रत्नागिरीत आज ५४० कोरोना बाधित, २० रूग्णांचा मृत्यू - दैनिक शिवस्वराज्य

रत्नागिरीत आज ५४० कोरोना बाधित, २० रूग्णांचा मृत्यू


राकेश कोळी उपसंपादक :-

रत्नागिरी जिल्ह्यात आज आलेल्या अहवालानुसार ५४० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. नव्याने ५४० पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने रत्नागिरी जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५९ हजार ५६ इतकी झाली आहे. नव्याने ५४० रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या २४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या १६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर यापूर्वीचे १३१ असे ५४० जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.३९% आहे. तर २४ तासात तब्बल २० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १६९१ इतकी झाली असून मृत्युदर २.८४% इतका आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads