बाबरी पाडताना एक तरी शिवसैनिक होता का ?, चंद्रकांत पाटलांचा सवाल - दैनिक शिवस्वराज्य

बाबरी पाडताना एक तरी शिवसैनिक होता का ?, चंद्रकांत पाटलांचा सवाल


आज मुंबईतील षण्मुखानंतर सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर लगेचच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला उत्तर दिलं. आहे. मोहन भागवत यांच्या भाषणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या भुमिकेवर टीका केली.

आम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठे होतो हे जाणून घ्यायचं असे तर इतिहास वाचा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होतात असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी भारत माता की जय या नाऱ्याची चेष्टा केली. ज्या नाऱ्यांनी आपल्याला स्फुरण चढतं, त्याची चेष्टा केली असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या या भाषणात मुंबईत सैन्याचं संग्रहायल तयार करणार असल्याचं सांगितलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला.

दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिद प्रकरणात सगळे लपून बसले होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे समोर आले असं म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. बाबरी मशिद पाडण्याचं श्रेय शिवसेना वारंवार घेते, मात्र एकतरी शिवसैनिक तिथे होता का? असा प्रश्न यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की, कोणी जबाबदारी घेणार नसेल तर मी घेईल असं सांगितलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads