Blog
स्पर्धक क्रमांक १०१ ऋतुजा दिलीप मोळे कोल्हापूर
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलेली स्वराज्य स्थापना ही हिंदुस्तानच्या इतिहासातील महान घटना मानली जाते. परिणामी छत्रपतीचे कार्य म्हणजे स्वराज्य स्थापनेचे, राज्यक्रांतीचे कार्य, असे समीकरण होऊन बसले आहे. छत्रपती म्हंटले की स्वराज्य क्रांती नजरे समोर येते, आणि ते स्वाभाविक आहे. त्यांनी स्वराज्य क्रांतीबरोबर तत्कालीन मराठी समाजात ही क्रांती घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले याकडे जावे तितके लक्ष जात नाही,ही वस्तुस्थिती आहे. स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यपासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासून मुक्तता हा ही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व संस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे.
केवळ प्रशासन, लष्कर, आरमार, व्यापार, उद्योग क्षेत्रात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे पायंडे, नवे दंड निर्माण केले. महाराजांनी कधीही हिंदू व बिगर हिंदू असा भेदभाव केला नाही.हिंदू धर्मियांच्या मंदिरांना अभय देऊन त्यांच्या व्यवस्थेसाठी उत्पन्न लावून दिले.त्याच प्रमाणे इतर धर्मियांची धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ,धर्मगुरू यांना ही अभय देऊन त्यांच्या व्यवस्थेसाठी उत्पन्न लावून दिल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
महाराजांनी महिलांना नेहमी आदराची वागणूक दिली. महिलांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शासन करून समाजातील नितीमूल्यांचे वर्धन केले. महाराजांच्या यशाचे रहस्य दुर्ग स्थापत्यात दडलेले आहे.आवश्यक वाटेल तिथे नव्याने किल्ल्यांची बांधणी केली.पोर्तुगीज, इंग्रज ,सिद्दी, वगैरे आरमारी शत्रूपासून आपल्या राज्याची पश्चिम सीमा व बंदरे सुरक्षित राहावीत म्हणुन जलदुर्ग बांधले, आरमार उभारले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुच्चय होय.
राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळश,
आणि दारात तुळस,
राजे तुम्ही होता म्हणून भरुन राहिले सुहासिनीचे कपाळ,
आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ......
जय भवानी जय शिवाजी....
Previous article
Next article
👌👍
उत्तर द्याहटवाअतिशय छान ...👌
उत्तर द्याहटवाGreat Article 👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा