Blog
स्पर्धक क्रमांक ९४ कृष्णा सर्वेश कश्यप
राजा शिवछत्रपती
छत्रपति शिवाजी महाराज
छ:- छत्तीस हत्तीचे बळ
असणारे ,
त्र:-त्रस्त मोगलांना करणारे,
प:-परत न फिरणारे,
ति:-तिन्ही जगात जाणणारे,
शि:-शिस्तप्रिय,
वा:-वाणिज तेज,
जी:-जीजाऊचे पुत्र,
म:-महाराष्ट्राची शान,
हा:-हार न मानणारे,
रा:-राज्याचे हितचिंतक,
ज:-जनतेचा राजा,
प्रतिकूल राजकीय परिस्थितित कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिली. कारण त्यांना
ते शिवाजी महाराजांचे राज्य असे कधीच वाटले नाही. त्यांनी ते राज्य स्वत:चे मानले. अशी घटनाच देशाच्या इतिहासत अनोखी व एकमेव होती.
जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजी महाराज प्रतिनिधि होते. लढायांमागून लढाया औरंगजेबाने
जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही . एक सामान्य जहागिरदाराच्या मुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे
म्हणजे सामान्य बाब नव्हे .
खरोखर स्वत:क्या हिंमतिवर, समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे कल्पक पुरूष होते. स्वराज्य स्थापन करताणा जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्यस्थापन करतांना त्यांच्या पुढे कठीन अडचणी आल्या. संकटांचे महापूर आले. परंतु ते हरहुन्नरी,निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा अग्र्याची नजरकैद असो, ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.
शिवाजी महाराजांचे राज्य स्वत:चे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. श्रीमान योगी होते. आपले शोर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या , मृतप्राय समाजाला शुध्दीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकत्य्रांविरूद्ध दंड थोपटून राहन्याचे सामार्थ निर्माण केले.
शिवाजी महाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुर्नरचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला शाप ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली . साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरित विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध ,शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी , कर्तबगार . स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत होते .
महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक
क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला. ठेकेदारी, सावकारी,
दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्म रक्षक होते व क्रांतिकारकही होते . त्यांचा धर्माभिमान औरंजेबासारखा नव्हता परधर्मसहिष्णु होते. उदारमतवादी होते.
सर्व धर्मांना,मतांना,आचारांना त्यांचे सादर व सप्रेम संरक्षण होते. आग्राच्या नजरकैदेत असताना त्यांचा अंगरक्षक मदारी मेहतर होता. तो महाराजांचा विश्वासू सेवक होता. प्रजेला अत्यंत शुद्ध समतल, स्वस्त व जलद न्याय मिळण्याची सर्व व्यवस्था महाराजांनी केली .
रोख आर्थिक व्यवहार अमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा पहिलाच राजा होता. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपने आखली.
स्वत:चे त्याचे चारित्र्य निष्कलंक,
स्वच्छ होते. शुद्ध मन सभ्दावना व सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता . प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दु:खाचा नाश करणारा हा लोक-नायक होता. खर्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या सदगुणांचा वारसा
मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.
जय भवानी
जय शिवाजी
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा