स्पर्धक क्रमांक ००९१ : पियुषा पुरुषोत्तम वारंग सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००९१ : पियुषा पुरुषोत्तम वारंग सिंधुदुर्ग

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... पियुषा पुरुषोत्तम वारंग 

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

पियुषा पुरुषोत्तम वारंग 


निबंधाचा विषय :- राष्ट्रपिता महात्मा गांधी

      घटना जून 1893ची. मोहनदास करमचंद गांधी रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते. गांधी विचारात मग्न असताना दोन गोऱ्या व्यक्ती तेथे आल्या. गांधी या भारतीय व्यक्तीशी त्या हुज्जत घालू लागल्या. पुढे  पीटरमॉरिसबर्ग स्टेशनला गाडी थांबली. या गांधी नावाच्या भारतीय व काळ्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देऊन सामानासहित  हाकलवून देण्यात आले. या सगळ्यामागे  कारण एकच भारतीय काळी व्यक्ती रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करते. त्या रात्री मोहनदास गांधी रेल्वेच्या वेटिंगरुममध्ये थांबले. त्यांच्या मनात विचारांनी थैमान घातले होते. तिथून उठून पुढच्या प्रवासाला निघण्याचे धाडस त्यांना होत नव्हते. मात्र या रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराला भेदून आशेची सूर्यकिरणे लवकरच येणार होती. या घटनेने एका नव्या व अद्भुत पर्वाला सुरुवात केली होती. हे पर्व म्हणजे मोहनदास या सामान्य व्यक्तीचा महात्मा गांधी होण्यापर्यंतचा असामान्य असा प्रवास. ही घटना म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा आणि मानवतेच्या मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या विचार आणि कृतीचा उगम होय.
      करमचंद आणि पुतळीबाई या जोडप्याच्या  पोटी 2 ऑक्टोबर 1869 रोजी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव ठेवले मोहनदास. लाखो मुलं रोज जन्माला येतात तसाच हा सुद्धा जन्माला आला पण स्वतःच्या विचार आणि कार्याने त्याने सगळ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले. लहानपणी खेळात, व्यायामात आणि अभ्यासात मागे असणारा हा मोहन. कुणाला माहीत होते हा पुढे जाऊन स्वातंत्र्याच्या विद्यापीठाचा  कुलगुरु बनेल. हा कुलगुरु  इतका प्रसिद्ध झाला की आज तो अनेकांच्या संशोधनाचा विषय बनला आहे. ' वैष्णव जन तो तेने कहियेजे ' हे भजन ऐकल्यावर  गांधीजींची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. त्यांनी केलेल्या 
नि: स्वार्थ सेवेचा अभिमान वाटून आपणही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशी प्रेरणा मिळते. प्रसिद्ध वैद्यानिक आईनस्टाईन गांधीजींच्या कार्याची थोरवी गाताना म्हणाले होते " आणखी काही पिढ्यानंतर लोकांचा विश्वास बसणार नाही की कधी कोणी असा माणूस झाला होता." खरंच सुखविलासी  जीवनाचा त्याग करून, रुबाबदार कोट बाजूला ठेवून सुती पंचा धारण करून गांधीजींनी स्वातंत्र्याची बुडणारी  नौका सुखरूप किनाऱ्याला आणून ठेवली. 
          4 सप्टेंबर 1888 या दिवशी महात्मा गांधी मुंबईहून इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी निघाले. इंग्लंडला जाण्यासाठी समुद्रमार्गे बोटीतून प्रवास. याला त्यांच्या जातपंचायतीचा  विरोध. समुद्रामार्गे प्रवास म्हणजे पाप ही 19 व्या शतकातल्या भारतीय समाजाची विचारसरणी. पंचायतीने गांधीजींना विलायतेला जाण्याचा निर्णय रद्द करण्यास सांगितले किंवा परत आल्यानंतर प्रायश्चित घेण्याचा पर्याय सुचवला. गांधीजींना हे काहीच मान्य नव्हते. ते शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ठरलेल्या दिवशी ते इंग्लंडला रवाना झाले. टिळक, सयाजीराव गायकवाड यासारखी बलाढ्य माणसे पंचायतीसमोर झुकली आणि परदेशातून परतल्यावर प्रायश्चित घेतले. पण बापू मात्र शेवटपर्यंत जातपंचायतीच्या या नियमाला बळी पडले नाहीत. 
            महात्मा गांधी इंग्लंडला असताना बॅरिस्टरच्या परीक्षेत दोनदा नापास झाले. त्यांनी आपल्या पिढीसारखे  एका वर्षात पाचशे सिनेमे पाहिले म्हणून ते परीक्षेत नापास झाले नव्हते तर त्यांच्या नापास होण्यासाठी कारण ठरले गाईड. गाईड न वापरल्यामुळे ते नापास झाले होते. त्यांनी पळवाटा वापरून पास होण्यापेक्षा नापास होणे पसंत केले. नापास होण्यामागे एक अजून कारण होतं ते म्हणजे अभ्यासक्रमातला एकच भाग ते कितीतरी दिवस अभ्यासत होते. आधुनिक कायद्याची उत्क्रांती ज्या रोमन लाॅमुळे झाली त्याचा त्यांनी सखोल अगदी मुळापर्यंत जाऊन अभ्यास केला होता. गुण, पदवी यापेक्षा विषयाची सखोलता समजून घेण्याला त्यांनी महत्त्व दिले होते. रोमन लाॅ हा त्यांची कायद्यावरची  पकड मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. वैयक्तिक खासगी वकीली जो माणूस यशस्वीरीत्या चालवू शकला नाही त्याने देशाची वकीली मात्र उत्तमरीत्या केली. त्यांच्या वकीलीचे फळ म्हणजे स्वातंत्र्य जे आज आपण चाखतोय . 
            गांधीजी शिक्षण घेऊन भारतात परतले. भारतात त्यांनी वकीली सुरू केली. भारतात राजकोट, मुंबई येथे वकीलीत जम बसवण्यात यश येत नव्हते. एके दिवशी एक केस त्यांच्याकडे आली. केस होती चोरीची. ज्याच्यावर चोरीचा आळ होता त्याची बाजू गांधीजींच्या हाती. पण गांधीजींना  हे माहीत नव्हते की त्यांचा अशीलच चोर आहे. ते त्याच्या बाजूने लढत होते. पण एकेदिवशी गांधीजींना कळले की ही व्यक्ती चुकीची आहे. त्यांनी त्याच दिवशी न्यायालयात सर्वांसमोर माफी मागितली. आपली चूक कबूल केली आणि त्या इसमाला शिक्षा करण्याची विनंती न्यायालयाला केली. असे होते बापू. सत्याला नेहमी प्रायोरिटी देणारा हा माणूस. जोपर्यंत जगला तोपर्यंत सत्याची साथ कधीच सोडली नाही.     
       दक्षिण आफ्रिकेतल्या 21 वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी अनेक सुधारणा तेथे घडवून आणल्या. अफ्रिकेतल्या भारतीय नागरिकांशी अन्यायकारक वागणूक व शोषण तसेच भेदभाव करणाऱ्या कायद्याविरुद्ध लढा उभारला. 1908 मध्ये गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात जोहान्सबर्गच्या हमिदिया मशिद येथून केली. अखेर 1914 ला आफ्रिकन सरकारने वर्णभेदी पंजीकरण कायदा रद्द केला. 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांचा भारताच्या सामजिक, आर्थिक आणि राजकीय चळवळीशी प्रत्यक्ष संबंध आला. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग इत्यादी अनेक मार्गांनी त्यांनी इंग्रजांचे धाबे दणाणून टाकले. सत्याग्रह आणि अहिंसा या शब्दांचा खरा अर्थ कुणाला कळला असेल तर तो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाच. इंग्रजी लेखक जाॅन रस्कीन यांच्या लिखाणाचा गांधीजींवर विशेष प्रभाव होता. या लेखकाच्या 'अन टू धिस लास्ट' या पुस्तकाचा गुजराती भाषेत अनुवाद गांधीजींनी केला होता. त्याचे नाव 'सर्वोद्यय'. सर्वोद्यय समाज या संकल्पनेतून गांधीजींनी आदर्श ग्रामराज्याची रुपरेषा निर्धारित करुन वर्गविहीन, जातीविहीन, शोषणमुक्त समाजाची स्थापना करण्याचा  प्रयत्न केला. आज जगभर सत्याग्रहाचे प्रयोग होताना दिसत आहेत. बट्रेंड रसेल, मार्टिन ल्यूथर किंग, डॅनिलो डाल्सी, नेल्सन मंडेला अशा अनेक नेत्यांनी सत्याग्रहाचा वापर करुन आपल्या देशाला सुखाचे दिवस दाखविले.
      संयुक्त राष्ट्र संघटनेकडून  2007 पासून 2 ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिन म्हणून पाळला जाईल असे घोषित करण्यात आले. जो माणूस अहिंसेचे तत्त्व जपण्यासाठी आयुष्यभर लढला त्याचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून सारे जग साजरा करेल. एकशे एकावन्न वर्षानंतरही भारतमातेचा  हा पुत्र जगाच्या स्मरणात आहे यातून त्यांच्या कार्याची लोकांच्या मनावरील छाप दिसून येते. बापू जे जगले ते इतरांसाठीच. म्हणून कवी मनमोहन म्हणतात, 
    " चंदनाचे खोड लाजे | हा झिजे त्याहूनही "
 गांधीजींना एकदा  विचारले होते तुमच्या आयुष्याचा संदेश कोणता आहे? त्यावर ते म्हणाले होते "माझे आयुष्यच माझ्यासाठी संदेश आहे". खरं आहे ते . गांधीजींचे संपूर्ण आयुष्य हे आजच्या  आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.........धन्यवाद
Previous article
Next article

196 Comments to

  1. खूप छान लिहिलंय...गांधीजींचे विचार आपल्या आयुष्याला कायमच मार्गदर्शक ठरतील... All the best...

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. महात्मा गांधी यांचे अनमोल विचार -
    चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.”

    “गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे.”

    “हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते”

    “काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.”
    Very good essay writing . All the best for the competition ����

    उत्तर द्याहटवा
  4. Outstanding👍
    गांधीजींचे विचार तू खूप चांगल्या शब्दात मांडलेस. 👌👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. साध्या सरळ व्यक्तीची किमया फारच महान आहे अन् आपलं लिखाण पण तेवढंच अप्रतिम आहे 👌💐

    उत्तर द्याहटवा
  6. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान आणि अर्थपूर्ण निबंध आहे👌

    उत्तर द्याहटवा
  8. Khup chan essay lihla ahe mhathma gandhin baddal khup chaan vichr mandle ahet tumi ekdam arthpurn essay ahe 👌👌👌👌👍👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  9. Very good . And very well written about mahatma gandhi.

    उत्तर द्याहटवा
  10. Good essay about mahatma gandhi. His work done for india. ��

    उत्तर द्याहटवा
  11. Is a very nice essay which you have wrote..All the best..

    उत्तर द्याहटवा
  12. अतिशय उत्कृष्ट लेखणी तुझ्या प्रयत्नांना यश येऊन दे खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  13. Very impressive essay ,keep growing & all the very best

    उत्तर द्याहटवा
  14. उत्तम शब्द रचना आणि मांडणी👌👌

    उत्तर द्याहटवा
  15. Keep it up dear.. very good ❤outstanding mindblowing wordings☺

    उत्तर द्याहटवा
  16. उत्तम शब्द रचना आणि मांडणी👌👌असाच चांगला अभ्यास करून आमचे नाव मोठे कर

    उत्तर द्याहटवा
  17. उत्तम शब्द रचना आणि मांडणी👌👌असाच चांगला अभ्यास कर .मोठी हो आणि एक दिवस आमचे नाव असेच चांगल्या गोष्टी करून मोठे कर.

    उत्तर द्याहटवा
  18. Khup chan .....keep it up....👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  19. उत्तम शब्द रचना आणि मांडणी👌👌

    उत्तर द्याहटवा
  20. खूप सुंदर लिखाण झाले आहे. खूप खूप शुभेच्छा....💐

    उत्तर द्याहटवा
  21. अतिशय उत्कृष्ट लेखणी तुझ्या प्रयत्नांना यश येऊन दे खूप खूप शुभेच्छा.👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  22. अती सुंदर लिखाण 👍👌

    उत्तर द्याहटवा
  23. सुंदर लिखाण व्यवस्थित रीतसर अभ्यासपूर्ण मुद्देसुद मांडणी केली आहे

    उत्तर द्याहटवा
  24. बापुंबद्दल खूप छान विचार मांडले आहेत.
    All the best ��

    उत्तर द्याहटवा
  25. खूपच सुंदर लिखाण आहे अन् मांडणी पण उठावदार आहे

    उत्तर द्याहटवा
  26. अप्रतिम विचार आहेत गांधीजींचे�� तुम्हीही ते योग्यरीत्या मांडले आहेत. आता खरच त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे अस वाटत...��

    उत्तर द्याहटवा
  27. Bapujin badal che khup chan vichar apan kami shabdha madhe sader kelet....

    उत्तर द्याहटवा
  28. अती उत्तम लिखाण ����

    उत्तर द्याहटवा
  29. खूपच छान आणि सुंदर विचार मांडले आहेत आपण��������

    उत्तर द्याहटवा
  30. Baapujin badal che tumche vichar khup sunder ahet....ani khup kami shabdha madhe tumi mandlet.....��������

    उत्तर द्याहटवा
  31. Daynik shiv swaraja maharashtra yani khup changli sandhi tumala dili......ani tumi baapujin badal mahiti denayche vichar kelet...ani te khup changlya prakare mandlet tumi taiii....

    उत्तर द्याहटवा
  32. ताई तुमचे बापूजीन बदलचे खूप चांगले विचार आहेत.आणि या स्पर्धे मध्ये तुमि जिंकाल अशी देव लिंगेश्वर चरणी प्रार्थना करतो.

    उत्तर द्याहटवा
  33. अप्रतिम विचार आहेत तुमचे गांधीजींन बदल.

    उत्तर द्याहटवा
  34. खूप सुंदर विषयाची निवड प्रिया .

    उत्तर द्याहटवा
  35. गांधीजी बद्दल् अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे

    उत्तर द्याहटवा
  36. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  37. Khup sunder lekhni ahe tai......keep it up....��������

    उत्तर द्याहटवा
  38. बापूजी आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील. त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी मला हा निबंध वाचून कळल्या..Best of luck ����

    उत्तर द्याहटवा
  39. Mahatma Gandhiche he vichar sarvani ayushybhar lakshat thevave.

    उत्तर द्याहटवा
  40. बापूजी आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील. त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी मला हा निबंध वाचून कळल्या..Best of luck ....keep it up ����

    उत्तर द्याहटवा
  41. मस्त आहे आणि सूंदर विचार मांडलेस👌👌

    उत्तर द्याहटवा
  42. Khup chan priya beta....mi chabhi tai maja pathimba ahe ....tu j kahi karshil te changlech ahe..keep it up������������������������

    उत्तर द्याहटवा
  43. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  44. वा छान मांडलाय विषय

    उत्तर द्याहटवा
  45. खूप सुंदर आणि वैचारिक असा लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  46. Tai khup sundar lihilay tumhi .....��������

    उत्तर द्याहटवा
  47. AM
    खुप सुंदर असा निबंध लिहिलेला आहे. प्रत्येकाने वाचावा .....

    उत्तर द्याहटवा
  48. Khup Chan..... Gandhijin badel khup changle vichar ahet tai tumche

    उत्तर द्याहटवा
  49. अतिशय सुंदर निबंध आहे

    उत्तर द्याहटवा
  50. खूप छान , अप्रतिम ��

    उत्तर द्याहटवा
  51. खूपच छान विचार मांडले .उत्कृष्ट निबंध .

    उत्तर द्याहटवा
  52. सकारात्मक विश्लेषन केलेस खूप सुंदर असच लिहत रहा ..खूप छान विचार ...सर्वाना विनंती आहे जास्तीत जास्त share करा.. ����

    उत्तर द्याहटवा
  53. Khup sundar mandni keleli aahe . All the best 👍

    उत्तर द्याहटवा
  54. Khupach nice essay aahe...it's nice learning to everyone..

    उत्तर द्याहटवा
  55. खूप छान लिहिलंय ....अशीच नेहमी लिहीत रहा����

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads