स्पर्धक क्रमांक ६१ सानिका गणपत सावंत सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ६१ सानिका गणपत सावंत सिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते .त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० पुणे जिल्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलेली स्वराज्य  स्थापना ही हिंदुस्थानच्या इतिहासातील एक महान घटना मानली जाते. परिणामी शिवछत्रपतींचे कार्य म्हणजे स्वराज्य स्थापनेचे कार्य आहे असे समीकरण होऊन बसले आहे .
         शिवछत्रपती म्हटले की , स्वराज्याची क्रांती नजरेसमोर येते; पण स्वराज्याच्या क्रांतीबरोबर त्यांनी तत्कालीन मराठी समाजातही क्रांती घडऊन आणण्याचे अनेक प्रयत्न केले याकडे जावे तितके लक्ष्य जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराजांनी  महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रातही नवे दंडक निर्माण केले. शिवाजी महाराज एक शूर , बुद्धिमान आणि निर्भय शासक होते.
           नांगर धरणाऱ्या मावळ्यांच्या बळकट हातात तलवार देऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील एक महान राजे होते. स्वतःच्या धर्मासोबत इतर धर्माचाही त्यांना आदर होता. महाराजांचे आपल्या स्वराज्यावर , रयतेवर नितांत प्रेम होते. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली. या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले: पण राजांनी कधी माघार घेतली नाही. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला . अष्टप्रधानांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली " राज्यव्यवहार कोश " तयार करून घेतला . शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृतात आहे. राजांनी स्वराज्याचे मानचिन्ह म्हणून भगव्या ध्वजाची निर्मिती केली. आपल्या राज्याचा कारभार कसा चालावा याबद्दल महाराजांनी काटेकोर नियम केले होते. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा अर्थ:
छ : छत्र बनले रयतेचे 
त्र : त्रस्त शत्रूला केले
प : पराक्रमी ते शूरवीर
ती: तिमिरास ज्यांनी चिरले 
शि: शिस्तप्रिय ते भारी
वा: वाणीत मधुरता असलेले
जी: जिजाऊंचे ते पुत्र
म: मराठी मनामनात अधिराज्य ज्यांचे
हा: हार कधी न मानणारे 
रा: राजे ते साऱ्या महाराष्ट्राचे 
ज: जनतेचे ते राजे 
      छत्रपती  शिवाजी  राजे
शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. आपणाला महाराजांच्या विचारांनी आपल्या ध्येय मार्गावर चालायचे आहे. मार्गावर अपयश येईल पण न घाबरता चालत राहायचे आहे. महाराष्ट्राचा हा जाणता राजा आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्रोत राहिलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना अगदी कडक शासन केले .  
स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो. अशी महाराजांची भूमिका होती. हिमंत न हारता परिस्थितीवर मात करून विजयश्री खेचून आणण्याच्या त्यांच्या गुणांमुळेच ते माझे आदर्श आहेत.

विजेसारखी तलवार चालवून गेला !
निधड्या हातीने हिंदुस्थान हालवून गेला!
असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला!
असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला!

   धन्यवाद!!!
Previous article
Next article

11 Comments to

  1. अतिशय सुंदर शब्दात मांडलेला असा हा निबंध| खूपच छान

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर असा निबंध आहे...
    छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन खूप छान शब्दात रेखाटले आहे.....

    उत्तर द्याहटवा
  3. 👌👌👌😊👍 खूप छान निबंधलेखन !! विशेष म्हणजे व्याकरणात्मक दृष्ट्या तर शुध्द शब्द व शब्दांचं नियोजनही उत्तम !!

    सानिका ... बेटा तुला खूप खूप शुभेच्छा !! 👍👌🌹👍😊

    उत्तर द्याहटवा
  4. महाराजांन बद्दल खूप छान निबंध लिहला
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा,,,जय जिजाऊ जय शिवराय

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads