महाराष्ट्र
वडापूर सोलापूर एसटी बसची सेवा तात्काळ सुरू करा ; पत्रकार समीर शेख यांची मागणी
सोलापूर (मंद्रूप) : जिल्ह्यातील सर्वसामान्यांना शहराशी जोडणारी ग्रामीण भागातील प्रत्येकाची जीवन वाहिनी अर्थात एसटीची वाहतूक सेवा होय. कोरोना महामारीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा घटनांनी बंद असलेली वडापूर सोलापूर एसटी बसची सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठनचे संस्थापक अध्यक्ष महंमद यासिन मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनानुसार मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठनचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार समीर शेख व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल धायगोडे यांनी गुरूवार दि. १२ मे रोजी एसटी महामंडळाकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील दोन वर्षापासून कोरोनानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बंद होती. मात्र ही सर्व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून सध्या लग्नसराई असल्यामुळे येण्या-जाण्यासाठी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गावातील जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले-मुली अशांना रुग्णालयाच्या कामाकरिता सोलापूर शहरात घेऊन जाणे आणि तेथून पुन्हा घेऊन येणे अवघड झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने यावरती योग्य ती उपाययोजना करून वडापूर ते सोलापूर सकाळी नऊ वाजता, दुपारी दोन वाजता, सायकाळी पाच वाजता यावेळी एसटीची वाहतूक सेवा सुरू करून महामंडळाने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनामार्फत मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठनकडुन महामंडळाकडे करण्यात आली आहे.
यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पत्रकार समीर शेख,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल धायगोडे , मानवाधिकार न्याय सुरक्षा संघठनचे सोलापूर जिल्हा मिडिया प्रमुख विजयकुमार लोंढे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक वाय व्ही घुगे, लिपिक महेश क्षिरसागर , लिपिक प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा