स्पर्धक क्रमांक ००९० : मृणाली विष्णू पिळणकर सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००९० : मृणाली विष्णू पिळणकर सिंधुदुर्ग

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... मृणाली विष्णू पिळणकर

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

मृणाली विष्णू पिळणकर


निबंधाचा विषय :- ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणपद्धती


                "शाळा ही फुलगडे
                मज भारी आवडे
            ही म्हणते मज शाळा
     शिकण्यासाठी ये तू बाळा"
             सकाळी व्यवस्थित तयार होऊन शाळेत जाणे,मग शालेय वातावरणात शिक्षणासोबत विविध गोष्टी शिकण्याचा आनंद घेणे,शाळा सुटल्याच्या आनंदात दप्तर पाठीला मारून बागडत घरी येणे,आणि शाळेतून दिलेला गृहपाठ पूर्ण करत पुन्हा अश्याच दुसऱ्या दिवसासाठी तयार राहणे हा सर्व विद्यार्थ्यांचा दैनंदिन कार्यक्रम सुरळीतपणे चालू होता.अगदी अंगणवाडीतील गोंडस विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत.पण पाऊस पडता पडता अचानक मोठे भयंकर वादळ येऊन धडकावे तशी कोरोना महामारी आली.अवघ्या काही महिन्यात जगभर पसरली आणि संपूर्ण जग कोरोनामय झाले.
             एखादी नवीन प्रणाली राबवत असताना त्याबद्दल लोकांना माहिती देणे,जागृत करणे,प्रशिक्षण देणे गरजेचे असते.
परंतु अचानक धडकलेल्या कोरोनामुळे या सगळ्यासाठी आपल्याला वेळच मिळाला नाही आणि या कोरोना काळातील त्यावेळचा एक उत्तम पर्याय म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीने शिकू लागलो.आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शिकावे लागणार यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारीच झाली नव्हती.पण तरीही यंदाचे संपूर्ण वर्ष मुलांनी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला.आणि यंदाचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीचा निकाल लागला अस म्हणायला काही हरकत नाही.
               इंटरनेट क्रांतीमुळे गेल्या पाच वर्षात डिजिटल शिक्षणाला सुरुवात झाली.आणि त्यातच कोरोना महामारीमुळे पर्याय म्हणून आपण ऑनलाईन शिक्षणाकडे वळलो. कोरोना काळात सर्वच क्षेत्रात बदल होऊ लागले.हे बदल स्वीकारणे आणि त्याची सवय करून घेणे हा प्रवास काही सोपा नाही. प्रत्येक क्षेत्राला कोरोनाने घेरून धरले.अगदी शैक्षणिक क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही.आणि म्हणूनच या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद राहू नये या हेतूने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग आपण निवडला.आणि मग प्रत्यक्षातले शिक्षण ऑनलाईन पद्धतीने शिकवणे आणि शिकणे हे सर्वांसाठीच एक आव्हान बनले.
                जो बदल घडलेला आहे तो स्वीकारून पुढे जाण्यात आपला फायदा असतो.कारण कोरोना महामारीमुळे ऑफलाईन शिक्षण घेता येत नाही म्हणून ते कधी घेता येईल याची जर वाट पाहत आपण राहिलो तर आपला विकास आणि आपली प्रगती सुद्धा थांबणार आहे.वर्ष २०१९ला कोरोना महामारीचा संसर्ग वाढू लागला.सध्या २०२१ हे वर्ष चालू आहे तरी कोरोना आपल्यात आहेच आणि ही महामारी पूर्णपणे कधी जाईल याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे.त्यामुळे वस्तुस्थितीचा स्वीकार करून वर्तमानातील परिस्थितीला सुंदर आकार कसा देता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असू तर त्या प्रयत्नांना आज महत्त्व आहे.
              ऑनलाईन शिक्षणपद्धतीबाबत जर आपण सर्वसमावेशक विचार केला तर ऑनलाईन पद्धतीने शिकताना काही मर्यादा येतात.ऑनलाईन शिक्षण म्हटले की,प्रथमतः आपल्याकडे एक यंत्र असणे आवश्यक आहे की ज्याद्वारे आपण ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो.दुसरे म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी,जी गाव खेडेगाव या ठिकाणी अखंडितपणे उपलब्ध होत नाही.त्याचबरोबर जो समाज आर्थिक दुर्बल घटकात आहे तो इतक्या महागड्या वस्तू कुठून आणणार? आपण कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे वळलो हे जरी खरे असले तरी शिक्षणाच्या बाबतीत सर्वसमावेशक विचार करताना या वर्गाचा सुद्धा विचार व्हायलाच हवा ना.हा वर्ग शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये यासाठी उपाय योजना करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे.आणि यासाठी या काळात शासनस्तरावर किती प्रयत्न होत आहेत आणि त्यांच्या किती प्रयत्नांना सफलता प्राप्त होते आहे , याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
                ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणपद्धतीचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर प्रत्येकात वेगळी मज्जा आहे. दोघांचेही थोड्या जास्त प्रमाणात फायदे तोटे आहेत.परंतु ऑफलाईन शिक्षणपद्धती जास्त विश्वासार्ह आहे.त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रत्यक्ष सहवासात साधल्या जाणाऱ्या संवादाचा परिणाम हा ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या संवादापेक्षा नक्कीच प्रभावशाली ठरतो.ऑफलाईन शिकताना जो जिवंतपणा असतो,समरस होऊन शिकताना जसा आनंद घेता येतो तो आनंद ऑनलाईन पद्धतीने शिकताना तितक्या प्रभावीपणे आपल्याला जाणवतो का ? तर नक्कीच नाही.
               शिक्षणप्रणाली आखताना विद्यार्थी हा सामाजिक जाणीव असलेला सुजाण नागरिक,विज्ञाननिष्ठ,ज्ञानी असलेला व्हावा अशी बरीच उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली जातात.शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणे हे आहे. परंतु आज ऑनलाईन पद्धतीने शिकताना विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट होत नसल्याने त्यांचा फक्त ज्ञानात्मक विकास होत आहे.मानसिक, शारीरिक,सहकार्य वृत्ती यांचा विकास होताना दिसत नाही.मनुष्याच्या जडणघडणीमध्ये आवश्यक ठरणाऱ्या गोष्टी या ऑनलाईन शिक्षणातून साध्य करता येत नाही,याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.यापुढे जाऊन आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा विचार केला तर ऑफलाईन परीक्षांमध्ये निबंध लिहिताना आपल्या कल्पना - शक्तीचा कस लागतो.एखाद्या प्रश्नाचे विश्लेषणासहित उत्तर लिहिताना आपली आकलनशक्ती समजून येते.हेच ऑनलाईन मध्ये चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडून उत्तर देताना आपल्यातील कौशल्यांचा विकास होत नाही.ऑनलाईन परीक्षा देताना अभ्यासासाठी दिलेल्या साहित्याचा वापर बरीच मुले कॉपी साठी करतात आणि मग अशावेळी त्यांच्या बुध्यांकाचा प्रश्न निर्माण होतो.प्रामाणिक आणि हुशार मुलांचे यात मोठे नुकसान होते.त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर समजते की ऑफलाईन शिक्षणपद्धती ही तळागाळापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फायदेशीर आहे आणि ते आपण कधीच नाकारू शकत नाही.पण त्याचबरोबर जसा काळ बदलतो तश्या गरजा बदलतात.त्यामुळे वर्तमानातील कोरोना परिस्थितीचा विचार करत आपली मनस्थिती बदलून ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेत आपल्या भविष्याचा वेध घेणे ,यालाही तरणोपाय नाही.
                ऑनलाईन शिक्षणपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित करताना आजच्या या संकटकाळात आपल्यासाठी वरदान ठरलेल्या ऑनलाईन शिक्षणपद्धतीला आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही.सध्याच्या या व्यवस्थेला सक्षम बनविण्यासाठी,शिकण्या - शिकवण्याची प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान कसे वापरायचे याचा विचार होणे जरुरीचे आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षक डीसले सर,तसेच त्यांच्यासारख्या अनेक शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या विषयात खोलवर उतरण्याची, स्वयंशिक्षणाची,तसेच शिक्षण रंजकपणे घेण्याची संधी उपलब्ध कशी करता येईल याचे नमुने दिले आहेत,त्याचा आपण हमखास फायदा करून घेतला पाहिजे.ऑनलाईन पद्धतीने शिकताना आपला पैसा,वेळ,ऊर्जा या गोष्टी कमी प्रमाणात खर्च होत आहेत.या संधीचे सोने करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तर आपल्या हाती नक्कीच काहीतरी चांगले येण्याची शक्यता आहे.
               ऑनलाईन शिक्षणपद्धती ही आज काळाची गरज आहे.त्यामुळे केंद्र सरकार,राज्य सरकार आणि शैक्षणिक संस्था या सर्वांनी आपल्या प्रयत्नांत सुसूत्रता आणणे आणि ऑनलाईन शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशक असा दूरगामी महत्त्वाचा कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या काही मर्यादांमुळे ऑफलाईन शिक्षणाला ते पूर्णपणे पर्याय ठरू शकणार नाही आहे.परंतु आता वास्तविकतेचा विचार करता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षणपद्धती भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे.ऑनलाईन अध्यापनाकडे पूर्णपणे ऑफलाईन अध्यापनाला पर्याय म्हणून बघता येणार नाही तर प्रत्यक्ष शिक्षणपद्धतीच्या जोडीला पूरक म्हणून त्याचा वापर जास्त चांगला होऊ शकतो.
               मित्रांनो,कोणताही बदल लगेच घडत नाही.त्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो.म्हणूनच उद्या चांगले घडण्याची आशा मनात ठेवून वर्तमानातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून उज्ज्वल भविष्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगूया.भविष्यात किती आणि कश्या प्रकारची संकटे येतील हे आपण सांगू शकत नाही.म्हणून आतापासून सावधगिरी बाळगणे ही आपली जबाबदारी आहे.त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिकण्याची आपण सर्वांनी मानसिकता ठेवायला हवी.या मानसिकतेबरोबर ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने आणि सर्वसमावेशक विचारांतून सर्व पातळींवर पाऊले उचलणे अत्यंतआवश्यक आहे.ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही शिक्षणपद्धतीचा सुवर्णमध्य साधत आपण विकासाच्या दृष्टीने अथक प्रयत्न करत,त्या प्रयत्नांची अंमलबजावणी करणे ही आज काळाची गरज आहे.म्हणूनच म्हणते की,
        " काळाप्रमाणे बदल स्वीकारून
            बनवूया स्वतःला सक्षम
        परिस्थितीशी दोन हात करत
              करूया अपुले रक्षण
       ऑनलाईन असो वा ऑफलाईन
         प्रतिसाद मात्र नक्की देऊया
     चांगले घडण्याची आशा मनात ठेऊन 
        भविष्याचा वेध घेत पुढे जाऊया".
Previous article
Next article

60 Comments to

  1. Agdi satya ahe ... Very nice .. ya vishya vr nkkich vichar jhala pahije

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान विचार मांडले .निबंधामध्ये आॕनलाईन व आॕफलाईन शिक्षण याबद्दल सकारात्मकतेने दोन्ही बाजू मांडल्या.उत्कृष्ट निबंध .

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान विचार मांडले .उत्कृष्ट निबंध .

    उत्तर द्याहटवा
  4. नवीन शिक्षणपद्धतीत ऑफलाईनच्या जोडीला पूरक म्हणून ऑनलाईन पध्दतीचा वापर अधिक परिणामकारकरित्या करणे काळाची गरज आहे
    नेहमीप्रमाणेच आपले विचार वाचकांच्या ह्वदयापर्यत्न उतरलेस अभिनंदन मृणाली

    उत्तर द्याहटवा
  5. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीचे सकारात्मक विश्लेषण.
    छान!

    उत्तर द्याहटवा
  6. खुप छान 👍🏻👌🏻👏👏
    दोन्ही शिक्षणपद्धती बद्दल योग्यरीत्या मांडणी केलेली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. खूप सुंदर आणि वैचारिक असा लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. दोन्ही बाजूंची संतुलित मांडणी....छान

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान मृणाली ...सकारात्मक विश्लेषन केलेस खूप सुंदर असच लिहत रहा ..खूप छान विचार ...सर्वाना विनंती आहे जास्तीत जास्त share करा.. 👌👍

    उत्तर द्याहटवा
  10. खूप छान लिहिलंय मृणाली....अशीच नेहमी लिहीत रहा👍👍

    उत्तर द्याहटवा
  11. वास्तववादी लेखन केले आहे.स्वरचित काव्यपंक्ती योग्य ठिकाणी गुंफल्याने भाषिक सौंदर्य वाढले आहे.विचार काळानुरूप मांडले आहेत. छान!

    उत्तर द्याहटवा
  12. Mrunali tujhi vichar karnyachi wa tyala mandnyachi padhhat mala khupach aawadte... You are too good. Keep up the good work!!!

    उत्तर द्याहटवा
  13. खुप कमाल विषय उत्तम लिखाण 👌👌

    उत्तर द्याहटवा
  14. खूपच सुंदर विषय मांडला आहे. विचारांना सद्यस्थितीची जोड दिली आहे. छानच!

    उत्तर द्याहटवा
  15. मृणाली खूप छान लेखन. एककल्ली न लिहिता दोन्ही बाजू सारासार मांडणी करून लिहिल्या आहेत हे विशेष. यामुळे तुझ्या निंबंधामुळे तुझे केवळ लिखाण न पोहचता लोकांना दोन्ही पर्याय समोर ठेऊन त्यामध्ये योग्य अयोग्य निवडण्यास तू मार्गदर्शन केलं आहेस. खूप शुभेच्छा 👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  16. खूप छान ...खूप अभ्यासपूर्ण लेखन 👌👌💖💖

    उत्तर द्याहटवा
  17. खूप छान पद्धतीने विषय मांडला आहेस तू.उत्तम लिखाण

    उत्तर द्याहटवा
  18. Khup chhan lihilays mrunali . Nibandh vachun junya aathavani jagya jhalya ❤️✨👍

    उत्तर द्याहटवा
  19. मृणाली दोन्ही बाजू ने विचार मांडले स. तुझ मत आणि पूर्ण आखणी यात सर्व गोष्टी अभ्यास पूर्वक मांडले आहेस.त्या साठी तुझे अभिनंदन.आणि पुढील लेखास तुझ्या शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा
  20. U have explained value of both teaching methods in very good way....keep it up

    उत्तर द्याहटवा
  21. सध्याची परिस्थिती आणि शिक्षण आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी ह्यांची होणारी घालमेल होणारा त्रास आणि त्रासातून कसे नाही निघावे है छान प्रकारे मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  22. मृणाली खुप सविस्तर आणि मुद्देसूद विवेचन। बदलत्या
    प्रवाह चा वेध घेताना शिक्षण प्रणाली पण बदलत आहे
    पण तो बदल कसा आणि कुठं पर्यंत हे अगदी उदा आणि स्पष्टीकरण सह मांडलस। आज अशा चिंतनातून एखादा ऑनलाईन ला आणि एखादा सुंदर पर्याय किंवा ट्रेण्ड येऊ शकतो। पारंपरिक शिक्षण पद्धती ला आणि जोड मिळाली। शिकणारा विद्यार्थी
    आता नाविण्याचा विचार करू लागला। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही विचार शिक्षणात दर्जेदार पणा नक्कीच आणतील हे सिद्ध केलंस। खुप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा।

    उत्तर द्याहटवा
  23. सुंदर लेखन केलस. आणि दोन्ही मुद्दयांना अगदी व्यवस्थित मांडलस. 👌👍
    All the best 👍

    उत्तर द्याहटवा
  24. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीचे उत्तम विश्लेषण

    उत्तर द्याहटवा
  25. ऑनलाइन , ऑफलाईन दोन्ही शिक्षण पद्धतींचा नीट विचार करून लिहिलेला लेख . संमिश्र शिक्षणपद्धती चा पर्याय चांगला वाटतोय

    उत्तर द्याहटवा
  26. Very well presented Mrunali..Flow of writing is smooth and ideas are well connected. Keep writing.

    उत्तर द्याहटवा
  27. Very nice thought👍👌👌... या काळात Offline शिक्षण जरा कठीण आहे आणि online शिक्षण सगळ्यांनाच शक्य नाही होत आहे

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads