Blog
स्पर्धक क्रमांक ९० साक्षी सितप कोल्हापूर
राजा शिवछत्रपती
नमस्कार मित्र- मैत्रिणीनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. साडेतिनशे वर्षाच्या गुलामगीरीच्या बंधनातून मुक्त करून हिंदवि स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला. अश्या या महान योध्या ला नमन करूया आणि सुरवात करते, माझ्या निबंधाला.
महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमानें स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त 1 केले. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी : 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण घडण केली.
जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजी महाराज प्रतिनिधी होते. लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही. एका सामान्य जाहागिरदाराच्यामुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे. खशेखर 'स्वतःच्या हिंमतीवर, समोर कोणी मार्गदर्शक जसताना मध्ययुगीज भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक मुरुष होते, स्वराज स्थापना करताना जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज स्थापन करताना त्यांच्यापुढे कठीण अडचणी आल्या. संकटाचे महापुर आले, परंतु ते हरहुन्नरी, निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा आग्ज्याची नजरकैद असो ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.
शिवाजीमहाराजांचे राज्य स्वतःचे राज्य नव्हते. प्रजेये राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. भीमान योगी' होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या मृतप्राय समाजाला शुध्दीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राजकर्त्यांविरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.
शिवाजीमहाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला 'शाप' ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला, समाज सुत्रबद्ध, शिस्तबध्द, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार स्वाभिमानी व स्वराजनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत होते. महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते. त्यांचा धर्माभिमान औरंगजेबा सारखा नव्हता. ते परधर्मसहिष्णु होते. उदारमतवादी होते.
शेख आर्थिक व्यवहार अमलात आणुन सरंजामशाही
मोडून काढणारा हा पहिलाच राजा. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपणे आखली. स्वतःचे त्यांचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. शुद्ध मन सद्भावना व सरळ स्वभाव हे त्यांच विशेष.
स्त्रियांबददल त्यांच्या मनात आदर होता. प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दुःखाचा नाश करणारा हा लोक नायक होता. खच्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या संद्गुणांचा वारसा मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.
महाराजांनी दिला ज्ञानरूपी वसा, पुढे चालवू आम्ही वारसा |
अश्या या महान थोर पुरुषांस कोटी कोटी प्रणाम !
... जय भवानी, जय शिवाजी
Previous article
Next article
90
उत्तर द्याहटवाअति सुंदर
उत्तर द्याहटवाNice 👍
उत्तर द्याहटवाAwesome presentation.
उत्तर द्याहटवाएक no.. साक्षी...
उत्तर द्याहटवाजय शिवराय
🙏🏻🚩
उत्तर द्याहटवाVery nice sakshi
उत्तर द्याहटवाखूपच छान साक्षी
उत्तर द्याहटवाMast👍
उत्तर द्याहटवाNICE Sakshi 🚩Jay Shivray 🚩✨
उत्तर द्याहटवाNice sakshi
उत्तर द्याहटवाNice sakshi
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाNice sakshi
उत्तर द्याहटवा