स्पर्धक क्रमांक ००१३ : परवेश राजनांद मेश्राम भंडारा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००१३ : परवेश राजनांद मेश्राम भंडारा

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... परवेश राजानंद मेश्राम

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी


तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

परवेश राजानंद मेश्राम



          विषय : राष्ट्रपिता महात्मा गांधी
    
   नमन स्वीकारा आमचे

   बापू तुम्ही महात्मा

  भारताच्या प्रगतीसाठी

  तुमचा अमर आत्मा

     भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्व आणि कार्य एवरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती. इतर माणसे त्यांच्यासमोर खरच लहान वातात. आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. सत्य, अहिंसा, न्याय, समानता ,सेवा  समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते.

      त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ऑक्टोंबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलिबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती. ते जातीने वैश्य. वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबासी झाला. ते ७ वर्षाचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहुन राजकोटला स्थलांतर केले.

    'शांतीदूत' तुम्ही देशाचे

   शांततेची केली कामना

    सत्य, अहिंसेचा संदेश

   जागवली स्वातंत्र्य भावना....

    किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ,कृतीम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना  एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ती बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहात टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी  बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनवण्याचा निश्चय केला. तिथे  असतानाच त्यांनी  सत्य,अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले.त्यात सत्याग्रह मुख्य होता. 


   नेसून सुती पंचा

  हातात घेतली काठी

  अन्याय मिटवण्यासाठी

   लागले अहिंसेच्या पाठी...

      १९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शांचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले  व विजय मिळवला . भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. संपूर्ण भारतात खादि, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा  पाया डळमळू लागला. गांधीजी वर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. कनेक्ट सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली  व जनता संघटित केली. 

    'खेड्यांकडे चला' हा मूलमंत्र

   स्वच्छतेचा दिला संदेश

   इंग्रज सत्तेला झुगारून

   दिला 'चले जाव'चा आदेश....

     १२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनात इंग्रज शासका विरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते मनत पापाचा तिरस्कार  करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया' 'हरिजन' ही वृत्तपत्रे चालवली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला   प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला  गांधीजीनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोडो' चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या शेवट झाला. 

     शेवटी १५ ऑगस्ट१९४७ ला  गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रूपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दुःख झाले. संपूर्ण शक्तीनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात  अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व  नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले. 

    दुर्देवाने ३०जानेवारी१९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे यांने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यू बरोबरच एका झंझावती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे.राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वतःला सत्य आणि त्या मुल्यांच्या प्रति समर्पित करू ज्यांच्यासाठी ते जगली आणि हुतात्मा झाले."

   मोहनदास 'महात्मा' होऊन

   या जगात झाले अमर

    देशाच्या अस्तित्वासाठी

    लढले स्वातंत्र्य समर....
Previous article
Next article

27 Comments to

  1. अतिशय सुंदर विषयाची मांडणी 👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. Aapn divsen divs aaplya bhartat houn gelelya thor atmana visrt challo ahot ,
    Gandhiji fkt notanvr mhnun aaplyala lxat rahte je ki khup vaite paristiti ahe ,tumcha ya nibndhane mhla khup chan vatle tumcha dhnyavad bhau ashech sagdyana jakruk krt chla. Bharat mata ki jai.

    उत्तर द्याहटवा
  3. तुमचा या निबंधने म्हला आत्मासम्राण ढले धान्यवाब

    उत्तर द्याहटवा
  4. असाधारण , अप्रतिम , खूप छान आहे निबंध आहे .

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय सुंदर चारोळी आणि निबंधाची शब्दरचना परवेश

    उत्तर द्याहटवा
  6. गांधीजी विषयी अत्यंत मोजक्या शब्दात परंतु सखोल माहिती मिळाली... खरच खूप खूप सुन्दर आपण लिहले आहे 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय सुंदर विचार आणि वाक्यरचना👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय सुंदर निबंध आणि चारोळी परवेश👌👌👌 तुला या स्पर्धेत नक्की यश येईल हीच सदिच्छा.

    उत्तर द्याहटवा
  9. सर्व मित्र-मैत्रिणी व माझ्या सहकार्यांनी आपली एक अनमोल कमेंट केल्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
    तसेच दैनिक शिवस्वराज्य यांनी स्पर्धा घेतल्या मुळे आम्हा स्पर्धकांना आपले कला ,कौशल्य या स्पर्धेत अतिशय उत्तम प्रकारे मांडता आले त्यामुळे आपला सुद्धा मी आभारी अहो.
    धन्यवाद... 🙏

    आपलाच
    परवेश राजनंद मेश्राम

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads