Blog
स्पर्धक क्रमांक ३३ पायल महेंद्र चव्हाण सातारा
राजमाता जिजाऊ महासाहेब
छत्रपती शिवाजी महाराज
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज
सुमारे साडेतीनशे वर्षाच्या प्रदीर्घ अंधाऱ्या,पारतंत्र्याने काळवंडलेले कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब बहाल केला.
महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांनी बादशहाच्या,सुलतानाच्या मगरमिठितुन प्रजेला मुक्त केले.शिवरायांचा जन्म 19फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली.
सुसंस्कार,शिक्षण,युध्दशास्त्र,प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवरायांनी आपले सहकारी,मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.
स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शात्रूचा सुळसुळाट होता.शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकार धुरंदर,दुरदृष्टीचे होते.अनेक गड किल्ले स्वराज्यात होते.सागरात आरमार जय्यत तयारीत होते.अनेकशूर,लढवय्ये,पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.शात्रूचा बीमोड झाल्यावर. शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले
प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्यान होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात,न्याय मिळत होतो. अपराध्यांना शासन होत होते.शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती.
प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या.स्वराज्याचा विस्तार झाला होता.अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करुन खऱ्या अर्थाने, 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय' याचा प्रत्यय आणून दिला होता.
त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली.अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरन केले.प्रजेवर अन्याय होऊ नये,त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे,राज्यकारभार शिस्तीने चालवा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले. अखंड परीश्रम,दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच.तरीही त्याची तमा न बागळता ते शेवटपर्यंत कार्यरत होते.अखेर इ.स.1680मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.
शिवभक्त व्हायला जात पात लागत नाही.. एकच जात आणि एकच धर्म हिंदवी स्वराज्य.. शिवराय नाव_घेतील_की_रक्त_सळसळल पाहिजे..!!? चार_चौघात जय जिजाऊ _जय_शिवराय म्हणुन_बघा_कोणा_कोणालामिर्ची_लागली_ते_लगेच_कळत..शब्द भगवानाद भगवा या जीवनाचा आधार भगवाशिवबा शिवाय किंमत नाय.शंभू शिवाय हिंमत नाय. हिंदुत्व सोडुन कोणापुढे झुकत नाय लावतो_जेव्हा चंद्रकोर माथ्यावर,घेतो_जेव्हा भगवा खांद्यावर,गर्व वाटतो आम्हाला 'जय_शिवराय'म्हटल्यावर..दुश्मनही म्हणतो...काय शानअसत
.आवडल्यास लाईक करा व शेअर करा..
Previous article
Next article
जय शिवशंभु
उत्तर द्याहटवाछान आहे
उत्तर द्याहटवाजय शिवराय🚩
उत्तर द्याहटवाGood 👍
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाVery very good🙂🙂👍👍👌👌
उत्तर द्याहटवाVery good payal
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाखूप छान...🚩🚩
उत्तर द्याहटवा