केश शिल्पी बोर्डाची सर्व संघटनांनी एकत्र मागणी करावी : संजय पंडित - दैनिक शिवस्वराज्य

केश शिल्पी बोर्डाची सर्व संघटनांनी एकत्र मागणी करावी : संजय पंडित



परभणीजिल्हा प्रतिनिधी महादेव शिंदे :- 

लॉक डाऊन च्या दरम्यान सर्वात जास्त नुकसान नाभिक समाजाचे झाले आहे,
सलून व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने लॉक डाऊन च्या काळात व्यवसायिकांना उपासमारीला तोंड द्यावे लागले होते,
आज लॉक डाऊन संपून देखील कोरोनच्या भीतीने ग्राहकांनी सलून कडे पाठ फिरवल्याने सलून व्यवसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत,परणामी उत्पन्नच घटल्याने सकल नाभिक समाजात आज चिंतेचे वातावरन आहे,
सलून व्यवसाय सकल नाभिक समाजाचा कणा असल्याने समाजातील जवळजवळ ८० टक्के समाज आपल्या पारंपरिक सलून व्यवसायात कार्यरत आहेत,
त्यामुळे आपला पारंपारीक व्यवसाय टिकविणे प्रत्येक सलून व्यवसायिकाचे आज कर्तव्य बनले आहे,
पुरेसे अर्थ सहाय्य नसल्याने आणि व्यवसायातील आधुनिकी करणाच्या अभावामुळे आमचा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत मागे पडत चालला आहे, कोणत्याही प्रकारची सरकारी सवलत अथवा योजना सलून व्यवसायिकांना मिळत नसल्याने सध्याच्या स्पर्धेच्या युगात सलून व्यवसायिक खूपच अडचणीत सापडला आहे आहे,
समाजातील आपल्या
संपूर्ण सलून व्यवसायात परिवर्तन आणून व्यवसायाला चालना देण्यासाठी नाभिक समाजातील सर्व संघटनांनी गट तट विसरून सकल नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडे एकविचाराणे केश शिल्पी बोर्ड पुनर्गठीत करण्याची मागणी करावी असे आवाहन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित यांनी सर्व संघटनांना केले आहे.
नाभिक समाजात आज जवळ जवळ शंभराच्या वर संघटना कार्यरत आहेत,एकट्या महा मंडळाचेच पाच सहा गट कार्यरत आहेत,या सर्वच संघटनांनी जर राज्य सरकारकडे केश शिल्पी बोर्ड पूनरगठीत करण्या संबंधीची मागणी निवेदना द्वारे केली तर सरकार वर दबाव येऊन सरकार नक्कीच नाभिक समाजाचा सहानुभूतीने विचार करील आणि आणि समाजाला अपेक्षित असलेले केश शिल्पी बोर्ड लवकरात लवकर पूनारगठीत करण्याच्या बाबतीत सकारात्मक पावले उचलेल आणि आपल्या समाज विकासाला व सलून व्यवसाय परिवर्तनाला गती मिळेल,
सर्व संघटनांनी केश शिल्पी बोर्डाच्या माध्यमातून समाजाला मिळणाऱ्या योजनांचे महत्व समजून घेऊन सरकारवर निवेदनाद्वारे मागणीचा पाठपुरावा करायला हवा,
प्रत्येक संघटनांनी आपल्या भागातील खासदार,आमदार तथा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनाही मागणीचे निवेदन द्यावे
म्हणजे सरकारवर आपला दबाव तयार होण्यास मदत होईल.
बांधवांनो,
आरक्षण,संरक्षण आणि इतरही बऱ्याच महत्वाच्या समाजाच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत,
परंतु सध्याची समाजाची अवस्था पाहता केश शिल्पी बोर्ड पुनार्गठीत करून घेणे काळाची गरज बनली आहे,
म्हणूनच समाजातील सर्व संघटनांनी आपसातील गैरसमज आणि हेवेदावे बाजूला करून एक विचाराने नाभिक समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी आणि सलून तथा ब्युटी पार्लर व्यवसायाला चालना देण्यासाठी केश शिल्पी बोर्ड लवकरात लवकर पूनर्गठीत करण्याची मागणी सर्वांनी सरकारकडे करावी ही कळकळीची नम्र विनंती
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads