Blog
स्पर्धक क्रमांक १६ गणेश राजाभाऊ काळे बीड
राजा छत्रपती निबंध
सर्व प्रथम, रयतेचा राजा शिवछत्रपतींना, माझा त्रिवार मानाचा मुजरा..........
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले.
जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा, राजे, या नावाने ओळखते. त्याच्या वडिलांचे नाव शहाजी राजे आणि आईचे नाव जिजाबाई असे आहे. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जिजाबाई त्यांना लहानपणी रामायण, महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले.
वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. जेंव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते तेंव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.
प्रतिपच्चंद्रलेखव वर्धिष्णूर्विश्चवंदिता शाहसुनौ:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजत
म्हणजे जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि विश्वात वंदनीय होतो तशीच शिवाजी महाराजांची ही मुद्रा तिचा लौकिक वाढत जाईल.
शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.
३ एप्रिल १६८० रोजी राजगड किल्ल्यावर शिवरायांचा मृत्यू झाला.
स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन स्वतंत्र निर्माण करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासुन दुरावले.
राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला,
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला.
शिवाजीराजांना राजकारणातील डावपेच उपजत लाभले होते. शिवाजीराजांनी महाराष्ट्रातील सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून, उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशहा व कुतुबशहा, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज व पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण झाले.
आज शिवाजी महाराज असते तर पाकिस्तान, चीन अफगाणिस्तान या शत्रूंची वारंवार डोके वर काढण्याची हिम्मत झाली नसती.
शिवाजी महाराजांनी शुन्यातून राज्य निर्माण केले. पण त्यांना त्याबद्दल कधीच लालसा नव्हती. हे प्रजेचे राज्य आहे, हे त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य घडविले होते. राजे राजे हित दक्ष होते. राजांना अन्यायी, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी लोकांना राजे कठोर शासन करत असत.
बेदिली करणाऱ्या स्वत:च्या पोटचा पोर संभाजी व्यंकोजी हे ही राजांच्या कडक शासनातील सुटले नाहीत.
आताच्या काळात शिवाजी राजे असते, तर असे भ्रष्टाचार झालेच नसते.
आधुनिक स्त्री प्रत्येक क्षेत्रात मोठ्या समर्थपणे वावरताना दिसते आणि तरीही त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार होत असलेले दिसतात.
शिवाजी राजे असते तर त्यांना निर्भयता लागली असती;कारण ते स्वत:परस्त्री मातेसमान मानत असत आणि स्त्रियांच्या संदर्भात वाईट वर्तन करणाऱ्यांचे हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्यासही ते मागे पुढे पाहत नसत.
शिवाजी महाराजांच्या काळात प्रदूषणाचा प्रश्न नव्हता. परंतु, पर्यावरणातील संतुलनाची राजांना कल्पना होती. म्हणून तर झाडांना संवर्धनाची त्यांची विशेष काळजी घेतली होती. राजे धर्मनिष्ठ होते;परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. आताच्या विज्ञान युगात राज्य असते, तर ढोंगी माणसे आपले बस्तान बसवू शकली नसती. राजांनी राज्यव्यवहार कोश तयार करवले होते.
आज शिवाजी राजे असते तर सध्या भाषेच्या बाबतीत माजलेल्या गोंधळ उद्धवला नसता. मातृभाषेला प्रोत्साहन देऊन महाराजांनी आवश्यक तेथेच इंग्रजीचा स्विकार केला असता.
परंतु परकीय भाषेचे आर्कमण सहण केले नसते, नवनवीन शस्त्राकडे महारांचे नेहमी लक्ष असते. हे आठवले की वाटते लष्कर, आरमार, हवाईदल या संरक्षणाच्या सर्वच फळ्या राजांनी नेहमी अत्याधुनिक ठेवल्या असत्या.,
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा