार वाईट वाटले . अत्यंत दुःखी झालेल्या शिवरायांच्या तोंडातून गड आला पण सिंह गेला असे उद्गार बाहेर पडले.कोंढाणा  पाठोपाठ पुरंदरच्या तहात दिलेले सर्व च्या सर्व किल्ले मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतले आणि मराठ्यांनी आपली सर्वत्र विजयी घोडदौड कायम ठेवली.... 
          सर्वत्र विस्तार झालेल्या स्वराज्याला आता एका अधिकृत छत्रपतिंची गरज होती परंतु राज्याभिषेक राज्याभिषेका शिवाय शिवरायांच्या आदेशांना गांभीर्याने घेईलच असे नव्हते.  राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे शक्य नव्हते . आपल्या राजकीय निर्मितीला म्हणजेच स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.  तसेच तत्कालीन रयत ही शिवरायांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती.  आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनवून तिचे स्वतंत्र बाण्याने राज्य करत राहावे अशी त्यांची इच्छा होती.  हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी सर्वांची इच्छा होती . आणि सहाजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती.  म्हणून शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी शिवरायांनी खास काशी वरून विश्वेश्वर नामक पंडित बोलावला या पंडिताचे  नाव गागाभट्ट असे होते.. गागाभट्ट हे काशी मध्ये राहणारे एक विद्वान पंडित होते त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट असे होते.  यांनी स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर कर्तबगारीने व लोकसाह्याने मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले विश्वनाथ मंदिर पुन्हा उभारल्यामुळे त्यांच्या घराण्याला आजवर चालू असलेल्या अग्रपूजेचा मान मिळाला. गागाभट्ट यांनी सहा जून सोळाशे 74 रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक केला.  या राज्याभिषेकासाठी सप्त  नद्यांचे चे पाणी आणण्यात आले होते तसेच शिवरायांची सुवर्णतुला करून त्यांच्या वजना इतपत धन रयतेला व ब्राह्मणांना वाटले गेले.  त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.  या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शिवशक सुरू झाला फारसी संस्कृत शब्दकोश बनवला गेला यामध्ये फारसी च्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी सक्त हूकूम जारी केला.. 
   .  शिवरायांच्या राज्याभिषेका नंतर अल्पावधीतच १७जुन १६७४ रोजी जिजाऊंचा मृत्यू झाला शिवरायांचा सर्वात मोठा आधार हरपला.  यामुळे शिवराय फार दुःखी झाले परंतु या दुःखातून शिवरायांनी सावरून दक्षिण दिग्विजयाची मोहिम हाती घेतली.  शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी केली.  त्यांना आदिलशाहीची आता फारशी भीती नव्हती ;परंतु दिल्लीचा औरंगजेब मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.  तो स्वराज्याचा केव्हा घास घेईल याचा नेम नव्हता मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेत एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला म्हणून त्यांनी आपला मोर्चा दक्षिनेकडे वळवला ...पुढे  राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट दिसते . 
           असे हे आपले शूर पराक्रमी, बुद्धिमान, तेजस्वी, दूरदृष्टीता असलेले आपले राजे१६८० मध्ये एका अज्ञात रोगाने आजारी पडले या आजारपणातून ते शेवटपर्यंत सावरले च नाहीत आणि ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. एका तेजस्वी सूर्याचा अखेर अंत झाला  शून्यातून स्वराज्याची स्थापना करून मराठ्यांना अभिमानाने जगायला शिकवणाऱ्या शिवरायांना माझ्या मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत
Previous article
Next article

4 Comments to

  1. खूप छान माहितीपूर्ण लिखाण. निबंधातून छत्रपतींचा जीवनपट जाणवला. लेखनाची धाटणी, सनावलीसह महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे देणाऱ्या जवळ जवळ सर्वच घटना यात दिसल्या.खूप छान..आणि वाचनीय वाटला निबंध.🍫🙏nice..

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads