स्पर्धक क्रमांक ००१४ : प्रमोद किरण जाधव रायगड - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००१४ : प्रमोद किरण जाधव रायगड

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... प्रमोद किरण जाधव

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी


तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

प्रमोद किरण जाधव


निबंधाचा विषय : पर्यावरणाचे महत्व


"जाग जाग जाग माणसा

उभारूनी जंगले सिमेंटची

वनसंपदा केलीस खालसा.."

      एकविसाव्या शतकात पदार्पण करताना वनसंपदेचा ऱ्हास आणि जागतिक तापमान वाढीची समस्या गंभीर रूप धारण करून अखिल मानवजाती समोर एक गंभीर प्रश्न चिन्ह घेऊन समोर आली आहे .आणि एक वाटचाल सुरू झाल्यासारखे भासते आहे की,वाटचाल विकासाकडे की जीवसृष्टीच्या विनाशाकडे?

उजाड माळरानावरही बदलत्या ऋतूंनुसार निसर्गचक्राप्रमाणे बदलते जीवन मनमोहक, अवर्णनीय निसर्ग, गवताचे साह आणि त्यावरून चालतानाचा आनंद काही औरच असतो. विविध वनस्पती, मनमोहक रानफुले, दिसताना पडीक दिसणारी जमीन प्रत्यक्षात मात्र आपल्या उदरात असंख्य जीवजंतू सांभाळणारी धरणीमाताच आहे. विविध कीटक, फुलपाखरे, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, वैविध्यपूर्ण शेवाळे, खळखळून वाहणारे झरे, निळेशार पाणी, काळेजांभळे खडक आणि पांढर्या काळ्या ढगांनी पिंजलेल्या पांढऱ्या कापसाप्रमाणे आच्छादलेले भव्य आणि मनमोहक अवर्णनीय सुंदर आकाश.

या जमिनींवरही माणसाच्या मनमर्जी प्रमाणे विकासाच्या नावाखाली होत आहेत प्रकल्प आणि वसाहती. स्वतःच्या स्वार्थापायी माणूस नावाच्याक्रूर प्रवृत्तींनी केलेले अतिक्रमण ! शासकीय यंत्रणेला हे दिसून येत नाही याचे आश्चर्य वाटते. एकीकडे अनेक सामाजिक संस्था, एनजीओज, वनस्पती शास्त्रज्ञ या माळरान जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे खाणी (मायनिंग) च्या नावे डोंगर पठारांचे बेसुमार उत्खनन, जंगलतोड बिनदिक्कतपणे केली जात आहे. रस्तेरुंदीकरणाने शहरे गावे एकमेकांशी जोडली जाणे आवश्यक आहे. परंतु रुंदीकरणात मोठमोठे वृक्ष तोडले गेले. त्याजागी रुंदीकरणानंतर परत वृक्षारोपण झालेच नाही. त्यामुळे उष्णतामान वाढले प्रदूषण वाढले. पर्यावरणाला धोका निर्माण होऊन असंख्य सजीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ग्लोबल वॉर्मिंग जागतिक उष्णतामानावर विपरित परिणाम होत आहे. याचा विचार गांभीर्याने करणे आज तरी आवश्यक झाले आहे.


"सर्व काही असुनही फुकटचे

आजही प्राणवायू का घ्यावे विकतचे"

        संपूर्ण जग वैश्विक महामारी कोरोना सारख्या संकटाचा सामना करत असताना आजही ऑक्सिजन(प्राणवायू) चे महत्व अनन्यसाधारण झाले आहे.आणि मोफत प्राणवायू मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे वृक्षवल्ली ! मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होतानाचे मुख्य कारण आपल्या समोर दिसून येत आहे ते म्हणजे बेसुमार वृक्षांची कत्तल..आपण जंगली झाडे तोडली आणि वृक्षरोपणात फळझाडे लावली परिणामी फळझाडांवर येणारे रोग जंगली झाडे स्वतः वर घेत असत आता मात्र जंगली वृक्षांची संख्या कमी झाल्याने सरळमार्गी येणारे वृक्षांचे रोग फळझाडांवर येत आहेत.अशीच वृक्षांची कत्तल चालूच राहिली तर भविष्यातील एक दिवस असा असेल की,प्रत्येक माणसाला ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन फिरावे लागेल.

       जगा आणि जगू द्या ! या उक्तीची आज खरी गरज आहे. पर्यावरण वाचवा असे नुसते बोलुन चालणार नाही पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी शासनाने ठोस निर्णय घेवून धोरणात्मक बदल करावेत. या उजाड नव्हे तर खऱ्या अर्थाने समृद्ध सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि यांनी वेढलेली ही मोकळी पठारे असंख्य जीवजंतू वनस्पती, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी यांना मोकळा श्वास देणाऱ्या पठारांचे, डोंगरदऱ्यांचे पश्चिमघाटीचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करताना आहेत निसर्गावर करा,पर्यावरणाचे जतन करा या जनजागृतीची गरज आहे,नाहीतर भविष्यकाळ खूप बिकट आहे.

    लोकसंख्यावाढ,जागतिक तापमान वाढ , आणि  सध्याच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या वेगवेगळ्या येणाऱ्या रोगांचा सामना करण्यासाठी मानवी आरोग्य उत्तम व सुदृढ राहणे गरजेचे आहे,याकरिता प्रदूषणमुक्त पर्यावरणाची गरज आहे याकरिता मानवी मूल्यांच्या जोपासनेसोबत मानवी इतिकर्तव्यांचा विसर पाडून जमणार नाही. अन्यथा अखिल मानवजातीचे विकासाकडे उचलले जाणारे पाऊल ही वाट विनाशाकडे असेल!

Previous article
Next article

379 Comments to

  1. आपली कमेंट माझ्या साठी दिलेले आशीर्वाद आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लेख आहे असचं लिहत रहा प्रमोद

    उत्तर द्याहटवा
  3. आजच्या परिस्थितीवर केलेला निबंध खूप छान

    उत्तर द्याहटवा
  4. सर्वांचे खूप धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद मिळावे हीच विनंती

    उत्तर द्याहटवा
  5. Nice. Aajchi situation pahta sarv lokana he alane garjeche ahe ki pradushan mukt paryavaran aplya sarvansathi kiti garjeche ahe.

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर विचारांची मांडणी. तसेच अंमलबजावणी ही आवश्यक

    उत्तर द्याहटवा
  7. आजच्या परिस्थितीवर सुंदर विचारांची मांडणी केली आहे खूप छान

    उत्तर द्याहटवा
  8. Paryawarn aapn vachvile nahi tar aapatti yeun Jivshrushti sampnar he nakki

    उत्तर द्याहटवा
  9. Wadhte pradushn thambinyasathi tumcha lekh nibandh rashtriy patlivar Jane garjeche ahe

    उत्तर द्याहटवा
  10. लोकांची जनजागृती होणे गरजेच आहे

    उत्तर द्याहटवा
  11. सर सुंदर लेखणी अश्या लेखणीची आवश्यकता अहे

    उत्तर द्याहटवा
  12. पर्यावरण वाचले तर जीवसृष्टी वाचेल अनीथा विनाश अटळ आहे

    उत्तर द्याहटवा
  13. माणसाने निसर्गाचा वापर करुन विकास केला खरा. मात्र निसर्गाच्या या आती वापरामुळे आता माणसानवर प्रकोप होत आहें, असा आशय आपल्या लेखणीतून दिसत आहें. खुप छान.

    उत्तर द्याहटवा
  14. फक्त वृक्षारोपण च नाही तर वृक्षसंवर्धन देखील

    उत्तर द्याहटवा
  15. वायु प्रदूषण मुक्त वाहने वापर karaava लागेल

    उत्तर द्याहटवा
  16. खुप सुंदर लेख जाधव साहेब..जंगल तोडीबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे..

    उत्तर द्याहटवा
  17. पर्यावरण महत्व खूप सुंदर मांडलेत

    उत्तर द्याहटवा
  18. यांत्रिक शेती मध्ये मृदा संरक्षण पण महत्वाचे आहे

    उत्तर द्याहटवा
  19. एक माणूस एक झाड अशी संकल्पना राबविणे गरजेचे आहे

    उत्तर द्याहटवा
  20. एक नंबर.... आजच्या घडीला मानवाने मनावर घेणं खूप गरजेचं आहे

    उत्तर द्याहटवा
  21. सुंदर लेख प्रमोद.....👍 पर्यावरणाचा समतोल राखायला हवाच

    उत्तर द्याहटवा
  22. Construction kartana jar praklpa karita zade todli jat astil tar samajik bhan rakhun dupatine zade lawli pahije t

    उत्तर द्याहटवा
  23. Paryawarn ani jivsrushti he chakra ahe te wywasthit chalele pahije

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads