स्पर्धक क्रमांक ११३ अक्षता संजय चव्हाण कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ११३ अक्षता संजय चव्हाण कोल्हापूर

राजा शिवछत्रपती       
           श्वासात रोखुनी वादळ ,   
           डोळ्यात रोखली आग,
           देव आमुचा छत्रपती,
            एकटा हिंदू वाघ,
          हातात धरली तलवार,
          छातीत भरले पोलाद,
         धन्य-धन्य हा महाराष्ट्र ,
        धन्य हे आपले महाराज !!प्रस्तावना:
 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, त्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच आहे . ते एकाच वेळी दृष्टे स्वातंत्र्य  सेनापती, संघटक ,स्फूर्ती दाते ,युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही  गुणाला त्यांच्या काळातच नव्हे तर आत्ताच काही कित्येक शतकात तोड नाही असा हा राजा केवळ पुण्यवंत राज्यात नव्हता ,तर तो आदर्श नीतीवंत राजा होता ,म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन पठ आजच्या तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे राज्य होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटले जाते . 
शिवाजी महाराजांचा जन्म :
                        छत्रपतीशिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला .बालपणी शिवाजीमहाराजांच्या मनावर जिजाबाईंनी धर्मनिष्ठा स्वातंत्र्य चरित्र निष्ठा व स्वाभिमान यांचे संस्कार घडवले .स्वराज्याची  स्थापना शहाजीराजांनी पुणे -सुपे- चाकण -इंदापूर जहागिरीचा कारभार जिजाबाई व बाल शिवाजी यांच्याकडे सोपवला शिवाजी महाराजांनी या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे रयतेच्या मनात महाराजां विषयी आदर व आत्मीयता निर्माण झाली. शिवरायांनी फौजेचे उभारणी केली .संभाजी कावजी ,येसाजी कंक ,बाजीप्रभू देशपांडे ,नेताजी पालकर ,बहिर्जी नाईक, मदारी मेहतर ,मुरारबाजी देशपांडे इत्यादी जिवाभावाचे सवंगडी त्यांना मिळाले शिवाजीराजांनी रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली . राजांनी इसवी सन 16 46 मध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली . हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले . 

शिवाजी महाराजांचे अतुलनीय शौर्य व पराक्रम  :
                       सुमारे साडेतीनशे वर्षाच्या प्रदीर्घ अंधाऱ्या पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झालं .रयतेने आपले तारण हार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा किताब बहाल केला. स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याच्या भोवती शत्रूचा सुळसुळाट होता .शत्रूचा बंदोबस्त करणं अगत्याचं होतं .शिवराय राजकारण धुरंदर दूरदृष्टीचे होते.

 जावळी जिंकून घेतली :                    
                            स्वराज्याच्या विस्तारासाठी जावळीचा दुर्गम प्रदेश मिळवणं छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक वाटू लागलं .इसवी सन 1656 मध्ये जावळीवर स्वारी करून आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे यांचा पराभव केला .जावळी विजयाने स्वराज्याच्या कक्षा रुंदावल्या.
 अफजल खानाचा वध :                      
                  जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यातून गेल्याने आदिलशहाचा क्रोध अनावर झाला .त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी अफजलखान या बलाढ्य सरदारास पाठवले 10 नोव्हेंबर 16 59 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यात भेट झाली .भेटीप्रसंगी अफजलखानाने दगा देता प्रसंगावधान राखून अत्यंत चपळाईने महाराजांनी अफजलखानाचा ठार केले.

 पन्हाळगडाचा वेढा आणि सिद्दी जोहर  : 
          अफजल खानाचा वध होऊन पन्हाळा सारखा किल्ला महाराजांच्या ताब्यात गेल्यामुळे आदिलशाहीला धक्का बसला. पन्हाळा परत मिळवण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जोहर यास प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्यावर पाठवले. महाराज पन्हाळ्यावर असताना च सिद्दीने गडास वेढा दिला दरम्यानच्या काळात शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला महाराज दुहेरी संकटात सापडले जुलै 16 60 मध्ये निवडक सैन्यानिशी महाराज किल्ल्यातून बाहेर पडले .त्यांनी विशाळगडाकडे दौड सुरू केली. शत्रूने त्यांचा पाठलाग सुरू केला. बाजी प्रभु देश पांडेंनी निवडक सैन्यानिशी पावन खिंडीत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरले. महाराज विशाळगडावर पोहोचल्याचा तोफेचा इशारा मिळताच बाजीप्रभूंनी देह ठेवला आणि बाजीप्रभूंच्या बलिदानाने खिंड पावन झाली. 
 शाहिस्तेखानाची फजिती :
                स्वराज्यावर चालून आलेला व पुण्याच्या लालमहालात तळ ठोकलेल्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्याचे महाराजांनी ठरवले. निवडक सैन्यानिशी महाराजांनी दिनांक 5 एप्रिल 16 63 रोजी रमजान च्या दिवसात रात्री खानावर छापा टाकला. महाराजांनी शाहिस्तेखानावर वार केला पण तो बोटावर निभावला. शाहिस्तेखानाची बोटे छाटली गेली. खानाची बेइज्जती झाली. सुरतेवर स्वारी  :
           शाहिस्तेखानाने सतत तीन वर्षे स्वराज्यातील प्रदेशाची लूट केली , याचा बदला घेण्यासाठी महाराजांनी मुगलांच्या वैभवशाली सुरत शहरावर स्वारी करण्याचे ठरवले .छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी 1664 मध्ये सुरतेवर स्वारी केली. या वेळी महाराजांनी तेथील सामान्य जनतेला व धार्मिक स्थळांना उपद्रव दिला नाही. पुरंदरचा तह  : 
सुरत स्वारीमुळे सम्राट औरंगजेबाची बेइज्जती झाली. मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग याला व दिलेरखानाला प्रचंड फौज देऊन दक्षिणेत पाठवले . त्यांनी महाराष्ट्रात येऊन सर्व बाजूंनी शिवाजी महाराजांना अडचणीत टाकले .छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवित हानी टाळण्यासाठी जयसिंग बरोबर वाटाघाटी करून पुरंदरचा तह केला .या तहाने मुघलांना तेवीस किल्ले व चार लक्ष होण्याचा प्रदेश देण्याचे मान्य केले . परिणामतः या तहामुळे स्वराज्याच्या कार्याला काही काळ खीळ बसली. अशाप्रकारे पुरंदरचा तह झाला. आग्र्यावरून सुटका : 
            पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग याच्या प्रस्तावानुसार शिवाजी महाराज सम्राट औरंगजेबाच्या भेटीसाठी पुत्र संभाजी आणि विश्वासू सहकाऱ्यांसह आग्र्यास रवाना झाले बारा मे 1666 ला औरंगजेबाच्या वाढदिवसादिवशी ही भेट झाली . यावेळी औरंगजेबाने कपटाने शिवाजी महाराजांना कैद केले . 19 ऑगस्ट 1666 ला छत्रपती शिवाजी महाराज पुत्र संभाजी सह आग्रा वरून निसटले. राजपुत्र संभाजीला मथुरेला ठेवून महाराज वेषांतर करून महाराष्ट्रात सुखरूप परतले. 
राज्याभिषेक : 
            शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्मशास्त्रीय , नैतिक व कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी व समाज मान्यतेसाठी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करुन घेण्याचे ठरवले .त्यानुसार 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला .याप्रसंगी त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली .स्वतंत्र सार्वभौम राज्याचे ते छत्रपती झाले. शिवराज्याभिषेक यामुळे महाराष्ट्रात एक नवे युग अवतरले . मराठी राज्याला स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला. राजपत्रावर यापुढे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा निर्देश करण्यास सुरुवात झाली.  राज्य रोहणा पासून नवा राज्याभिषेक शक सुरू करण्यात आला.  त्यामुळे महाराज युगप्रवर्तक शककर्ते ठरले. महाराजांनी स्वतःची शिवराई व होन ही नाणी पाडली आणि स्वराज्यातून सुराज्य कडे वाटचाल सुरू झाली . 
छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान : 
       भारताच्या इतिहासात होऊन गेलेल्या लोकोत्तर पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदराने उल्लेख केला जातो .सामान्य रयतेला सुखी करण्यासाठी महाराजांनी विविध उपाययोजना आखल्या. छत्रपतींनी सर्व जाती-वर्गाचे नेतृत्व केले .वंशपरंपरेने न नेमता गुणवत्तेप्रमाणे कर्तुत्ववान व्यक्तीला महत्त्वाच्या पदांवर नेमले . महाराजांनी आपल्याच माणसांना राजकारण लष्कर आरमार राज्यकारभार मुत्सद्देगिरी अशा क्षेत्रात नेमून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव दिला. महाराजांकडे दूरदृष्टी होती .  महाराजां बद्दल लिहायचं झालं तर  ,
 शिवराय सांगायला सोपे आहेत,        शिवराय ऐकायला सोपे आहेत  शिवरायांचा जयघोष करणंसुद्धा सोप आहे .
पण शिवराय अंगीकारण खूप कठीण आहे .आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आनेल .तो या जगावर राज्य करेल एवढ मात्र नक्की ! 
 प्रेरणा : 
          आजची तरुण पिढी महाराजांना आदर्श मानते .कारण महाराजांच्या नावातच प्रेरणा आहे. 
   !!  छत्रपती शिवाजी महाराज!!     छ -   छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्र  - त्रस्त मोगलांना करणारे        प  - परत न फिरणारे
 ती-  तिन्ही जगात जाणणारे  
शि  - शिस्तप्रिय 
वा-  वा निर्देश
 जि-  जिजाऊंचे पूत्र 
म -महाराष्ट्राची शान 
हा-  हार न मानणारे 
 रा- राज्याचे हितचिंतक
 ज- जनतेचा राजा .
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा .
इतिहासाच्या पानावर,                   रयतेच्या मनावर, 
 मातीच्या कणावर,  आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांचे वर्णन करताना म्हटलंय , 
निश्चयाचा महामेरू! बहुत जनांसी आधारू!!
 अखंड स्थितीचा निर्धारु! श्रीमंत योगी!! 
Previous article
Next article

2 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads