Blog
स्पर्धक क्रमांक १०६ कीर्ती विठ्ठल राठोड
छत्रपती शिवाजी महाराज
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि , फाडली आमची छाती , तरी मूर्ती
दिसेल शिवरायांची
जय शिवराय
हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्री वंदिले जातात .शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शराजनिक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी ई. स १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला . एका आख्ययिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीे ला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हाव्हा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले . शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खन मधील राजसत्ता विजापूर , अहमदनर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्टनिमधे विभागलेली होती . शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाहीत , विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली ; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली . महाराष्ट्रात छत्रपति शिवाजी महाराज हे शिवाजीराजा , शिवाजीराजे , शिवबा , शिवबाराजे , शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात . शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो . छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपति संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंबु असा होतो .
सर्वसाधाणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षाच्या काळास इतिहासकार ' शिवकाल ' असे म्हणतात .
ई. स १६४७ मध्ये सतरा वर्षाच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहर्तमेढ रोवली . तोरणगड हे स्वराज्याचे तोरण च ठरले . त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा ( सिंहगड ) , आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहा कडून जिंकून पुणे प्रांतावर नियंत्रण मिळवले . या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्यांची डागंडुगीं केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले .
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली . ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.
"प्रतीपच्चंद्रलेखव वर्धिश्र्नुविश्र्वंदिता शाहसुनो शिवसेश्या मुद्रा भद्राय राजते"
आदिलशाही इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्यविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे त्याला धडा शिकवण्यासाठी ई.स १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला . त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला .
ई. स १६५९ पर्यंत शिवाजमहाराजांनी जवळपासच्या पश्र्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकत होते .
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत रहिल्यामुळे ई.स १६५९ साली आदिलशहाने दरबारात सद शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला . हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अजलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले . तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अजलखान चा आग्रह होता . पण शिवाजीराजांच्या वकिलांनी अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावर च भेट घेण्यास बोलावले .भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजमहाराजांना अजलखानाच्या दगाबजीपणाची कल्पणा असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली . बिचवा चिलखता मध्ये दडविला होता तर वाघनखे पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती.
प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली . भेटीच्या वेळी उचंपुर्या , बलदंड अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले . त्याच वेळी अफझलखानाने कट्ट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले . अफजखान चा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली त्याचबरोबर अझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीराजावर दांडट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले यांमुळेच " होता जीवा म्हणून वाचला शिवा " ही म्हण प्रचलित झाली.
६ जून ई. स १६७४ रोजी शिाजीराजांचा रायगडावर राज्यभिषेक करण्यात आला त्या दिवसाासून शिवाजमहाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले .
शिाजीमहाराजांच्या जयांतीला महाराष्ट्रात शिवजंती म्हणतात . शिवाजमहाराजांच्या जन्मदीनंका बद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते .
कोटी देवांची अब्जावधी
मंदिरे असताना
पण एकही मंदिर
नसताना
जे अब्जावधीच्या
हृदयावर अधिराज्य करतात
त्यांना " छत्रपति "
म्हणतात
...... जय ..... जिजाऊ
.......जय .... शिवराय
Previous article
Next article
Khupch chan
उत्तर द्याहटवाअतिउत्तम👌👌👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान सारगर्भित निबंध आहे. keep it up 👍👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाSundar ahe
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाAwesome ��
उत्तर द्याहटवा