स्पर्धक क्रमांक ८५ अमृता आनंदकुमार यादव सातारा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ८५ अमृता आनंदकुमार यादव सातारा

राजा शिवछत्रपती

      
       श्वासांत रोखूनी वादळ .....
 डोळ्यात रोखली आग ..
 देव आमचा राजा शिवछत्रपती ..
 एकच हिंदू वाघ..
 हातात धरली तलवार .. 
 छातीत भरले पोलाद ..
 धन्य धन्य हा महाराष्ट्र ..
 धन्य हे आपले महाराज.
 राजा शिवछत्रपतींना माझा सर्व प्रथम मानाचा मुजरा..
        राजा शिवछत्रपतींचा इतिहास जसा शौर्याचा औदार्याचा , तसाच तो समतेचा देखील आहे. इतिहासावर नजर टाकल्यास शिवरायांच्या म्हणजे समतावाद सुस्पष्टपणा अधोरेखित होतो. 'भेदाभेद भ्रम अमंगळ'हा संत तुकारामांचा समतेचा संदेश शिवरायांनी शिरोधार्य मानला होता. शहाजीराजे जिजाऊ यांचे समतावादी संस्कार स्वराज्यातल्या मावळ्यांना संघटित करण्यासाठी शिवरायांना प्रेरणादायी ठरले होते. आजच्या संशयग्रस्त, कलुषित काळात शिवरायांचे समतेची महाराष्ट्राला, भारताला नितांत गरज आहे. इतिहासाच्या पानावर, जाने नाव आपले कोरले। जनतेच्या मनावर स्वराज्याचे स्वप्न रंगविले, भगवा झेंडा हातात घेऊनी, खिंड त्याने लढवली। आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्य निर्मिती केली.राजा शिवछत्रपतींचा इतिहास जसा ढोल तलवारींचा लढायाचा - शौर्याचा आहे, तसाच तो औदार्याचा आणि समतेचा देखील आहे. त्यांनी आपल्या राज्यात सार्वजनिक आणि खाजगी जीवनात कधीही भेदाभेद केली नाही. शिवरायांचं राज्य केवळ एका धर्माचं, एका जातीचं, एका पंथाच, किंवा एका घराण्याचा राज्य नव्हतं, तर त्याचं राज्य *'रयतेचं'* राज्य होतं. रयत याचा अर्थ 'प्रजा'. प्रजा  म्हणजे तमाम जनता आणि अर्थात रयतेच राज्य म्हणजे सर्व जाती धर्माचं जनतेचे राज्य होय.
   त्यांच्या सैन्यात अक्षरशः सगळ्या जाती धर्माचे मावळे होते. शिवरायांच्या स्वराज्यात अत्यंत महत्त्वाचे पदांवर ही सगळ्या जातीधर्मातील सहकारी होते. स्वराज्यात अत्यंत महत्वाचं पद म्हणजे 'गुप्तहेर प्रमुख'. शिवरायांच्या गुप्तहेर पदी बहिर्जी नाईक होते. हे रामोशी समाजाचे होते. आजच्या शासन प्रणालीत 'आयबी रॉ' आदी केंद्रसरकारी गुप्तचर संख्या आहेत. कोणत्याही राजाच्या यशस्वी शासन प्रणालीसाठी गुप्तचर यंत्रणा अत्यंत महत्वाची असते. अशा संस्थेच्या प्रमुख पदी शिवरायांनी रामोशी समाजातल्या सहकार्याची नियुक्ती केली होती. मदारी मेहतर हा सहकारी होता.मी तर या समाजाची व्यवस्था १७ शतकात काय असेल? पण शिवरायांनी मदारी मेहतर यांना अत्यंत विश्वासी सहकारी म्हणून निवडलं होतं. यावरून हे स्पष्ट होतं की राजा शिवछत्रपतींनी आपल्या जीवनात अस्पृश्यतेला थारा दिलेला नव्हता. तसेच अफजलखान भेटीच्या प्रसंगी शिवरायांवर पडणारा सय्यद बंडाचा वार जिवाजी महाले यांनी वरच्यावर उडवला. क्षणाचाही विलंब झाला असता तर काय झालं असतं? जिवाजी महाले हे नाभिक समाजातले होते. त्यांच्यामुळे शिवरायांचे प्राण वाचले. त्यामुळेच इतिहासात म्हटले जाते की होते 'जिवाजी म्हणून वाचले शिवाजी'. जिवाजी प्रमाणेच शिवाजी काशीद हे नाभिक समाजातले होते. पन्हाळा वेड्याच्या प्रसंगी ते प्रती शिवाजी होऊन सिद्धीच्या भेटीला  गेले. तिथे त्यांना ओळखले गेले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हंबीरराव मोहिते, नेमाजी शिंदे, प्रतापराव गुजर इ. शूर विरांनी आनंदाने मृत्यूला मिठी मारली. पण त्यांची शिवरायांवरची आणि स्वराज्यावरची निष्ठा बदलली नाही. याचं कारण म्हणजे शिवरायांनी भेदभाव कधीही बाळगला नाही.
     राजा शिवछत्रपतींनी आपल्या राज्यात भेदाभेद केली नाही, हे वरच्या सगळ्या उदा. वरुन स्पष्ट होते. शिवरायांनी खऱ्या अर्थाने समतेच स्वराज्य निर्माण केलं. आज आपणही शिवरायांपासून प्रेरणा घेऊन समतावादी भूमिका हे खरे शिवप्रेम होय. आपल्या गावात नगरात ही स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या मावळ्यांची वारसदार आहेत. शिवरायांनी विषमता बाळगले नाही. हा शिवरायांचा उत्तात गुण होता. शिवरायांच्या समतावाद भूमिकेचा गौरव करताना महात्मा फुले म्हणतात 'लंगोट्यास देई‌ जाणवे पोशिंदा कुणब्याचा। काळ तो असे यवनाचा ।।कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा। छत्रपती शिवरायांचा।।' लंगोट परिधान करणाऱ्या मावळ्यांना शिवरायांनी लढण्याचा अधिकार दिला. त्यांना शिलेदार, सुभेदार, बारगीर, गुप्तहेर, किल्लेदार, इ . पदांवर नेमले. जानव दिली म्हणजे प्रतिष्ठा मिळवून दिली. कष्ट करणाऱ्या रयतेचं पालनपोषण केलं. कुळवाडी भूषण म्हणजे सगळ्यांचाच राजा. भोसले कुळात जन्मलेला शिवाजी. महाराज हे कष्टकरी, श्रमकरी, उपेक्षित, वंचित, गोरगरीब रयतेचे राजे होते. अशा छत्रपती शिवाजी राजाचा पोवाडा महात्मा फुले हे मोठ्या अभिमानाने गातात. राजा शिवछत्रपतींचा कालखंड १७ शतकातला आहे. १७ शतक म्हणजे मध्ययुगीन कालखंड होय. नंतरच्या काळात राष्ट्रवाद, देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, स्त्री-स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, समता, इ. मुलांच्या जयजयकार करणाऱ्या युरोपमध्ये १७ शतकात अंधार युगच होता. तरी अशा काळात राजा शिवछत्रपतींनी जोपासलेल्या समतावाद आजही दीपस्तंभासारखे आहे. शिवरायांनी विषमता, शोषण, गुलामगिरी त्यामुळेच ते व्यापारी करार करण्यासाठी ६ ऑगस्ट १६७७ रोजी आलेला डच प्रतिनिधींना म्हणाले होते. आदिलशाहीच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून आणि विकण्याची यांना अनिर्बंध परवानगी होती. पण माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची आणि आणि विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तर, माझी माणसे (अधिकारी) तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे. मध्ययुगीन काळात शिवरायांनी गुलामगिरीविरुद्ध घेतलेली ही कडक भूमिका केवळ भारतीयांसाठीच  नव्हे तर जगासाठी प्रेरणादायक आहे. शिवरायांच्या समतावादी भूमिकेचा गौरव करताना इतिहास, धर्मशास्त्र, तंत्रज्ञान, प्राच्यविद्या यांच्या अभ्यासक शरद पाटील म्हणतात की- शिवाजी महाराजांचा व संभाजी महाराजांचा खरं महात्म्य त्यांच्या समतावादी शात्क हौतात्म्य आहे.शिवरायांना तुळजाभवानी बद्दल नितांत आदर होता. त्या आदरापोटी त्यांनी प्रतापगडावर तुळजाभवानीचे मंदिर बांधून घेतले. या पाठीमागे भावडा भाव नव्हता, तर समतेचे तत्त्वज्ञान होतं. तुळजा ही  समतावादी होती. 'तुळा' म्हणजे मोजमापन. आपल्या राज्यातल्या उत्पादनाचा भाग समान मोजून प्राचीला समान वाटप करणारे तेरणा- मांजरा खोऱ्यातील महामाता म्हणजे तुळजाभवानी होय.
      जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्धितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते. शिवरायांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा होय. सैन्याबरोबर राहून त्यांनी सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगाना आनंदाने तोड दिले.
   संपूर्ण जगातील सेनानायकाच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे आहे. १६४५-१६८० या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थशाली मोगलांचा किवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किवा मुस्लिम सेनानायक नव्हता की, ज्यांचा महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायापुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजलखानाशी केलेले युद्ध, शायस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी वरील विधानांची व गुणांची प्रचिती देतात.
शिवरायानी समानतेचे तत्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना समाविष्ठ करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. ही मोठी गोष्ट याठिकाणी नमूद कराविशी वाटते. शेकडो सेनाधूरधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे राजाच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले.
     शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असे. शहाजी राजाची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका, विशाल गडावरच्या चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते.
विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रुपात पाहत होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे ‘महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.
     राजे शिवछत्रपती हे वारकरी, पंत - सुफी  यांना मानणारे होते.
     राजा शिवछत्रपतींचे हेच समतावादी संस्कार आत्मसात करून आपणही आपापसातले जातीय, धार्मिक, विद्वेष दूर करून समतावादी समाज निर्माण करायला हवा. आज सभोवताली‌ जातीय - धार्मिक - सांस्कृतिक - भाषिक - प्रांतीय विद्वेषान समाज त्रस्त झालेला आहे. वातावरण अत्यंत कलुषित संशयग्रस्त आणि कृत्रिम झालेला आहे. अशा काळात राजा शिवछत्रपतींचा महाराष्ट्राला, भारताला नितांत गरज आहे. समतेचे तत्त्वज्ञान घेऊन समतावादी लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे युगपुरुष म्हणजेच राजा शिवछत्रपती होय. राजा शिवछत्रपतींचा रयतेच्या या समतावादी राज्याला त्रिवार वंदन.
      निबंधाचा शेवट मी एका कविते रुपी करत आहे. 
      आई जिजाऊच्या पोटी जन्मला एक तेजस्वी तारा, अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा, असा होता माझा शिवछत्रपती राजा।
        प्रजेचे दुःख जाणणारा, परस्त्रीला आई मानणारा, नव्हती सीमा त्याच्या पराक्रमाला, शौर्य आणि स्मृतीचा झरा , असा होता माझा शिवछत्रपती राजा।
        जुलूम आणि अत्याचाराने त्रस्त होती प्रजा, दावली प्रकाशाची वाट दूर केला अंधार सारा , असा होता माझा शिवछत्रपती राजा।
       रायरेश्वराच्या मंदिरात घेतली प्रतिज्ञा, घेतले मावळ्यांना सोबतीला, गड जिंकला तोरणा , स्वराज्याचा पाया रोवला, असा होता माझा शिवछत्रपती राजा।
      होता धिप्पाड असा अफजलखान, चपळाईने त्याच्या पोटावर केला वाघनख्या  मार, बिचव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला, असा होता माझा शिवछत्रपती राजा।
      स्वराज्याकडे केली वाकडी नजर, बोटे त्याची छाटली, वाणी त्याच्या मधुरता, डोळ्यांमध्ये होता अंगारा, असा होता माझा शिवाजी राजा। असा होता माझा शिवछत्रपती राजा।
Previous article
Next article

4 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads