Blog
स्पर्धक क्रमांक ७२ सिद्धेश शीतल भगत कोल्हापूर
मी सिद्धेश शीतल भगत माझ्या निबंधाचा विषय आहे "राजा शिवछत्रपती"
निश्चयाचा महामेरू, बहुतांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी।।
असे रामदास स्वामी ज्यांच्या बद्दल वर्णन करतात ते म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज'होय.
शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एक तेजस्वी सुर्य जन्माला आला. सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामी च्या अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू आशेच्या प्रकाशाचे किरण पसरले होते. शिवबाचा जन्म झाला. संबंध शिवनेरी किल्ला सनई- चौघडा आणि नगारा यांच्या आवाजाने भारून गेला शिवनेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
लढाईत गुंतलेल्या पित्याच्या सहवास त्यांना फारसा लाभला नाही पण आई जिजाऊचे संस्कार, प्रेम ,शिकवण व गुलाम गिरीत खितपत पडलेल्या राज्याची माहिती त्यांच्या बालमनावर कोरली गेली.
लहानपणी त्यांना विचारांशी सहमत असणारे सवंगडी मिळाले तेच पुढे जाऊन स्वराज्याचे मावळे झाले. ऐनवेळी स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा, लगेच स्वराज्याचे तोरण बांधलेला तोरणा किल्ला, गड आला पण सिंह गेला, प्रतापगड चा रण प्रताप, आग्राहून सुटका, पन्हाळा हून सुटका असे एक ना अनेक प्रसंग अंगावर शहारे आणणारे!
महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि चातुर्याची महती पटवून देणारे आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची किर्ती चहुदिशेला पसरली होती. त्यांनी गदिमांनी जेरीस आणले होते गरीब जनतेवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या शत्रूचा बंदोबस्त केला फक्त शिवरायांनीच.
Previous article
Next article
खूप छान निबंध लिहिला आहे सिद्धेश. अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाCongratulations sidhesh
उत्तर द्याहटवाRohini karade
हटवाखुप छान सिद्धेश...👌
उत्तर द्याहटवाMast siddhu
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा