स्पर्धक क्रमांक ५० राजवर्धन सचिन पाटील सांगली - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ५० राजवर्धन सचिन पाटील सांगली

राजा शिवछत्रपती निबंध.

छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते एकच राजे होते ते जनतेसाठी जगले व गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले. या शूर पराक्रमी राजांना शिवराय शिवबा राजे शिवाजी महाराज या नावाने संबोधत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी गडावर झाला. त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी महाराज विजापूरच्या सेवेत होते, त्यामुळे शिवरायांची पूर्ण जबाबदारी त्यांच्या माता जिजाबाईंवर होती. जिजाबाईंनी बाल शिवाजीला रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या, व राजकारणाचे धडे दिले तलवार बाजी शिकवली, युद्धकौशल्य शिकविले. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे शिवाजी राजे घडले. वयाच्या पंधराव्या वर्षी काही विश्वासू मावळ्यांसह शिवाजी राजांनी स्वराज्य निर्मिती ची शपथ घेतली. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे त्यांनी कोंढाणा, सिंहगड, विजयदुर्ग, पुरंदर, राजगड असे शंभराहून अधिक किल्ले जिंकले. त्यांनी युद्धात शक्ती सोबत युक्तीचा वापर केला. शिवराज शिवाजीराजे सर्वगुणसंपन्न होते हिंदुत्व संस्कृती व मराठी भाषेचे पुरस्कर्ते होते, पण त्याने दुसर्‍या धर्माचा कधी अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यांमध्ये अनेक धर्माचे सैनिक होते. शिवाजी राजांनी शौर्य धर्म व संकल्प कथा संघटन कौशल्य इत्यादी गुणांवर पारतंत्र्यात पडलेल्या आपल्या देशास त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. पण स्वातंत्र्य निर्माण करताना अनेक संकटे त्यांना आली व त्यांनी धीराने तोंड दिले. यामध्ये अफजलखानाचा वध, असो पन्हाळगडचा वेढा, आग्र्याहून घेत करून घेतलेली सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, आणि अशा वेळ प्रसंगी शिवाजी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक या आणि अशा अनेक विश्वासू सरदारांनी व मावळ्यांनी जिवाभावाच्या लोकांनी साथ दिली. वेळ प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवरायांनी कधी जात-पात-धर्म असे भेदभाव केले नाहीत. मंदिराप्रमाणे मशिदी सुरक्षित ठेवल्या. परस्त्रीला मातेसमान मानले पर स्त्रीचा आदर केला. शिवाजी महाराजांनी आपले जेष्ठ पुत्र संभाजी महाराजांना देखील अशाच प्रकारचे व राजकारणाचे योग्य ते धडे दिले. युद्ध व राजकारणी कुशल नीती शिकवली.त्यामुळे संभाजी महाराजांनी स्वराज्याची पताका पुढे फडकवत ठेवली व स्वराज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांनी शेतकरी बांधवांसाठी बी-बियाणे पाणी यांचा पुरवठा केला, जेणेकरून शेतकरी सुखी तर सर्व रयत सुखी असा त्यांचा ध्यास होता. अशा या थोर रयतेच्या राजाचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी राजगड किल्ल्यावर झाला. या दिवशी सह्याद्री सहित संपूर्ण रयत रडत होती. शत्रू देखील त्यांच्या मृत्यूने हळहळला. स्वराज्याच्या निर्मितीमुळे सर्व रयत सुखी झाली होती पण त्यादिवशी महाराज सर्व जनतेपासून, रयते पासुन दुरावले. एका तेजस्वी सुर्याचा अस्त झाला. कोट्यवधी रुपयांच्या दौलतीचा धनी,लाखोंचा पोशिंदा,खुद्द छत्रपती असूनसुद्धा स्वतःच्या ऐषोआरामापेक्षा रयतेची काळजी करणारा,राज्याच्या संपत्तीची सेवक म्हणून रखवाली करणारा असा राजा विरळाच ठरतो! अशा या थोर राजा माझा दंडवत प्रणाम.
 जय भवानी जय शिवाजी.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads