स्पर्धक क्रमांक ००९२ : नेहा विजय जगदाळे सातारा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००९२ : नेहा विजय जगदाळे सातारा

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... नेहा विजय जगदाळे

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

नेहा विजय जगदाळे


निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज 

                     झाले बहु, होतील बहु;
                          परी यासम हा !
         या वर्णननानंतर डोळ्यासमोर उभी राहणारी प्रतिमा म्हणजेच स्वतंत्र स्वराज्याचे स्वप्नं साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. 
          छत्रपती शिवरायांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीय शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते. 
          शिवरायांचे बालपण राजमाता जिजाऊंच्या शिकवण आणि संस्कारांनी परिपूर्ण होते. शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण, न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार, नीतिमत्ता, घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा यात छत्रपती  शिवराय पारंगत होते. गुणांची उत्तम पारख असणाऱ्या शिवरायांकडे सुवर्णसंग्रहकता होती.            
          शिवरायांचा विवाह किशोरवयातच सईबाई यांच्याशी झाला. त्याकाळी परकीय सत्तांचा रयतेवर  होणारा अन्न्य, छळ, जुलूम मन हेलावून टाकणारा होता. परकीयांसाठी लढणारे आणि स्वतःचाच नाश ओढवून घेणारे आप्तस्वकीय पाहून जिजाऊंचे मन व्यथित होत असे. रयतेला या संकटातून वाचवण्याचा संकल्प जिजाऊंनी केला. त्याच संकल्पानुसार जिजाऊ शिवबांना घडवत होत्या. स्वतंत्र स्वराज्य स्थापनेचे स्वाभिमानी स्फुल्लिंग बालशिवाजींच्या मनात फुलवले ते जिजाऊंनीच. गुलामगिरीच्या सोनेरी साखळीत  आपल्या मुलाने स्वतःला जखडून घेऊ नये यासाठी जिजाऊ धडपडत होत्या.
          शिवरायांसमोरची परिस्थिती बिकट होती. त्याकाळी कर्तृत्ववान अशी काही मूठभर माणसे होती त्यांनी आपले सारे कर्तुत्व परक्या राजसत्तेला, सुलतानांना विकले होते. या परकीयांचे निष्ठावंत चाकर बनून ते स्वधर्मियांबरोबरच लढत असत. या  धुमश्चक्री सामान्यांचे अपरिमित हाल होत असत. हे पाहून शिवरायांना मनस्वी दुःख होत असे. म्हणूनच आऊसाहेबांच्या प्रेरणेने शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. 
          स्वराज्य स्थानेसाठी शिवरायांनी खेड्यापाड्यांतील मावळ्यांच्या मुलांतून आपले मित्र हेरले. त्यांना आपलेसे केले. राजांचे सवंगडी संख्येने थोडे पण त्यांची निष्ठा अढळ होती, निर्धार वज्रलेप होता. पुढे त्यांच्याच साथीने राजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज आणि मुघल सत्ता यांपासून रयतेचे रक्षण तसेच रयतेला गुलामगिरीतून मुक्त करणे हे स्वराज्य स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट शिवरायांनी सार्थ केले. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून १६४६ मध्ये महाराजांनी तोरणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला व त्यापुढील ३० वर्ष मन एकाग्र करून राजे अविरत कार्यरत राहिले. स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने सामोरे जाण्यात शिवराय यशस्वी झाले. 
          अफजलखानाचा वध, शायीस्ते खानाची बोटे कापणे या a यांसारख्या अनेक प्रसंगांतून शिवरायांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तिथून सुटका या बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने शिवराय सामोरे गेले. 
          स्वराज्यनिर्मिती आणि स्वराज्यकारभार सुरळीत पार पडला तो मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! हिंदू धर्माविषयी रास्त अभिमान असलेले राजे परधर्माचे द्वेष्टे  नव्हते, म्हणूनच स्वराज्य सेनेत हिंदूंप्रमानेच निष्ठावंत असे सर्व धर्माचे सेवक, मावळे होते. प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले. शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी  प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, मुरारबाजी या शूरवीरांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. 
          इसवी सन १६७४  मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला स्वराज्यनिष्ठ राजा प्राप्त झाला होता. त्यानंतर राज्यकारभार सुरळीत होण्यासाठी  छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा, विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' याचा प्रत्यय शिवरायांनी जनतेला दिला.                                                 
                  शिवरायांचे आठववे रूप,
                  शिवरायांचा  आठवावा प्रताप !
         असा संदेश देणाऱ्या समर्थ रामदासस्वामींनी छत्रपतींचा  'श्रीमान योगी' असा सार्थ उल्लेख केला आहे. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना 'जाणता राजा' हा खिताब बहाल केला. सुमारे साडे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेला खर्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. अशा या शूर नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर मावळली. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि यानंतरही अनेक राजे उदयाला आले, परंतु आजही प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष स्वराज्यानिष्ट शिवराय स्वतःच्या कर्तुत्वाने आणि परक्रमाने छत्रपती म्हणून अनंत काळासाठी अजरामर आहेत. अश्या या शिवकल्याण जाणता राजाला त्रिवार अभिवादन! 
   निश्र्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारु ।
   अखंड स्थितिचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।।
   नरपती गजपती । गडपती भूपती जळपती ।
   पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ।।
   यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
   पुण्यवंत नीतवंत । जाणता राजा ।।
   आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
   सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ।।
   धीर उधार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
   सावधपणे नृपवर । तुच्छ केले ।।
   देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
   हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।।
   या भुमंडलेचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
   महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करणे ।।
   कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला ।
   कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याणराजा ।।
Previous article
Next article

65 Comments to

  1. खूप खूप सुंदर ✨💯 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर 💯🙌🏻
    जय भवानी जय शिवाजी 🚩

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर लेख आणि माहिती पण छान आहे 💫❤

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान ❤️ जय शिवराय जय शंभुराजे

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान
    जय शिवराय जय शंभुराजे

    उत्तर द्याहटवा
  6. खूप भारी लिहिलंय ❤️❤️

    उत्तर द्याहटवा
  7. अप्रतीम लेख ❤❤
    जय शिवराय 🚩🔥

    उत्तर द्याहटवा
  8. खूप मस्त (जय भवानी जय शिवाजी ����)

    उत्तर द्याहटवा
  9. खरच खूप छान लेख आहे.💫🥰
    जय शिवराय 🚩🚩

    उत्तर द्याहटवा
  10. खूप मस्त (खूप छान वाटले..!!)
    जय भवानी जय शिवाजी!! 🙏

    उत्तर द्याहटवा
  11. अतिशय सुंदर🔥
    जय भवानी जय शिवाजी🚩

    उत्तर द्याहटवा
  12. अप्रतिम👌
    जय जिजाऊ जय शिवराय......

    उत्तर द्याहटवा
  13. खुप सुंदर असा निबंध लिहिलेला आहे. प्रत्येकाने वाचावा शिवरायांचं प्रताप त्यांची कामगिरी उल्लेखनीय अश्या शब्दांत मांडली आहे ,असा एक आदर्श निर्माण करणारा निबंध आपण लिहिला आहे . प्रत्येकाला वाचायला लावणारा हा तुमचा निबंध खूप आवडला..
    उत्कृष्ट मांडणी ...अप्रतिम...

    उत्तर द्याहटवा
  14. खूपच छान निबंध तयार केला आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    उत्तर द्याहटवा
  15. अप्रतिम खरच खूप छान उत्तम शब्दयोजना उत्तम वर्णनात शिवराय मांडावं हे खरच कठीण आहे आणि ते तू उत्तम रित्या केलंस

    उत्तर द्याहटवा
  16. खूपच छान..सुंदर आणि उत्कृष्ट

    उत्तर द्याहटवा
  17. खूपच सुंदर निबंध लिहिला आहे

    उत्तर द्याहटवा
  18. अतिशय सुरेख आणि समर्पक शब्दरचना

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads