स्पर्धक क्रमांक ८२ श्रुती सीताराम नरतवडेकर कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ८२ श्रुती सीताराम नरतवडेकर कोल्हापूर

राजा शिवछत्रपती
      स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही 
सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत .
       छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ म्हणजे 
छ : छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ती : तीन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वाः वाणिजे तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
मः महाराष्ट्राचे शान,
हाः हार न मानणारे,
राः राज्याचे हितचिंतक,
जः जनतेचा राजा.
     शिवरायाचा जन्म फाल्गुन वदय तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला . त्यांचा वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते . शहाजी राजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते . 
        शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते . बालपनाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युध्दकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली . कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायाबरोबर खेळत असत . मावळे हे शिवरायांचे प्रथम संवगडी होते .
        माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत . त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले . शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युध्दकला, घोडेबाजी शिकत असत.
    सांग ओरडून जगाला..
    भित नाही कोणाच्या
    बापला...
    छत्रपतींचा आशिर्वाद आहे
    या मराठ्याला...
    वाघनख्याने उभाच फाडतो 
     आम्ही आडवा येईल
       त्याला...
       वाघ म्हणतात या मर्दाला...
      शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि      
योग्य साथीदारांच्या सोबतीने ! . प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले. 
        पुन्हा सुदर पसरवू
        महाराष्ट्राची कीर्ति ।

        शिवरायांची स्मरून मुर्ती,

        शिवशंभूची घेऊया स्मूर्ती ।
        एकच ध्यास,
        जपू महाराष्ट्राची संस्कृती !
           इ . स . १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला . आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता . राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र   
स्वराज्याचे चलन सुरु केले . आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसूली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.
       शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते . तसेच  
स्वराज्यच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते . आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते .
          शिवकाळात नांदत होती सुःखात सारी प्रजा... !!
म्हणुन म्हणती शिवाजी,
माझा जाणता राजा... !!
     छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता . अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मावळली . असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतः च्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने ''छत्रपती " म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेले आहेत.
               धन्यवाद
Previous article
Next article

58 Comments to

  1. साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून हिंदवि स्‍वराज्यात सुख आणि शांतीने जगण्‍याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला .
    अश्या महान राजा विषयी चांगली माहिती दिलीस.
    *.अभिनंदन.*

    उत्तर द्याहटवा
  2. या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🚩🙏
    खूप छान

    उत्तर द्याहटवा
  3. Nice .....या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🚩🙏

    उत्तर द्याहटवा
  4. पुन्हा सुदर पसरवू
    महाराष्ट्राची कीर्ति ।

    शिवरायांची स्मरून मुर्ती,

    शिवशंभूची घेऊया स्मूर्ती ।
    एकच ध्यास,
    जपू महाराष्ट्राची संस्कृती !

    उत्तर द्याहटवा
  5. श्रुती खूप सुंदर अभिमान आहे मला

    उत्तर द्याहटवा
  6. आतिषय सुंदर आहे निबंध....जय शिवराय...🚩🚩🚩🚩🚩🚩

    उत्तर द्याहटवा
  7. उत्तम प्रकारे निबंध तयार केला आहे 🚩👍🏻

    उत्तर द्याहटवा
  8. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🎌🎌

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads