महाराष्ट्र
रामदास सेवाश्रम, स्वामी विवेकानंद केंद्र, इनविश वेलफेअर फाऊंडेशन, स्वामी समर्थ सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
बदलापुर-पाणी संवर्धनासाठी वृक्षलागवड व वृक्षारोपण आवश्यक असते.पर्यावरणाचा होत असलेला -हास थांबविण्यासाठी झाडे लावा-झाडे जगवा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून लव्हाळी येथील कल्याण स्वामी गौशाळेच्या भव्य हिरव्यागार रान माळावर रामदास सेवाश्रम,स्वामी विवेकानंद केंद्र,स्वामी समर्थ सेवा संस्था(नाशिक),कीबुज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हरित ऋण-वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.स्वामी विवेकानंदच्या प्रतिमेला अभिमान करुन वृक्षारोपणाला सुरुवात झाली.तद्प्रसंगी पराग बुवा रादासी यांनी वृक्षसंवर्धन,कल्याण स्वामी गौशाळा व इतर वृक्ष लागवडी संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.याप्रसंगी सिटीझनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे,सह खजिनदार मंगेश सावंत,बदलापुर विकास कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.अमितकुमार गोविलकर,जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,मुख्य वन संरक्षक अधिकारी प्रमोद ठाकर,परीमंडळ वन अधिकारी सखाराम राठोड,नियत क्षेत्र वन अधिकारी प्रेम राठोड,बदलापुर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामभाऊ शेट्टे,रामदास सेवाश्रमाचे पराग बुवा रामदासी व इतर मान्यवर स्वयंसेवक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वड, पिंपळ, जांभुळ, फणस, आंबा, रामफळ, सिताफळ, निलगीरी, आवळा, बांबु, बेहरडा अशा विविध प्रकारच्या १५० वन औषधी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी पराग बुवा रामदासी यांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने "सन्मानपत्र" देऊन गौरविण्यात आले. शेवटी सुग्रास सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा