स्पर्धक क्रमांक ००९३ : अंजली विजय जाधव बुलढाणा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००९३ : अंजली विजय जाधव बुलढाणा

निबंधाचा विषय :- ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षण पद्धती

"खडू नाही, फळा नाही, 
  म्हणून शाळा सांगते रडून, 
   कोरोना तु मुलांच्या शिक्षणात 
   सापासारखा बसलास का रे दडून!

        या वरील काव्यपंक्ती मध्ये  खडू नाही, फळा नाही, म्हणून विद्यार्थी नाही.त्यामुळे शाळेत हसण्याचा ,गोंधळाचा आवाज नाहीसा झालाय. व दररोज शाळेत होणारी प्रार्थना , मधल्या सुट्टीतील खिचडी साठी गर्दी ,मुलांची भांडण, छोटी-मोठी थट्टा- मस्करी, शिक्षकांचा ओरडा. हे सगळे शाळेला आठवण  म्हणूनच राहिले. त्यामुळे शाळा कदाचित रडत असेल. व  शाळा विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टींची जशी आठवण  काढत आहे तशी प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा शाळेची आठवण येत असावी.
  
"आधी शाळेत जायला येई जीवार आता असं वाटतं रविवार सुद्धा असावा शाळेचाच वार"

बरोबर न! प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायचं रविवार रोज रोज यावा व रोज सुट्टी मिळावी .मग मला  अभ्यास कर,  टीव्ही बघू नको, मोबाईल बघू नको, खेळू नको असे कोणीच म्हणार नाही. कारण रविवार हा मनसोक्त सुट्टीचा दिवस असतो. पण आता या कोरोनामुळे वेगळीच परिस्थिती दिसते. जशी वरील काव्यपंक्तीत दर्शवली तशी .रविवार संपला की दुसऱ्या दिवशी शाळेत जायला जीवावर येई . तेव्हा असे वाटे की रोज रविवार असावा पण आता वाटतं रविवारी सुद्धा शाळा असावी. कारण प्रत्येकाला आता घरी बसून कंटाळा आलाय . म्हणतात ना! परिस्थितीच माणसाला बदलायला लावते हे खरचं आहे. कारण आता बघा न आपल्या डोळ्यासमोरची परिस्थिती आहे. ऑफलाइन शिक्षण बंद होऊन , मुलांना आता ऑनलाईन शिकवत आहेत.

मुलगा म्हणे बाबा, "शिक्षण झालं ऑनलाईन  हवाय मला नेट वाला मोबाइल ". "बाप म्हणे ,या महागाईने केले दंग.न खायची सोय ना काही घ्यायची सोय ;मला विकूनच येईल तुझा नेट  वाला मोबाइल"! "मुलगा म्हणे द्या नाहीतर, मी राहील उपाशी"."माय  म्हणते, बापाला माझ्या पाटल्या घ्या विकायला .पण माझ्या लेकराला मोबाईल द्या नेट वाला!"

     या लेखनात साधारण घरातील कुटुंबातील परिस्थिती आहे. खरंच या ऑनलाईन शिक्षणाने  कोड्यात पाडले आहे. मोबाईल सगळ्यांजवळ असतो असे नाही. काहींना या मोबाईल साठी अशीच तडजोड करावी लागत आहे. जशी या लेखनात आहे आणि आपल्या मुलांना जर शिक्षण नाही भेटले तर, उद्याचं भविष्य कसं उज्जवल होईल? असं त्या आईला वाटत आहे .म्हणून ती आई म्हणते" माझ्या पाटल्या विका आणि माझ्या मुलाला मोबाईल द्या". प्रत्येक पालकाचे स्वप्न असतं आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील इत्यादी होऊन आपलं नाव उंचावेल. पण त्या आधी शिक्षण आवश्यक आहे. मग आता शिक्षण तर ऑफलाइन बंद झालं.पण ऑनलाईन तर आहे मग त्यासाठी मोबाईलची तर आवश्यकता आहे मग कुठूनही तडजोड करून पालक आपल्या मुलाला मोबाईल  देत आहेत.

मी मागच्या वर्षाच्या संचारबंदी मध्ये टीव्हीवर एक बातमी बघितली होती. त्यात एका पालकांनी आपल्या मुलाच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेतला . व एवढे पैसे नसल्यामुळे स्वतःची एक गाय विकली .सांगा आता !या ऑनलाइन शिक्षणाने  त्या पालकाच्या पोटावरच पाया आला. सांगा पोटाला खायचं नाही, प्यायचं नाही . पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्या व्यक्तीने गाय विकली. मला या गोष्टीचा फार अभिमान  वाटला पण खंत सुद्धा वाटली . यावर शासनाने काही ना काही  यावर पर्याय काढावा. अशी व्यवस्था करावी की प्रत्येक मुलाला ऑनलाइन शिक्षण मिळालं पाहिजे. पण त्यांच्या गरीब पालकांच्या पोटावर पाय न पडता. कारण कोरोना मुळे रोजगार नाही ,सगळे उद्योग -धंदे बंद आहेत. कारण काही अशी पालक आहेत, की त्यांना दिवसभर कामी केल्याशिवाय रात्रीच्या जेवणाची सोय सुद्धा लागत नाही .मग इथे खायची सोय नाही तर, गरीब पालक मोबाईल कुठून आणतील? याचा विचार शासनाने करायला हवा. जरी आपण या कोरोना महामारी विरुद्ध लढत आहोत, तरी सुद्धा मुलांच्या शिक्षणाचा विचार करायला हवा.

मोबाईल मिळाला नेट वाला, शिक्षण झालं सुरू. पण डोळ्याच्या दृष्टीने, पाठीच्या मणक्या ने डोक्याच्या दुखीने, नेटवर्कच्या कनेक्शने, व्हाट्सअप -युट्युब ने केलं वेगळच सूत्र सुरू!

पालकांनी मुलांना  जरी मोबाईल घेऊन दिला असेल. आणि ऑनलाइन शिक्षण जरी सुरू झाले असेल.तरी  पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. ऑनलाइन  शिक्षणाने जरी झटपट शिकत असलो, तरी ऑफलाईन शिक्षण वेगळंच असतं. ऑनलाइन शिक्षणात नेटचा प्रॉब्लेम येतो .शिक्षक कधीच मध्ये जातात मध्येच येतात. कधी विद्यार्थीच मध्ये जातात येतात. केवळ नेटच्या कनेक्शन मुळे. यांमुळे  शिक्षणात अडथळे निर्माण होतात. पण ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम लहान मुलांच्या दृष्टीवर, पाठीच्या मणक्यावर ,डोक्यावर होतो. मोठ्या माणसांनी 1-2 तास सतत जर  मोबाईल बघितला तर, मोठ्या माणसांची डोळे दुखायला लागतात. आणि लहान मुलांचं कसं होत असेल? याचा परिणाम आपल्याला आता नाही कळणार पण नंतर कळेलचं .याव्यतिरिक्त मुलांचे क्लास झाले की, मुले लगेच गेम सुरु करतात ,युट्युब बघतात .मुलं जसा मोबाईलचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करत आहेत .तसा वाईट गोष्टीसाठी सुद्धा करायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मला तरी वाटतं ऑनलाइन शिक्षण हे फायद्याचं पण आहे आणि घातक पण आहे. पण ऑफलाईन शिक्षणणाने विद्यार्थी शिक्षक एकमेकांसमोर असतात. शिक्षण हे जेवढं अनुभवातून शिकता येईल .तेवढं पटकन ज्ञान घेता येत.व विद्यार्थी शाळेत  शिस्तीत असतात. तसे घरी नसतात. ऑनलाइन शिक्षणाने विद्यार्थ्यांची शिस्त मोडली. शाळा असली की सकाळी लवकर उठावे लागते आणि ऑनलाईन शिक्षणाने हे सगळं विस्थापन विस्कटून लावले.
              ऑनलाईन शिक्षण हे एक-दोन महिने ठीक होते. पण वर्षभर ऑनलाइन शिक्षण म्हटल्यावर वर्षभराचा नेट पॅक मारावा लागतो .महिन्याचा अडीशे रुपये  मारला असेल.  पण शाळेसारखी क्लास चालले तर शंभर- दीडशे रुपयाचं नेट पॅक पुरतच नाही. कमीतकमी अडीशे तीनशे रुपयाचं तर लागत.  मग हा खर्च गरीब पालकांनी कसा भागवायचा?आणि तेही एवढ्या अडीचशे तीनशे रुपयाचा रिचार्ज टाकून सुद्धा नेटवर्क चा प्रॉब्लेम येणार असेल तर मग त्या शिक्षणाचा काय  फायदा .यामुळे असं होईल गुरुत्वाकर्षण बलाचा शोध  न्यूटने नाही केपलरनी लावला. मग असा घोळ झाला, तर एवढी प्रगती करून तरी काय उपयोग? भावी पिढी गोंधळात पडली तर कस होईल? देशाचे भवितव्य कसं घडेल? म्हणून ऑफलाईन शिक्षण चांगल . पण ऑनलाइन शिक्षण आता कोरोनाच्या काळात गरज बनली आहे. हे मात्र खरं आहे. जर नेटवर्क चा प्रॉब्लेम आला नाही, व अभ्यासाच्या वेळी व कामापुरता हाताळा तर ऑनलाइन शिक्षण उपयोगाचे . थोडावेळ मनोरंजनासाठी घेतला तर ठीक आहे. पण कमीत कमी. कारण काही असे असतात की, हातात मोबाईल घेतात की तो दहा-बारा तास हातचा खाली जाऊ देत नाही ,जेवत नाही, काहीच नाही. त्यांना मोबाईलच्या पुढे काहीच नाही सूचत .जर हे मुलांनी टाळलं आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी काय उपयोगी आहे? हे जर कळालं तर फार छान होईल कारण आता परिस्थिती अशी आहे. ऑनलाइन शिक्षणाशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. आणि ज्यांना ऑनलाईन शिक्षणात अडचण येत असेल किंवा नेटवर्क इशू होत असेल तर शासनाने या यावर काही ना काही उपाय करावा . कारण भावी -पिढी जर घडली ,तर देश घडेल !
Previous article
Next article

27 Comments to

  1. खूप छान विचार मांडले आहेत ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे फायदे कमी तोटे खूप जास्त आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान विचार मांडले तुझा या विचारातून बरेच काही शिकायला मिळेल प्रत्येक विद्यार्थी ना

    उत्तर द्याहटवा
  3. बहुत सुंदर आप को उज्जवल भविष्य कि शुभ कामनाएं

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर लेखणी आहत तुझी अंजु. असेच विचार मांडत राहा आणि नव्या पिढीला प्रेरणा देत रहा. नवी पिढी ही तुमच्या विचारांनी घडणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान विचार मांडले आहेत 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम लेख....👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  7. खुपच छान अंजली 🙌👌👌 तूझे विचार खुप छान आहेत

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads