महाराष्ट्र
भक्त निवासमध्ये कोविड आयसोलेशन सेंटर
राकेश कोळी
रत्नागिरी जिल्हयातील पावस येथील कोरोनामुक्त महाराष्ट्र व माझे गाव माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत, ग्रामपंचायत पावस व स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी स्वरूपानंद भक्त निवास येथे उभारलेल्या ग्राम विलगीकरण केंद्राचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर ट्रस्टी, कार्याध्यक्ष जयंत देसाई, आनंद देसाई, सरपंच आरोही गुरव, ग्राम पंचायत सदस्य प्रमुख उपस्थित होते. या सेंटरमध्ये तीस रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या आहाराची आणि नाश्त्याची जबाबदारी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने स्वीकारली असून या विलगिकरण केंद्रात रुग्णांवर वैदयकिय अधिकाऱ्यांबरोबर गावातील इतर डॉक्टर्स ही उपचार करण्याची तयारी दाखवली आहे. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आरोग्य सभापती उदय बने, माजी आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, जिल्हा परिषद सदस्या आरती तोडणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा