संजय गांधी निराधार योजनेची नवीन लाभार्थी निवडी बाबत तात्काळ बैठक आयोजित करा - मनसे ची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

संजय गांधी निराधार योजनेची नवीन लाभार्थी निवडी बाबत तात्काळ बैठक आयोजित करा - मनसे ची मागणी

  जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 गेल्या अनेक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना अनुदान मिळावे यासाठी अनेक नवीन अर्जदारांनी ऑनलाईन तथा ऑफ लाईन देखील अर्ज आपल्या कार्यालयाकडे जमा केलेली आहेत. मात्र बऱ्याच दिवसापासून संजय गांधी निराधार योजनेची बैठक च न झाल्याने नवीन अर्जदार हे योजनेपासून वंचित च आहे अशी अनेक लाभार्थी यांची भावना आहे. संबंधित योजनेत अनेक विधवा , वृध्द , निराधार , अपंग , अश्या ना शासनाच्या या योजनेवर अवलंबून असल्याने अश्याना शासनाने तात्काळ आधार व न्याय द्यावा यासाठी जामनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की संबंधित विभागाची तात्काळ बैठक लावून या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा.यासाठी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी जामनेर तहसील ला माननीय सतीश इंगळे यांना निवेदन दिले. यावेळी डॉ विजयानंद कुलकर्णी , आशा कोठारी , किशोर पाटील , आशुतोष पाटील , संदीप मराठे , सोपान लहासे , रतन देशमुख , नाना शिंदे , किरण अहिरे , विशाल चव्हाण , नितीन भोपळे , मयूर कोळी , स्वप्नील माळी , अतुल माळी , अशपाक देशमुख , गजानन सरोदे , सागर जोशी , अरुण भोसले , नाना गावंडे , गोविंदा बनकर , जितू पाटील , ज्ञानेश्वर चिंचोले, विजय पाटील,वाल्मीक कोळी ,अंकित कोळी, अमोल पाटील ,जगदीश कुरकुरे, मुकेश जाधव ,विनोद चव्हाण ,अनिल मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads