स्पर्धक क्रमांक २ तेजल अनिरुद्ध मोरे खेड रत्नागिरी - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक २ तेजल अनिरुद्ध मोरे खेड रत्नागिरी

राजा शिवछत्रपती

रायगडी मंदिरी वसे माझा राया
चरणाशी अर्पिते अजन्म हि काया
जगदीश्र्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदिते मी तुम्हा छत्रपती शिवराया!!!

 
        अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्फूर्तिस्थान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. असे सांगण्यात येते की जिजाबाईंनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीला प्रार्थना केली होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
            गरीब मावळयांसोबत शिवाजी महाराज लहानपणापासून खेळत असत त्यांच्या झोपडीत जात आणि याच मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्यस्थापनेची
प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे जाऊन त्यांनी कोंढाणा,विजयदुर्ग, लोहगड, पुरंदर, राजगड असे अधिक किल्ले जिंकले. त्यांनी युध्दात शक्ती सोबत युक्तीचाही वापर केला.
         आपल्या स्वराज्याची राजमुद्रा शिवरायांनी तयार केली होती. लोक कल्याणाची वाणी सांगणारी ही राजमुद्रा होती. राजमुद्रा अशी होती की- 

प्रतीपंच्चद्रलेखेव वर्धिष्णूविश्र्ववंदिता||
शाहसूनो: शिवसैश्या मुद्रा भद्राय राजते||

        म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकोरा प्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोक कल्याणासाठी आहे. असे सांगणारी राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता.
           काही लोक पराक्रमी असतात तर काही लोक चारित्र्यशील असतात. पराक्रमी लोक चारित्र्यशील असतीलच असे नाही आणि चारित्र्यशील लोक पराक्रमी असतील असेही नसते. परंतु जो पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्यशील आहे. असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...! 
        शिवरायांनी आपल्या नेतृत्वाच्या आणि शौर्याच्या बळावर स्वराज्य निर्माण केले. फक्त लढाया केले आणि किल्लेच जिंकले नाही, तर रयतेचे कल्याण करून गरीब जनतेची मनेही महाराजांनी जिंकली.
          ६ जून १६७४ रोजी महाराजांचा किल्ले रायगड वर राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज  'शककर्ते राजे ' झाले. 
           शिवाजी महाराज मराठी व संस्कृत भाषेचे समर्थक होते. त्यांनी स्वराज्य कारभारात नेहमी मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. स्त्रियांचा नेहमी आदर केला. जनतेवर अन्याय करणाऱ्याना त्यांनी कठोर शिक्षा हि दिली.
           असा एकच राजा मिळाला या मातीला ज्याने मावळा म्हणून संबोधले अठरा पगड जातीना.
          आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी
प्रशासक, हिकमती लढवैया, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते- 
शिवरायांचे आठवावे रूप|
शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी|

      शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. ३ एप्रिल १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर  शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
Previous article
Next article

23 Comments to

  1. खुप छान आहे निबंध सुरूवात पन मस्त केली आहेस👌🌼😊😊

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान आहे निबंध सुरूवात पन मस्त केली आहेस👌🌼😊😊

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लिहिलंय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🤗

    उत्तर द्याहटवा
  4. काही गोष्टी समाजाला माहिती नसतात त्या तुम्ही अगदी व्यवस्थित सुटसुटसित मांडल्या आहेत 🚩

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads