महाराष्ट्र
यवतमाळ : वटपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात "एक गाव एक वडाचे झाड" उपक्रमाचे आयोजन....
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर :-
यवतमाळ :- दिनांक २४ जून २०२१ रोजी वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरातील प्रत्येक गावात ग्रामपंचायती कडून "एक गाव एक वडाचे झाड" हा नाविण्यपूर्ण उपक्रम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्या बाबत जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले. त्यावर प्रत्येक ग्रामपंचायतीने उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रत्येक गावात महिला लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते किमान एक वडाचे झाड लावावे व सदर कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशा सुचना तथा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी पंचायत विभाग, नरेगा विभाग यासह गट विकास अधिकारी यांना मंगळवार रोजी झालेल्या समन्वय सभेत दिल्यात.
आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा असणारा, गृहस्थ जीवनाचा पाया मजबूत करणारा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. सद्याचा काळ हा अत्यंत संकटाचा काळ आहे. कोरोना विषाणूने सर्वत्र जगभर थैमान घातले आहे. घरातील तरुण-वृध्द, गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण अशा सर्व वर्गातील व्यक्ती या महामारीचे शिकार होत आहे. अशावेळी सर्वाधिक गरज भासते ती म्हणजे प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची. मागील काळात ऑक्सिजन अभावी तळमळणारे जीव आपण पाहिले. आज ग्रामीण भागातील ऑक्सिजनचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट होत आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषद यवतमाळचे वतीने व ग्रामपंचायती अंतर्गत एक क्रांतिकारी चळवळ राबविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात किमान एक वडाचे झाड लावण्याचा व त्याचे जतन करण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हाभरातील सर्व गावात राबविण्यात यावा या बाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.कालिंदाताई पवार यांनी आवाहन केले आहे.
या उपक्रमची अमंलबजावणी धानोरा ग्रामपंचायतने केली असून उच्च माध्यमिक केंद्र शाळा धानोरा येथे गावच्या प्रथम नागरिक सौ. दिक्षाताई प्रविण मुन यांच्या हस्ते वडाचे एक झाड लावून आदेशाचे पालन केले आहे यावेळी ग्रामपंचायत सचिव महेश ईगोले, उपसरपंच विशाल येणोरकर, सदस्य अविनाश घोडे, विजय चकोले, रोजगार सेवक प्रकाश काबंळे, कर्मचारी राजु नेहारे, पांडुरंग कुभंरे, प्रविण मुन, सुधीर हटवार, प्रविण वाघ, प्रितम घिनमीने, निलेश वरघने, हे हजर होते
वड वृक्षाला वैज्ञानिक महत्व.....
- डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मु.का.अ. जि.प.यवतमाळ
आपल्याला माहितच आहे की, सुर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिये दरम्यान वनस्पती हया आपले अन्न तयार करतांना मोठया प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करतात. त्यामध्ये वड आणि पिंपळ यासारखे वृक्ष २४ तास ऑक्सिजन निर्मिती करतात. एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड सुमारे ६००० पाऊंड ऑक्सिजनचे उर्सजन करते म्हणजे अक्षरशः लाखो रुपयाचे ऑक्सिजन विनामोबदला आपल्याला मिळते. तसेच वडामध्ये औषधी गुणधर्म सुध्दा आहे. त्यामुळे वटवृक्षाला वैज्ञानिक महत्व प्राप्त आहे. तेव्हा वटपौणिमे निमित्य प्रत्येक गावात "एक गाव एक वडाचे झाड" या नाविण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जास्तीत-जास्त वटवृक्षाची लागवड करावी तथा त्याचे पुढील संपूर्ण संगोपन प्रत्येक नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा