राज्याच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाच्या घोषणा - दैनिक शिवस्वराज्य

राज्याच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाच्या घोषणा


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत.

१) शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 200 कोटी दरमहा देण्यात येतील, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


२) आरोग्य व्यवस्थेसाठी विविध तरतूदी
राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार. लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी देणार. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार.

३) पुण्यात आणखी एक विमानतळ व मुंबईसाठी.
अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुणे शहरात नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले.
पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटी किमतीच्या आठ पदरी रिंग रोडचे करण्यात येईल. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असं अजित पवार यांनी म्हटलं.

मुंबईसाठी.
शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प २०२२ ला पूर्ण करणार. त्याचबरोबर वरळी ते शिवडी पूलाचे काम ३ वर्षात पूर्ण केले जाणार.मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार. तसेच वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार. कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार.मुंबईतील १४ मेट्रोलाईनसाठी १ लाख ४० हजार कोटी खर्च अपेक्षित असून, मेट्रो मार्ग २ अ, ७चे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य. मुंबईत रेल्वे रुळांवरील ७ उड्डाणपूल उभारणार.

४) एसटी महामंडळाला १ हजार ४०० कोटींचा निधी
राज्याच्या ग्रामीण भागात १० हजार किमी रस्त्यांची कामे आगामी काळात करण्यात येतील. त्याचबरोबर पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला राज्य सरकारची मंजुरी देण्यात आली आहे. पुणे-नाशिक मार्गावर २४ प्रकल्प उभारणार.

५) महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण :- 1367 कोटींची तरतूद महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण लवकरच जाहीर करणार महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु करणार पर्यटन विभागासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारणार सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपये

६) राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना
स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

७) सिंचन
राज्याच्या सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देण्यात येणार. त्याबरोबर जलसंपदा विभागाच्या २७८ कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. राज्यात २७८ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री सिंचन योजनेतंर्गत २६ प्रकल्पांना २१६९८ कोटी रुपये देणार. महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहे.

८) कृषी विद्यापीठांना दरमहा २०० कोटी
कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील ४ कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी २०० कोटी दरमहा देण्यात येतील.-अजित पवार

९) स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी

  • जलजीवन अभियानांतर्गत 84 लाख नळजोडण्या दिल्या
  • मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 448 पेयजल योजना
  • स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी
  • १०)शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी
  • जिल्हा परिषद शाळांच्या पुनर्बांधणीसाठी 3 हजार कोटी
  • पुण्यातल्या क्रीडा विद्यापीठात 4 अभ्यासक्रम सुरू, 200 विद्यार्थ्यांना प्रवेश
  • शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी
  • नेहरु सेंटरला 10 कोटी रुपयांचा निधी
  • अमरावती विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला 10 कोटी रुपये
  • उच्च शिक्षण विभागास 1300 कोटी रुपये

इतर महत्वाचे मुद्दे !

  • आरोग्य विभागासाठी 2900 कोटींची तरतूद
    वैद्यकीय शिक्षणासाठी 1570 कोटींची तरतूद
  • कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्था सावरली - अजित पवार
  • आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटी
  • मनपा क्षेत्रासाठी 5 वर्षात पाच हजा कोटी
  • संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय सुरू करणार
  • 31 लाख 23 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी
  • शेतकर्‍यांना 19 हजार कोटी रुपये थेट वर्ग केले.
  • 45 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप
  • चार वर्षात बाजार समितीसाठी दोन हजार कोटींची तरतूद
  • कृषीपंपासाठी दीड हजार कोटींची तरतूद
  • विकेल ते पिकेल धोरण - 2100 कोटींची खरेदी
  • शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील,
  • महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्ज माफी योजना, 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना लाभ
  • राज्यभरात अहिल्याबाई होळकराच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटिका
  • चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपये देणार
  • राज्यात जलसंपदाची 278 कामे सुरू
  • जलसंपदासाठी12981कोटींची तरतूद
  • - गोसीखूर्द प्रकल्पासाठी 1000 कोटी
  • -पणन आणि वस्त्रोद्योगासाठी 1284 कोटींचा निधी
  • समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झाले आहे.
  • 26 सिचन प्रकल्प हाती घेतले आहेत.
  • पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणार
  • आपत्ती व्यवस्थापनासाठी 11 हजार 315 कोटींची तरतूद

आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads