स्पर्धक क्रमांक ००७३ : गौरी अविनाश धायगुडे सातारा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००७३ : गौरी अविनाश धायगुडे सातारा

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... गौरी अविनाश धायगुडे

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

गौरी अविनाश धायगुडे


निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज

           स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तुत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेले स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज  हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात  यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत. शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते.
           शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाचे सर्व वर्ष ही नीतिमत्ता ,राज्यव्यवस्था, युद्धकला ,गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेले. कधीकधी आसपास राहणाऱ्या मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते. माता जिजाऊ रामायण महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवरायांना सांगत असत. शिवरायांचे लग्न किशोरवयात झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील सईबाई तिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना परकीय सत्तेचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली.
         आदिलशाही ,निजामशाही आणि मुघल सत्ता त्यांच्याविरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुदूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरण अत्यंत लहान वयात जिंकला. त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैयऻने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले. अफजलखान वध"शाहिस्तेखानाची बोटे कापणे"या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो. शत्रूला देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला.यव्यतिरिक्त पुरंदरचा तह दिल्लीतील औरंगजेब भेट तिथून सुटका ,या बिकट प्रसंगात सय्यम आणि ध्येयाने केलेला मुकाबला सर्व ज्ञान आहे
          शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि ती म्हणजे योग्य साथीदाराच्या सोबतीने! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूर वीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले‌.इ.स.१६७४ शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राज्य छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालविण्यासाठी शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ स्थापन केल्या स्वातंत्र्य स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली गड किल्ले सुरक्षा आणि पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.
            शिवाजी राजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरविण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होती. अखेर रायगडावर 3एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने छत्रपती म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.
Previous article
Next article

25 Comments to


  1. शिवरायांचे जीवनच एवढे भव्य आहे की, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसावर एक ग्रंथ निर्माण व्हावा
    लेखन अतिशय छान आहे

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम खूप छान लिहिलं आहेस

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads