महाराष्ट्र
पश्चिम बंगाल येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ करमाळा भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसच्या वतीने जो हिंसाचार केला आहे. त्या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करून २० जणांची हत्या करण्यात आली आहे तसेच अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्या विरोधात करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नायब तहसीलदार जाधव यांच्याकडे दि.०५/०५/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी गणेश चिवटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल मधील हिंसाचार हा लोकशाहीला घातक असून या हिंसाचारास येथील तृणमूल काँग्रेस सर्वस्वी जबाबदार आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
सदर निषेध निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हौसिंग, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड किसान मोर्चा ता.अध्यक्ष विजय नागवडे, तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा