स्पर्धक क्रमांक ११२ आरूषी अमोल साबडे दापोली - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ११२ आरूषी अमोल साबडे दापोली

राजा शिवछत्रपती

        संपन्न ह्या भूवरी
      माझा महाराष्ट्र देश......
         चहुकडुनि शोभतो          
       याचा सह्याद्रीचा वेश..,.
     मराठमोळा देश माझा
       संतवाणी ने सजला.....
 अशा मायभूच्या रक्षणासाठी
      वीर शिवाजी लढला......
   मनात स्वराज्य स्थापनेची उत्कट आकांक्षा, सद गुणांचा समुच्चय, रयते विषयी अपार आत्मीयता, युद्धाचे डावपेच आखण्यासाठी आवश्यक कुशाग्र बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, विलक्षण असे युद्ध कौशल्य वापरून रणांगणात शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य तसेच स्वातंत्र्यासाठी व आपल्या मातेच्या रक्षणासाठी कोणतीही जोखीम पत्करायची तयारी अशा असंख्य गुणांनी युक्त व सामर्थ्यशाली व्यक्तिमत्वाने इतिहासात आपले नाव अमर करणारे तसेच आपल्या कर्तृत्वाची तलवार तळपत ठेवणारे तेजस्वी नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..
         बाल शिवबा चा जन्म १६३०  साली शिवनेरी गडावर झाला. जणू जिजाऊ व शहाजींच्या पोटी सूर्य जन्माला आला जो अन्यायाच्या अंधकाराला  खाऊन टाकणार होता. लहानपणापासूनच जिजाऊ बाल शिवबा ना रामायण व महाभारत सारख्या वीरात्म्यांचा कथा सांगून शिवरायांच्या मनात कर्तव्यपरायण ता,  राष्ट्रप्रेम व संस्कारांचे बीज पेरत होत्या. दादोजी कोंडदेव यांच्या नेतृत्वाखाली शिवबांनी विलक्षण असे युद्ध कौशल्य अवगत करून धर्म संस्कृती व राजनीतीचे शिक्षण प्राप्त केले. दादोजींच्या मृत्यूनंतर शिवरायांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. जिजाऊंच्या तालमी तच शिवाजी महाराज तयार झाले व त्यांच्या शिकवणीतून त्यांना स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती मिळाली.
       शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजी राजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाची साथ केली.
         स्वराज्य स्थापन करायचे तर त्यासाठी गड व किल्ले आपल्या ताब्यात पाहिजे यासाठी त्यांनी अनेक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यात ला तोरण गड जिंकला आणि स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा करून मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. यानंतर शिवरायांनी अनेक किल्ले ,गड ,भुईकोट, दुर्ग ताब्यात घेतले व काहींची डागडुजी करून आवश्यक ते बदल घडवले.
        मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू केले. आपल्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे शिवाजी महाराजांचे यश आदिलशहाला असहनीय झाले आणि त्याने त्याच्या दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला जो दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. अफजल खान मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह वाईजवळ आला तेव्हा शिवरायांनी त्याला प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले व तहाची बोलणी सुरू झाली. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना होती म्हणूनच ते सावध होते. भेटीच्या वेळी धिप्पाड  आणि बलदंड अशा अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी राजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले खानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली.                
           त्यानंतर महाराजांनी पावनखिंडीतील लढाई, पुरंदरचा तह, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका अशा अनेक मोहिमा यशस्वी रित्या पार पाडल्या.
         शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. हिंदू परंपरेनुसार अनेक जेष्ठ यांच्या व श्रेष्ठ यांच्या तसेच देशी-विदेशी राजे व सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. व तेव्हापासून शिवराई हे चलन सुरू झाले.
        शिवरायांनी समानतेचे तत्त्व जोपासले. अतिशय कष्ट घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले आणि युगपुरुष हे नाव सार्थकी ठरवले . आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत व हाच त्यांच्या प्रज्ञेचा सर्वात महत्त्वाचा पैलू होता.
           प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
        विजेसारखी तलवार     
         चालवुन गेला...
      पराक्रमाने महाराष्ट्र
        हादरवून गेला...
    मुठभर मावळ्यांना घेऊन
         मराठ्यांचे साम्राज्य
          स्थापून गेला....
            असा एक
       " मर्द मराठा शिवबा "
            होऊन गेला.......
      अशा या महान सूर्याचा अस्त  जरी झाला तरी  प्रत्येकाच्या हृदयात ते अजूनही अजरामर आहेत. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासन करता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातच नव्हे तर इतरत्रही वंदिले जातात..
       शिवरायांनी आयुष्यात कधीही शत्रूच्या कपटकारस्थानांना  दाद दिली नाही . राजे म्हणजे निश्चयाचा महामेरू.. जे जे त्यांनी ठरवलं ते ते करून दाखवलं. या स्वराज्याच्या वाटेवरती त्यांना अनेक परकीय शत्रूंशी  राजकारण करावे लागले पण लोककल्याणाचे धोरण त्यांनी कधीही सोडले नाही. एक प्रखर योद्धा कुशल राज्यकर्ता उदार व प्रजाहितदक्ष राजा म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे . रयतेला लेकराप्रमाणे मानणारे सर्व धर्मांना समान लेखणारे शिवराय मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचार येणाऱ्या महात्मा प्रमाणे ते वंदनीय होते यासाठी इतिहास साक्ष आहे...
         पेटली रणांगणी,
      स्थापिले हिंदवी स्वराज्य, शौर्याने रचली इतिहास गाथा.
     लक्ष युगे  गर्जत  राहील,
 शूर शिवबा ची स्वराज्य कथा..........

Previous article
Next article

15 Comments to

  1. Khup chhan Aarushi...
    शब्दरचना खुप छान ...👍🏻👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. आरुषी खूप सुंदर वर्णन केल आहेस शिवाजी महाराजांचे .....मस्त

    उत्तर द्याहटवा
  3. किती छान लिहिलं आहेस आरुषी . Wish you all the Best

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम लेख..खुपचं उत्कृष्ट माहिती..👌🏻👍🏻

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर लेख लिहिला आहेस, आरुषी 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  6. आरुषी, सहज सुदंर ओघावत्या भाषेत वाचनीय झाला आहे निबंध

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads