स्पर्धक क्रमांक ११६ कार्तिक सदानंद गोसावी सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ११६ कार्तिक सदानंद गोसावी सिंधुदुर्ग

राजा शिवछत्रपती

         निश्र्चयाचा महामेरू ।
        बहुती जणांसी आधारू  । 
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ।
    ह्या भूमंडळाला अक्षयॠणी करुन ठेवणारा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
    थकून भागून एका झाडाखाली बसावं , झाडाखाली विंचू निघाला . विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा , दगडाखाली साप निघावा . सापाला बघून पळत सुटाव , पळता पळता विहीरीत पडावं . विहीरीत मगर दिसावी . मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं , वर यावं तर वाघ दिसावा . वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहीरीत उडी टाकावी .उडी टाकता टाकता एका फांदीला पकडाव . फांदीच्या वर उठाव , मधाचा थेंब तोंडात पडावा . त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी " हिंदवी स्वराज्य " स्थापन केले . 
    इयत्ता चौथीत असताना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाव्दारे पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांची ओळख झाली . मुख्यपृष्ठावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे , असे चित्र आजही आठवते . इतिहासाचं संपूर्ण पुस्तक महाराजांचा पराक्रम सांगत होते . शौर्य , धैर्य , बुद्धीमत्ता , चातुर्य , लढाऊपणा सर्व काही अगदी दैवी कथेप्रमाणे पानापानांवर ओसांडून वाहत होती . शिवरायांचे बालपण , शिवनेरी किल्ल्यावरील राजांच्या जन्म स्थळाचा फोटो , रायरेश्वराच्या मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही  "मावळा " व्हायचय ते चित्र आठवते . अफजल खानाने हात पसरवून राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठी आवळल्या जायच्या . आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग , बादशहाच्या हातावर तुरी दिल्या . हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं . ' गड आला पण सिंह गेला ' हा धडा वाचताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या व्हायच्या . ज्यांना पहिल्यांदा महाराज , हिंदवी स्वराज्य ,त्यांचे ते मावळे ,ते बाजी , ते तानाजी , त्यांचे विजयी अश्व , शिवराज्याभिषेक या सा-यांची पहिली ज्या पुस्तकाने करून दिली ते चौथीच पुस्तक .
  कलिकालभूजंगमावलीढं निखिलं 
  धर्मवेक्ष्य विक्लयं य: । 
  जगत: परिरंशतोवतापो : ( तीर्ण :) 
  स शिवच्छत्रपतिर्जयत्ये जय : ।।
    ध. छ. संभाजी महाराजांनी छ. शिवाजी महाराजांचे वर्णन करताना  "बुधभूषण"  ग्रंथामध्ये असे म्हटले आहे -
 पृथ्वीवर ' संपूर्ण धर्म ' च कलिकालरुपी सर्पाने ग्रासलेला आहे . हे पाहून ते व्याकूळ झाले आणि ज्या जगदिश्वराने अंशावतार धारण केला , असे ते अजिंक्य श्रीशिवछत्रपती (सदा ) विजयी होवोत . 
   सह्याद्रीच्या कड्याकपा-यातुन हिंदवी स्वराज्याची आरोळी ठोकणारा  सह्याद्रीचा बाणेदार , ढाण्यावाघ अष्टपैलू जाणता राजा छ. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला . त्यांच्या मातेचे नाव जिजाऊ , पित्याचे नाव शहाजी भोसले .
   छ. शिवाजी महाराज हे आदर्श पुत्र , सावध नेता , कुशल संघटक , लोककल्याणकारी प्रशासक , हिकमती लढवय्या , दुर्जनांचा कर्दन काळ , सज्जनांचा कैवारी आणि एक नवयुग निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्तवाचे कितीतरी पैलू आहेत.
   हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शत्रू बलाढ्य होते पण त्यांनी हिंमत सोडली नाही , काळ कठीण होता पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही , बादशहाच्या ‌बाजूने लाखो लोक होते पण त्यांनी न्यायाची बाजू सोडली नाही . सध्याच्या परिस्थितीचा विचार करता लक्षात येईल की , माणसाचा पराभव हा क्षणात नाही तर आधी मनात होतो . हे शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी ओळखले होते. 
   शिवकालीन इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल. म्लेंच्छ (मुघल) सत्ता सर्वत्र होती . या‌ म्लेंच्छ सत्तेविरुद्ध शिवरायांनी बंड पुकारले. त्यासाठी लोकांच्या मनातील भिती नाहीशी केली . त्यामुळे स्वराज्य निर्माण झालं.आता काहीशी परिस्थिती वेगळी नाही . कोरोना विषाणूमुळे माणसं घाबरली आहेत . जराशी सर्दी ,खोकला , ताप आला तर लगेच टेस्ट करायला जातात . पाॅजिटिव्ह रीपोर्ट आला की , सर्वत्र भितीचे वातावरण ! शिवविचार अंर्तमनात रुजवले तर तुम्हाला लक्षात येईल. शिवरायांनी नैसर्गिक साधनांचा वापर करून युद्ध जिंकलीत . ताप , सर्दी , खोकला आला तर तांदूळाची पेज , तुळसीची पाने , तसेच इतर अनेक औषधी वनस्पतींचा काढा हे आपल्या जवळच आहे . या सर्वांचा वापर करणे आवश्यक आहे . जरी रीपोर्ट पाॅजिटीव्ह आला तरी आपण या सर्वांचा वापर करून त्यावर मात करू शकतो . 
   म्हणूनचं शिवरायांचे नामघोष करण्यापेक्षा त्यांचे विचार , त्यांची शिकवण , युद्धनीती ह्या गोष्टी अंतर्भूत  रुजविणे काळची गरज आहे . म्हणूनचं म्हणावेसे वाटते  - 
     शिवरायांचे आठवावे रूप । 
   शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ।।
Previous article
Next article

50 Comments to

  1. निबंध लेखन छान. शिवरायांची कृती, उक्ती आजच्या काळात ही लागू पडणारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. मित्रा खुप सुंदर लेखन

    उत्तर द्याहटवा
  4. �� निबंध खूप सुंदर. अप्रतिम सुरुवात !

    उत्तर द्याहटवा
  5. कार्तिक खूप छान लिहिलं आहे तुझ्या लेखणी च्या माध्यमातून तू शिवरायांची जी शिकवण अंगी जोपासायला हवी त्याची आठवण करून दिलीस ज्याचा लोकांना खूप उपयोग होईल👌👌👌👌💐💐👍

    उत्तर द्याहटवा
  6. उत्कृष्ट व समर्पक मांडणी. सद्यस्थितीत महारांचे विचार अंगिकारले तर या राज्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. आपणास मन:पुर्वक शुभेच्छा. आपणास अशा प्रकारचे प्रेरणादायी लिखाण करण्यास वारंवार संधी मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच अप्रतिम निबंध आहे. तुमचं वय किती आहे माहीत नाही पण निबंध वाचून वाटतंय एखाद्या लेखकाने लिहिलेला लेख आहे. बुधभूषण मधील एक वाक्य लिहिलंय तुम्ही पण त्या ग्रंथा बद्दल सहसा कोणाला माहीत नाहीय जास्त कारण ग्रंथ संस्कृत मध्ये आहे. खूप खूप शुभेच्छा!

    "बुधभूषण" ग्रंथ माझ्या कडे pdf मध्ये आहे फ्री मध्ये हवा असल्यास संपर्क करा.

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads