Blog
स्पर्धक क्रमांक ८४ मयुरी चांगदेव जाधव सातारा
छत्रपती शिवाजी महाराज
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः
शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्यचे संस्थापक होते. शिवाजी महाराज एक शूर, बुद्धिमान आणि निर्भय शासक होते. त्यांना धार्मिक पद्धतींमध्ये खूप आवड होती. ते रामायण आणि महाभारत यांचे सखोल पालन करीत होते.
शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे बालपण राजा राम, संन्यासी आणि रामायण, महाभारत या कथासंग्रहांत आणि संतसंगात गेले.
१६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.स्वराज्याची स्थापना झाली होती तरी स्वराज्याभोवती शत्रूचा. सुळसुळाट होताच. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीरांनी स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.
शत्रूचा बिमोड झाल्यावर शिवरायांची प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता. अपराध्यांना शिक्षा होत होती.
त्यांचा राज्यभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. शिवरायांच्या राज्यभिषेकानंतरच ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुखा-समाधानाने नांदू लागली. प्रजेवर अन्याय होऊ नये, तक्रारींचे निवारण लगेच व्हावं व राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले होते.
स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले. अखंड परिश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतच होता. तरीही ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले. सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाच्या मृत्यू (१७०७) ह्या काळास इतिहासकार शिवकाळ असे म्हणतात.
जय शिवाजी !! जय भवानी !!
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा