Blog
स्पर्धक क्रमांक ५१ स्वरा संजय पाटील गाणगापूर
सुमारे साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ अंधारया पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्रला खरया अर्थाने राजपद प्राप्त झाले.
जनता शिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब बहाल केला.
महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली.शिवरायाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्याची जडणघडण केली.
सुसंस्कार, शिक्षण,युध्दशास्र , राजकारण न्यायशास्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले.आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी,मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रत स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यानी प्रजेला भयमुक्त केले.
स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रुचा सुळसुळाट होता.शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर दूरदृष्टीचे होते.अनेक शुर, लढवय्ये , पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रुचा बीमोड झाला होता.
शत्रुचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले.प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये.म्हणून शिवराय दक्ष.
त्याच्या राज्यात,निर्यात मिळत होता.अपराध्यांना शासन होत होते शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती.
प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या.स्वराज्याचा विस्तार झाला होता.अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खरया अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय याचा प्रत्यय आणून दिला होता.
त्याचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले स्वराज्यात जनता सुख समाधानाने नांदू लागली.
अनेक मोहिमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले.
प्रजेवर अन्याय होऊ नये त्यांच्या तक्रारींचे निवारण लगेच व्हावे राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांचा अष्टप्रधान मंडळ नेमले.
प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले ते खरे आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेते होते.स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.
अखंड परिश्रम दगदग यांच्या यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच.तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते.इ.स 1680 मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.
प्राण नरहर कुरुंदकर यांच्या मते प्राचीन काळापासून जे जे श्रेष्ठ राजे भारत वर्षात होऊन गेले त्या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक आगळे वेगळे होते . कारण त्या राजाच्या मृत्युनंतर त्याचे राज्य नष्ट झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे लढले. त्यांनी राज्याचे रक्षण केले.
प्रतिकुल राजकीय परिस्थितीत कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिले. कारण त्यांना देश के शिवाजी महाराजांचे राज्य असे कधीच वाटले नाही.त्यांनी ते राज्य स्वतःचे मांडले अशी अशी घटना देशाच्या इतिहासात अनोखी व एकमेव होती.
जनतेच्या मनातील स्वातंत्र्य कांक्षेचे शिवाजी महाराज प्रतिनिधी होते.लढाया मागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही.एका सामान्य जागी जागी दाराच्या मुलाने मोगल बादशाह शाळेला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे.
खरोखर स्वताच्या हिमतीवर समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते.स्वराज्य स्थापना करताना व नवीन रस्ता नवीन करताना जीवाला जीव देणारे साधी-सोबती त्याने निर्माण केले.स्वराज्य स्थापना करताना त्याच्यापुढे कटिंग अडचणी आल्या संकटाचे महापूर आले परंतु ते करून हरहुन्नरी निधड्या छातीचा गंभीर योजक प्रसंगावधीन लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो की शाहिस्तेखानावर छापा असो किंवा आगऱ्याची नजरकैद असो ते सर्व प्रसंगातून सहीसलामत सुटले.
शिवाजी महाराजांचे राज्य स्वतःचे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. श्रीमान योगी होते.
आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेला. मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे. वर मान करून आपल्याला हिनदिनतेस कारणीभूत झालेल्या पण परकीय राज्यकर्त्या विरुद्ध दंड थोपटून राहण्याचे त्यांनी सामर्थ्य निर्माण केले.
शिवाजी महाराज व्यवहारे होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले.राज्यभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला समाजाला राज्यसंस्थेला शाप ठरलेली वतनदार पद्धत त्यांनी बंद केले.साडेतीन वर्षाच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्र बुद्ध, शिस्तबद्ध ,उच्च महत्वाकांक्षी कर्तबगार, स्वाभिमानी स्वराज्यनिष्ठ बनवण्यासाठी महाराज कष्ट घेत होते.
यशवंत, किर्तीवंत
सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत ,नीतीवंत जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन तेवढे भव्य आहे की. ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच.ते एकाच वेळी दृष्टीने स्वातंत्र्ययुद्धे,सेनापती संघटक, स्फूर्तीदाते युग पुरुषोत्तम होते.त्याच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे.तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही.असा हा केवळ पुण्यवंत राजाचा नव्हता,तर तो आदर्श नितीवंत राजा होता.
निश्चयाचा महामेरू!
बहुत जनांसी आंधारू,!
अखंड स्थितीत निर्धारू
श्रीमंत योगी! शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष मोठ्या अभिमानाने आपण करतो. त्याच्या कर्तृत्वाचा आणि रोमांचित आठवणींचा जयजयकार करतो.जसा जसा शिवजयंती उत्सव जवळ येत जातो. तसं तसे आपले" डिपी" बदलायला लागतात . शिवजयंतीचा दिवस मावळायला लागतो. आणि मागे मात्र अंधार उरतो. उत्सवी सोहळे साजरे करण्यापुरतेच शिवरायांना आपण सीमित ठेवणार आहेत का?यांचा विचार करण्याची आता नितांत गरज आहे. कदाचित यातूनच आचार -विचारांचा उष:काल निर्माण होईल.हीच अपेक्षा महाराजांचे जीवन हेच मूळ साहस ,रणकौशल्या आणि राजकारणपटूता यांच्या त्रिवेणी संगमावर उभे राहिले होते छत्रसाला सारख्या तरुणाने महाराजांचा आदर्श घेऊन दूर वरती बुंदेलखंडात राज्याची उभारणी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय जय .....
Previous article
Next article
Tried to express Good knowledge with limited words on God of Hindu
उत्तर द्याहटवा