दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... मेघा रावसाहेब वाळुंज
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
मेघा रावसाहेब वाळुंज
निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज
"सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला,
हातात घेऊनी तलवार शत्रूंवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच राजा,
माझा शिवबा झाला."
शिवपूर्वकाळात बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते.प्राचीन वैभव कोसळून गेले होते.राजकीय पकड घट्ट असल्याने स्थानिक लोकांना राजकारणात प्रवेश नव्हता. इसवी सन १५४० च्या सुमारास पाच स्वतंत्र राजवटी प्रस्थापित झाल्या.निजामशाही(अहमदनगर) आदिलशाही(विजापूर),कुतुबशाही(गोवळकोंडा),बरीदशाही(बिदर) आणि इमादशाही(वऱ्हाड)नंतर या सत्ता संपुष्टात आल्या. विठोजी भोसले विठोजी भोसले यांच्या मृत्यूनंतर जहागीरीची जबाबदारी शहाजी राजांवर आली .त्यावेळी ते केवळ बारा वर्षांचे होते .कोणतीही जबाबदारी शिरी घेण्याची राजांची कुवत होती .हे पाहून लखुजी जाधव यांनी आपली कन्या जिजाबाई यांचा विवाह शहाजी राजांच्या सोबत केला.इसवी सन १६२९ मध्ये शहाजीराजांनी निजामशाही स्वीकारली .या सुमारास १९ फेब्रुवारी१६३० रोजी जिजाबाई प्रस्तुत होऊन शिवाजी राजांचा जन्म शिवनेरीवर झाला.
'शिवाजी' हे फक्त तीन अक्षरी नाव नसून एक मंत्र आहे; तो मंत्र उच्चारताना अंगातले रक्त सळसळायला लागत, आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो .या सळसळत्या रक्ताची लाट आणि आजही महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . दुश्मनांच्या काळजात पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे' छत्रपती शिवाजी महाराज.' जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांचे आवश्यक शिक्षण मिळाले .त्यात अश्वारोहण , तलवारीचा हात नेमबाजी,शास्त्रशिक्षण असे त्यांना लहानपणीच मिळाले होते .
इसवी सन१६४० मध्ये शिवाजी महाराज बंगलोरला गेले. तिथेच निंबाळकर यांची मुलगी सईबाई यांच्याशी शिवाजी महाराजांचा विवाह झाला. पुण्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी कार्याला प्रारंभ केला. 'दादोजी कोंडदेव' यांच्या नेतृत्वाखाली बारा वर्षाच्या शिवबाने बारा मावळे वर्चस्वाखाली आणण्यास भाग पाडले असे आजही म्हटले जाते.स्वराज्य कार्य प्रारंभ केल्यास शिवाजी महाराजांचा न्याय निवडा विषय एक पत्र उपलब्ध झाले त्यात शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते की,
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
“याचा अर्थ अत्यंत सोप्या शब्दात सांगितला आहे की, "ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो,त्याचप्रमाणे शहाजीचा मुलगा शिवाजी यांच्या ह्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.”
सिंहाची चाल,गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर,शत्रूंचे वर्तन असेच असावे प्रत्येक मावळ्यांचे वर्तन; हीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली. आजही स्त्रियांना मिळणाऱ्या आदराचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच दिले जाते.आज प्रत्येक जण सुखाने राहतो याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आईचा,पत्नीचा,मुलांचा,बहिणींचा,आदर सन्मान,आणि संरक्षण करण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण होते. त्या धोरणाची शिवाजी महाराजांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली.म्हणूनच आज महाराष्ट्रात आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या शिवराज्यात राहताना प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते,
"दगड झालो तर सह्याद्रीचा होईल ,
माती झालो तर महाराष्ट्राची होईल ,
तलवार झालो तर भवानीमातेची होईल,
आणि मानव म्हणून जन्म मिळाला तर ,
शिवरायांचा मावळा होईल."
किल्ल्यांची व्यवस्था शिवाजी महाराजांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली होती. अमात्यांनी आज्ञापत्रात ' संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ' या एका वाक्यात किल्ल्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.गडकोटांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार केला. कोणत्याही राज्यकर्त्या पेक्षा शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना जास्त महत्त्व दिले.इसवी सन १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी आरमाराचा पाया घातला.आरमाराचे महत्व 'ज्याच्याजवळ आरमार त्याच्या जवळ समुद्र ' असे मोजक्या शब्दात शिवाजी महाराजांनी विशद केले होते.
स्वराज्याची बांधणी करताना अर्थव्यवस्था उभारण्याचे कार्य ही शिवाजी महाराजांनीच केले होते. आजही महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात शेती करतात याचे कारण म्हणजे फक्त शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी शेती व्यवसायाला उत्तेजन देऊन पडीक जमिनी लागवडीसाठी आणायला शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले नसते तर आजही शेती पडीक पडल्या असत्या. बळीराजा सुखाने कमवून अभिमानाने वावरतोय, त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
लष्करी व्यवस्था पाहिली तर समजत महाराजांचे अश्वदल प्रभावी होते .त्यात हवालदार , जुमलेदार, हजारी,सरर्नोबत असे अधिकारी होते. महाराजांचे अष्टप्रधान मंडळही होते.प्रत्येक प्रधानाला युद्धशास्त्र पारंगत असले पाहिजे आणि युद्धप्रसंगी रणांगणावर लढता आले पाहिजे असा शिवाजी महाराजांचा दंडक होता.
शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण अत्यंत सहिष्णुतेचे होते. 'सर्व धर्म श्रेष्ठ असून परमेश्वर हा एकच आहे ' असा महान विचार शिवरायांचा होता.महाराजांनी सैनिकांना सक्त नियम केला होता की , ज्या ठिकाणी लुटालुट करण्यास जातील तिथे त्यांनी मशिदीस, कुराणास व स्त्रियांना त्रास देऊ नये.
न्यायव्यवस्थेत शिवाजी महाराजांनी पंचायत पद्धतीच्या न्यायव्यवस्थेला प्राधान्य दिले होते. युद्ध प्रसंगी आपल्या सेनांनी शत्रुपक्षातील स्त्रीला पकडून आणले तर ,त्या स्त्रीला साडीचोळी देऊन सन्मान करून परत पाठवत असे. शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रीला माता समजून तिचा आदर करण्यास शिकवले.
शिवाजी महाराजांना 'नूतन सृष्टीचे जनक' असे म्हटले जाते.केवळ वयाच्या ३०-३५ वर्षाच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा "चौफेर विस्तार करण्याचे अलौकिक कार्य शिवाजी महाराजांनी केले होते. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला लोकांमध्ये अस्मिता जागृत केली. स्वाभिमान शिकवला व नवा महाराष्ट्र बनवला उभा केला. केवळ स्वराज्य निर्माण करणे हेच महाराजांचे ध्येय नव्हते तर ,सर्वसामान्य जनता सुखी झाली पाहिजे, हे महाराजांच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते.
यशाचा आणि वयाचा काही संबंध नसतो ; हे महाराजांनी तोरणा गड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून दाखवून दिले. मरण आले तरी चालेल पण शरण जायच नाही; आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लढत राहायचं, संकटाला समोर जायच. ही प्रेरणा महाराजांमुळेच सर्वांना मिळते. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अग्रस्थान दिले जाते .जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न साकारले, ज्याचे नाव आजही इतिहासाच्या पानावर कोरले गेले आहे .आपले जीवन अर्पण करून ज्याने स्वराज्याची निर्मिती केली असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती पण स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता आणि ध्यास फक्त राजे तुमच्याकडेच होता . आजवर असंख्य जाहले, पण तुमच्यासारखा कुणी न जाहला ,गर्व असे आज महाराष्ट्राला, एकच राजा तो शिवबा झाला. अविश्रांत परिश्रम घेऊन महाराजांनी सर्व आयुष्य वेचले.अशा या अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान असणाऱ्या रयतेच्या राजाच ३ एप्रिल १६८० या दिवशी रायगडावर निधन झाले. रयतेचा सूर्य काळाच्या क्षितिजावर मावळला.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते,
अंधार फार झाला,
आता दिवा पाहिजे ,
राष्ट्राला पुन्हा एकदा,
जिजाऊंचा शिवा पाहिजे.
अत्यंत मोजक्या शब्दात सर्व मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत. अप्रतिम����
उत्तर द्याहटवाशिवाजी महाराजांविषयी यापेक्षा सकल सकल सखोल माहिती ते पण अत्यंत कमीत कमी शब्दात आणि इतक्या छान पद्धतीने वाचायला भेटली खरच खूप सुंदर लिहिले आहे बाळा. या स्पर्धेत व यश मिळो हीच इच्छा��
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाMast megha
उत्तर द्याहटवाअत्यंत उत्कृष्ट पद्धतीने निबंध लिहिला आहे 💯😍
उत्तर द्याहटवाKeep it up✌️
👌👌
उत्तर द्याहटवाNice megha di....
उत्तर द्याहटवाMast...❣🚩🚩
उत्तर द्याहटवाek number��
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाछान अप्रतिम
उत्तर द्याहटवाKhup chan🚩🚩💯
उत्तर द्याहटवा🔥🔥🔥
उत्तर द्याहटवा🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत मोजक्या शब्दात परंतू सखोल माहिती मिळाली...अप्रतिम!👌खूप सुंदर लिहिलय...💯
उत्तर द्याहटवाखरच खूप सुंदर लिहिले आहे❤🚩🚩🚩
उत्तर द्याहटवा🔥🔥🔥
उत्तर द्याहटवाMst,👍👍👍👍
उत्तर द्याहटवाWell done Megha 🤩keep it up...
उत्तर द्याहटवाछत्रपती शिवराय प्रत्येक मावळ्यांच्या मनात
उत्तर द्याहटवाआहे अढळ श्रद्धास्थान, जाणता राजा आहे माझा न्यायालंकार पंडित
त्याची किर्ती आहे अवघ्या त्रिभवनी अखंडित आहे तु अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने तूझ्या निबंधात पटवून दिलेले आहे💯🚩🚩
Jai ShivShambu
उत्तर द्याहटवाWell done Megha di ❣️❣️ Keep it up 👍👍
उत्तर द्याहटवाWell done sis 👏 nice essay 👏
उत्तर द्याहटवाKhupach chhaan 👍👍
उत्तर द्याहटवाखुप छान लिखाण केले .पहिल्या पासुनची तुझी आवड बोलणे, लिहिणे ही होती .आज खुप दिवसानंतर / सात - आठ वर्षानंतर तुझा निबंध वाचायला मिळाला. छान वाटले .
उत्तर द्याहटवामस्त आहे 👌
उत्तर द्याहटवाEach and every line have it's meaning and emotions.
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवाKeep it up Megha❤️🚩
उत्तर द्याहटवा🚩🚩🚩🚩🚩
उत्तर द्याहटवाNice tai
उत्तर द्याहटवाअप्रतिम....✨❤️
उत्तर द्याहटवा🚩🚩🔥🔥😘
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर विचार आणि अप्रतिम वाक्यरचना.
उत्तर द्याहटवाNice👌👌
उत्तर द्याहटवाBharich 🔥🔥🔥
उत्तर द्याहटवाKhup chan 🚩🚩
उत्तर द्याहटवाKhup chaan aahe
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर व मोजक्या शब्दात ,ठळकपणे मुद्दे लिहून निबंधाचे सादरीकरण केले आहे. अशीच प्रगती करत रहा..
उत्तर द्याहटवाSuper.... Keep it up
उत्तर द्याहटवामस्तच लिहिले आहे
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाJay Shivray 🙏
उत्तर द्याहटवाFirst class megha
उत्तर द्याहटवाछत्रपती शिवरायांचा खूप छान वर्णन पूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो
उत्तर द्याहटवा1 नंबर
उत्तर द्याहटवाVery nice Megha 🚩🚩
उत्तर द्याहटवाउत्कृष्ठ अश्या शब्दरचनेत शिवरायांचा जिवनगाथा ......🙏🙏🚩🚩धन्यवाद मेघा 🙏🙏
उत्तर द्याहटवाजय शिवराय����
उत्तर द्याहटवाजय शिवराय 🚩🚩🚩
उत्तर द्याहटवाजय शिवराय🚩 अप्रतिम निबंध आहे💯
उत्तर द्याहटवाMast lihal ahe
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाEkdum Bhari....
उत्तर द्याहटवाSaglech point ghevun Chan nibhandh lihlay.nehmi sarkhch Tula Yash milav beta..all the best
उत्तर द्याहटवाशिवाजी महाराजांच्या शिकवणी आदर्श अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने निबंधात लिहिला आहे .अशी अशीच प्रगती करत रहा.
उत्तर द्याहटवा. छान लिहिला आहे💯. जय शिवराय🚩
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाKharach khup khup Bhari ahe
उत्तर द्याहटवा