स्पर्धक क्रमांक ९५ आस्तिक मनोहर परिहार गोंदिया - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ९५ आस्तिक मनोहर परिहार गोंदिया

राजा शिवछत्रपती

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे
कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही!!"


छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील च नाही तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत. इतिहासातील एक अजरामर नावं ज्यांच नाव ओठी येताच साहस, आत्मविश्वास, सामर्थ्य, धैर्य, चिकाटी, जिद्द, बळ,  अशा असंख्य शब्दांचा जन्म होतो अन् आपल्या मनात नवी ऊर्जा, स्फुर्ती निर्माण होते. आणि मनातील भिती कायम दूर होऊन कोणत्याही परिस्थितीशी लढण्याचे शौर्य उरी उदयास येते.. 

        आपल्या शत्रुला परास्त करायचं आहे तर शिवाजी नावंच पुरेसं आहे. १६०० च्या दशकात उत्तरेस मोघल साम्राज्याचे अन् दक्षिणेस आदिलशाहीचे वर्चस्व होते त्याच काळात १९ फेब्रुवारीला  त्यांचा जन्म झाला ते बालपणापासूनचं एक चांगले लढवय्ये व बुध्दीमान होते. त्यांना राजनैतिक शिक्षणाची सोय व युद्ध कला लहानपणीच त्यांना त्यांच्या महलात अवगत झालेली होती.. जिजाऊ माता विरांच्या यशोगाथांच्या कथा त्यांना सांगत आणि तिथून ते प्रेरणा घेत..

    मोगलांच्या, आदिलशहाच्या क्रुर शासनाने त्रस्त झालेल्या जनतेला एक राजा हवा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ ती आणि निघाले. अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपलेच सवंगडी आणि थोडे सैनिक जमवून  तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. हळूहळू आजुबाजूची सर्व किल्ले त्यांनी हाती घेतले...

    महारांच्या स्वराज्य निर्माण करण्याच्या बिड्यात वाईट कर्म करणाऱ्यांना मृत्यू दंडाची शिक्षा होती कुणी पाप कर्म केल्यास सरळ त्याला फासावर चढवल्या जायचा. कर वसुली चे दर ही नाहिसे करण्यात आले होते. यामुळे सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता जनतेला एक उत्कृष्ट राजा मिळाला होता. महारांच्या सैनिक तुकडीत तानाजी मालुसरे, यशाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, होनाजी, जीवा महाला यांच्यासारखे सामर्थ्यवान सैनिक होते. जे साक्षात मृत्यू ला देखील घाबरत नव्हते..
     
    मोगलांच्या हजारो सैनिकांना, त्यांच्या क्रुर किल्लेदारांना, अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रुंना आपल्या चातुर्याने, पराक्रमाने गनिमी काव्याच्या तंत्राने पराभूत करत महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.
६ जून रोजी महारांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला आणि अखंड महाराष्ट्राला राजा शिवछत्रपती मिळाला यात मुघल साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले. १६८० मध्ये छत्रपतींचा मृत्यू झाला तरी संपूर्ण भारतवर्षात मराठ्यांचा राज्यविस्तार होतंच राहिला.

१६३० ते १७०७ अकबराच्या मृत्यू पर्यंतच्या कालावधीला "शिवकाल" असे म्हणतात. तो काळ इतिहासातील सुवर्णकाळ होता ज्यात राजे शिवछत्रपती होते..

सह्याद्रीत सिंह गर्जला
शिवशंभू राजा,
दरिदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा..!


जय शिवराय
Previous article
Next article

1 Comments

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads