महाराष्ट्र
दहावी बारावीच्या शाळा सुरू होतील - बच्चू कडू
राकेश कोळी उपसंपादक :-
महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या ही घटत आहे. लॉकडाऊनमध्येही शिथिलता मिळाली असून रुग्ण संख्या कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर शाळा सुरू करायला हरकत नाही. जर पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढला तर शाळा बंद देखील कराव्या लागतील. अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. आता शाळा महाविद्यालय सुरु करावी अशी मागणी पालक वर्गाकडून देखील केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेतच. पण आता जर पुन्हा त्या गावात प्रभाव वाढला तर अडचणी निर्माण होऊ शकतात. शिक्षण पून्हा होऊ शकते पण गेलेला माणूस पुन्हा येऊ शकत नाही असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. तरीही शाळा सुरू करण्यासाठी जी काही तयारी करावी लागते. ती तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतील. असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा