Blog
स्पर्धक क्रमांक ११ सुस्मिता मल्लिकार्जुन कुरघोटगी कुसुर
शिवाजी महाराज
!! प्रौढ - प्रताप- पुरंदर!!
क्षत्रिय -कुलावतास
सिहासनाधिश्वर
महाराजाधिराज
योगीराज - श्रीमंत
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
यशवंत, कीर्तीवत, सामर्थ्यवंत, वरदवत!! पुण्यावत, नितीवत जाणता राजा!!
छत्रपती शिवाजी महाराजाचे जीवनच एवढे भव्य आहे की ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच ते एकाच वेळी द्ष्टे, स्वतंत्रयोद्धे, सेनापती, संघटक, सफुरतिदाते युगपुरुषतम होते. त्याच्यासारखे आदर्श नितीवत राजा कोणी होऊ शकले नाही.
निश्चयाचा महामेरू! बहुत जनासी आधारू! अखंड स्थिती चा निर्धारु श्रीमंत योगी!!
सहयाद्रीच्या कुशीतुन एक हिरा 💎 चमकला
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला
हातात घेऊन तलवार 🗡 शत्रूवर गरजला
महाराष्ट्रात असा एक होऊन गेला
साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कतृत्त्ववान विरपुत्र मिळाला. ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने ,धाडसाने आणि जिद्दीने नव्हत्याच होत आणि होत्याच नव्हत करुन मुठभर मावळयाच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा झेंडा🚩 फडकवला त्यावेळी अनेक परकिय सत्ता या महाराष्ट्रात धुमाकुळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियाची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकाच्या कुंकवाचा धनि मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झकार, धगमगता पेटता अगार, अखेर ती वेळ आली ;आणि सहयाद्रीची गरजना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी
!! शिवनेरीवर एक तारा⭐ चमकला
जिजाऊच्या पोटी सिह जन्मला
मानाचा मुजरा करते🙏 छत्रपती शिवाजी महाराजाला !!
ज्यांनी मराठा मातीत भगवा 🚩 रोवला शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात तडपडणाऱ्य महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16 वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अंत्यत कमी वयात शिवरायांनी हे साहसी धाडस केले व ते पूर्णत्वासही नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ या सारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरुन तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्याच्या मनात स्वराज्याबददल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात अनेक सहकारऱ्याची साथ लाभली तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देश पाडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी, नेताजी यासारख्या अनेक सवगडयानी लढाईच्या काळात शिवरायासाठी आपल्या प्राणाचेही बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही
शिवरायापूर्वी अनेक राजा होऊन गेले. शिवराया नंतर ही अनेक राजा उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. ते स्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते.
शिवाजी महाराज आपल्या मावळयासोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत, ऊन , वारा ,पाऊस याची तमा न बाळगता दार विसरून ते आपल्या मावळयासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र ऐकायचे.
जगणारे ते मावळे होते. जगवणारा तो महाराष्ट्र होता
स्वतः च्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेन काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता.
शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न असे व्यक्ती होते काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत. कितीही सकटे आली तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकार्याऱ्याच्या मदतीने बल्याढ शत्रूशी लढा देत एका विरपुत्रने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केली.
!! हवा वेगाने नव्हती. हवे पेक्षाही त्याचा वेग जास्त होता.
अन्याया विरुद्ध लढण्यासाचा इरादा नेक होता.
तर जगात एक होता जगात एक होता.
अशा या थोर महापुरुषचा जयजयकार तर झालाच पाहिजे. !!
Previous article
Next article
सुपर
उत्तर द्याहटवाIt's very nice essay and it's also usefull to everyone to know about the shivaji
उत्तर द्याहटवाessay is really wonderful and also importance
उत्तर द्याहटवाamazing
उत्तर द्याहटवाजय शिवशबू 🙏🙏
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा👌👌👌🙏🙏👍👍
उत्तर द्याहटवाखुप छान👏👍👍
उत्तर द्याहटवा. Good susmita you write very nice essay
उत्तर द्याहटवा