स्पर्धक क्रमांक ००१५ : कार्तिक सदानंद गोसावी सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००१५ : कार्तिक सदानंद गोसावी सिंधुदुर्ग

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... कार्तिक सदानंद गोसावी

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी


तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

कार्तिक सदानंद गोसावी


पर्यावरणाचे महत्त्व
---------------------------------------------
    आदीनाथ गुरु सकळ सिद्धांचा ,
      मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।
    मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला ,
       गोरक्ष बोलला गहिनी प्रति  ।
     गहिनी प्रासादे निवृत्ती दातार   ,
         ज्ञानदेव सारं चोजाविले   ।।
     संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पाया घातला . ज्ञानदेव हे गुरु परंपरेने ' नाथ संप्रदायी '  आहेत . ज्ञानदेवांच्या ठिकाणी शैव आणि वैष्णव यांचा संगम पाहायला मिळतो . 
     संत ज्ञानेश्वरांपासून अगदी संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार . यासोबतच निसर्ग , पर्यावरण यासंबंधीत जनजागृती देखील आहे . 
     प्राणवायू हा सध्याच्या काळात जगभर चर्चा होणारा विषय आहे . पण भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखले होते . म्हणूनच सण कोणताही असो आम्ही निसर्गाशी मैत्री करतो . जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवेल्लींना सोयरे मानतात . निसर्ग संरक्षण , संवर्धन , संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रूजविले गेलेत . 
     आपल्या आजूबाजूची झाडे , वेली , डोंगर - दऱ्या , झुळझुळणारी हवा , सजीवसृष्टी हे सर्व म्हणजे ' निसर्ग ' होय . शिवाय जीवाच्या जीवन पद्धतीवर परीणाम करणारी बाह्यकारी परीस्थिती , घटक , वस्तू  , प्रक्रिया व शक्ती यांचे एकत्रीकरण म्हणजे ' पर्यावरण ' .
     फार वर्षांपूर्वी भगीरथाने महान तपश्र्चर्या करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली . त्याने केवळ नदी आणली असे नाही , तर नदीच्या रुपाने या पृथ्वीवर ' जीवनाचा प्रवेश ' झाला . चैतन्य , सौंदर्य , समृद्धी , सुंदरता इतकेच नव्हे , तर स्वर्गसुखच या भुतलावर अवतरले . केवळ गंगा नदीच नाही , तर ‌इतर नद्यांच्या काठाकाठाने माणसे राहू लागली . जीवन उमलू लागले ; वस्त्या फुलू लागल्या ; विकासाचे चक्र गतीने फिरु लागले . पुढे - पुढे हिच गती अधिकच वाढली , अनियंत्रित झाली . त्यातुनच पर्यावरणाच्या समस्यांचा डोंगर उभा राहिला . 
           विचार कर मानवा , 
          जन्म नाही पुन्हा पुन्हा । 
           पर्यावरणाचा ऱ्हास ,
           हा तर असेल गुन्हा    ।।
     ग्रामीण भागांचे शहरीकरण व औद्योगिक , आधुनिकीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे मात्र पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले . नैसर्गिक पर्यावरणाच्या हानीमुळे मानवासह सर्वच सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले . विशेष म्हणजे या परिस्थितीला मानवच जबाबदार आहे . 
 पर्यावरण समस्या आणि त्यातुनच उद्भवणाऱ्या भीतीदायक भविष्याचा हा बागुलबुवा आहे का ? माणसाच्या स्वार्थात पर्यावरणाची आहूती तर पडणार नाही ना ? परिस्थिती नुसती कठीण आहे की भयावह आहे ? साडे -  चार अब्ज वर्षाचा इतिहास असलेल्या या वसुंधरेचा माणसाच्या फक्त १०० - १५० वर्षातील उद्योगांमुळे नाश तर होणार नाही ना ? 
     पायाभूत सुविधांमध्ये विकास करताना अनेक झाडांची कत्तल केली गेली . पर्यावरणाची हानी झाली . माणसाच्या प्रगतीमुळे पर्यावरणाची भीती निर्माण झाली . यामुळे वाढती उष्णता , वादळे , भुकंप , डोंगर खचणे , अवकाळी पाऊस यासारखे निसर्गात बदल झाले . थोडक्यात काय तर ऋतुचक्रच बदलले . या सर्व गोष्टी सुरू असतानाच माणसाला एका महाकाय संकटाला सामोरे जावे लागले ते म्हणजे ' कोरोना ' . कोरोना या संकटाशी सामना करताना माणसाला पर्यावरण मदत करू शकते ह्या गोष्टीचा सकारात्मक विचार माणूस विसरलाय . 
     होय ! पर्यावरण माणसाला या कोरोना संकटाला हरवायला मदत करू शकते . इतिहासाची पाने चाळलीत तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा महाकाय संकट निर्माण होते तेव्हा पर्यावरण मदतीला धावून आले . उदा . मुघल साम्राज्य होते , तेव्हा छ. शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वताला आपले सुरक्षा कवच बनवून शत्रूला हरविले . या शिवकाळात आहे का नाही पर्यावरणाची मदत ? अशा प्रकारे अनेक उदाहरणे आहेत . पण सध्या कोरोनाला हरवायचे असेल , तर ' पर्यावरणाचे महत्त्व ' जाणून घेतले पाहिजे . 
     माणसाला पर्यावरणातुन तुळस , अडूळसा यांसारख्या अनेक औषधी वनस्पती मदत करू शकतात . तसेच रानभाज्या , पालेभाज्यांमुळे प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी मदत होऊ शकते . वृक्ष लागवडींमुळे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो . यांसारखे अनेक लाभदायक गोष्टी माणसाला पर्यावरणाकडून मोफत मिळतात . या सर्वांमुळे कोरोनाशी दोन हात करणे शक्य आहे . 
     आज ह्या लॉकडाऊन कालावधीत माणसाला अनेक नवीन सवयी स्वत: ला लावून घ्याव्या लागत आहे . एक प्रकारे तो या बंदिस्त वातावरणाशी तडजोड करत आपले दिवस काढत आहे . लॉकडाऊनमधील नवीन सवयी शहरी वातावरणात अशाप्रकारे बदलत आहे . जे निसर्गासाठी सकारात्मक व नकारात्मक दोन्ही असू शकतात . या निबंधाच्या माध्यमातून ' पर्यावरणाचे महत्त्व ' खूप कळकळीने मांडावेसे वाटते . ते म्हणजे हे स्पष्ट आहे की मनुष्य लाॅकडाऊन निसर्ग आणि जैवविविधतेस यांचे नैसर्गिक स्थान पुन्हा शोधण्यास मदत करत आहे . म्हणून लॉकडाऊनमधील मिळालेला कालावधी ही माणसाला मिळालेली देणगी म्हणता येईल . जी त्याला जाणीव करून देत आहे की त्याने अतिप्रमाणात केलेल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे . त्यामुळे त्याची उणीव भरून काढणे किती गरजेचे आहे आणि भविष्यासाठीही राहील ! म्हणून आता तरी मानवाने पर्यावरणात उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा वापर सावधानता व सतर्कतेचा वसा हाती घेतला पाहीजे . पर्यावरणाला हानी न पोहोचवता भविष्याची तरतूद करत त्यात समतोल साधण्याची शपथ त्याने स्वत: शीच प्रामाणिक राहून घेतली पाहीजे . म्हणूनच -
     पर्यावरणाची धरुया कास , 
    सजीवसृष्टीचा शाश्वत विकास । 
    असावा असा प्रत्येकाचा ध्यास , 
      तरच मिळेल मोकळा श्वास.   ।।
Previous article
Next article

60 Comments to

  1. अप्रतिम लेखन, तसेच योग्य मांडणी, मुद्देसुत विचार लिखाण

    उत्तर द्याहटवा
  2. Kartik... Khup changal... Tuza vichar tu purn nibandh madhe pan disat ahe. All the best

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम निबंध आहे यातून तरुणपिढी आणि समाजासाठी अत्यंत उपयुक्त बोध आहे

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर लेख आहे असचं लिहत रहा शुभेच्छा ✌👍

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads