स्पर्धक क्रमांक ५५ पायल प्रदीप चांदणे अहमदनगर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ५५ पायल प्रदीप चांदणे अहमदनगर

राजा शिवछत्रपती

          शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो.मोठ्या उत्साहाने ‌‌शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जयजयकार करतो.शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता.त्या काळी सर्वत्र राजेशाहयांचा अंमल असे.बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले, की ज्यांची प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले.उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील ‌विजयनगरचा सम्राट  कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत.त्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.
        शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतः चे राज्य.महाराष्ट्रापूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते.महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते.रहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय सुरू होता.
     ‌ उत्तरेकडील मुघल बादशाहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते.शहाजीराजांच्या जहागीरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते.जिजाबाई गरोदर होत्या.
        .....आणि तो सोन्याचा दिवस उजाडला.फल्गुन वद्द  तृतीय शके 1551
म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19फेब्रुवारी 1660रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.जिजाबाईंनी उत्तम शिक्षण दिले.त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्युच्या गोष्टी सांगत.नामदेवाचे, कधी ज्ञानेश्वराचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत.
       वयाला सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला.थोड्याच काळात शिवराय लिहिण्या-वाचण्याच्या कलेत पारंगत झाले.रामायन महाभारतातल्या गोष्टी ते स्वतः वाचू लागले.शहिजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती.त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.आशा प्रकारे वयाच्या बारावर्षांपर्यंत शिवरायांना विविध विद्या आणि कला यांचा परिचय झाला.
       1645साली शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्याची शपथ घेतली.शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता.शहाजीराजांनी शिवरायांचे स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.ती मुद्रा अशी-
       प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूर्विश्ववंदिता‌।।
शाहसुनोःशिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचे पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेत होता.सुरतेच्या मोहिमेवरुन शिवराय परततात, तोच सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून दुःखद बातमी समजली.शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले.
1665 साली पुरंदरचा तह झाला.शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांनी त्यांच्याशी बोलणे केले. जयसिंग मोठा धूर्त त्त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले.त्यांनी तह केला.या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होनांचा मुलुख मुघलांना देण्याचे कबूल केले.अशा प्रकारे पुरंदरचा तह झाला.
       शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली सत्पगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली.रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली.अष्टप्रधान शिवरायांच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते म्हणाले 
        क्षत्रियकुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
     अशा प्रकारे सन 1674मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला.
     3 एप्रिल 1680 सर्वांना दुःख सागरात लोटुन शिवरायांनी जगाचा निरोप घेतला.
   रयतेचा वाली गेला.
आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रुंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज  निर्माण केले.
    
अशा कल्याणकारी राजाला  मानाचा मुजरा
Previous article
Next article

4 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads