संपुर्ण रत्नागिरी जिल्हयात कर्फ्यू नाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ११ व १२ जूनला कर्फ्यू - दैनिक शिवस्वराज्य

संपुर्ण रत्नागिरी जिल्हयात कर्फ्यू नाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ११ व १२ जूनला कर्फ्यू


राकेश कोळी
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या अति मुसळधार पावसाच्नुळे जिल्ह्यातील समुद्र किनारा,  खाडी किनारी व नदी किनाऱ्यावरील गावामध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे व दरडग्रस्त ठिकाणे या ठिकाणी लोकांच्या प्रवासासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा याच्या आदेशान्वये ११ आणि १२ जून रोजी प्रतिबंध केल्याचा नवीन आदेश लागू करण्यात आला आहे. 
       जिल्हयातील चिपळूण नगरपरिषद, खेड नगरपरिषद, राजापूर नगरपरिषद व ग्रामीण भागातील किनाऱ्यावरील गावांचा समावेश आहे. यासंर्दभात जिल्हाधिकारी लक्ष्मीनरायण मिश्रा यांच्याकडून शुक्रवारी हे अधिकृत आदेश प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी दिनांक ११ ते १२ जून २०२१ या कालावधीत रत्नागिरी जिल्हयामध्ये अति मुसळधार व अत्यंत अति मुसळधार पाऊस अथवा अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनाऱ्यावरील गावामध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये चिपळूण नगरपरिषद, खेड नगरपरिषद, राजापूर नगरपरिषद हद्दीमध्ये व ग्रामीण भागातील गावामध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे . तसेच दरड प्रवण क्षेत्रामध्ये दरड कोसळून रस्ता वाहतुकीस बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे जिवीत व वित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सदर क्षेत्रात जिवीत व वित हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकांची जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी समुद्र व खाडी / नदी किनाऱ्यावरील पुरस्थिती निर्माण होणारी गावे व दरडग्रस्त ठिकाणे या ठिकाणी लोकांना प्रवास करणेसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ अन्वये दिनांक ११ ते १२ जून २०२१ या दोन दिवसाच्या कालावधीसाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित रहावे सर्व संबंधित तहसीलदार यांनी आपले तालुक्यातील पुरप्रवण व दरडप्रवण क्षेत्रात सदर आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी असे ही आदेश देण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads