स्पर्धक क्रमांक ०००२ : सिद्धी रवींद्र गोसावी सिंधुदुर्ग - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ०००२ : सिद्धी रवींद्र गोसावी सिंधुदुर्ग

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... सिद्धी रवींद्र गोसावी

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

सिद्धी रवींद्र गोसावी


निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज

      जे का रंजले गांजले। त्यासी 
      म्हणे जो आपुलें। तोचि साधु  
  ओळखावा,देव तेथेचि जाणावा।

         साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केले. जगाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांच्या बळावर घडवलेली एकमेव क्रांती असं या स्वराज्याच वर्णन करता येईल.सैनिकांच्या बळावर राज्य निर्माण करता येतात,सैनिकांच्या बळावर युद्धे जिंकता येतात. पण हातामध्ये नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये समशेरी देऊन या शेतकऱ्यांच्या बळावर राज्य निर्माण करता येत, हे जगाला ज्यांनी दाखवून दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही खरं तर तुम्हा आम्हाला प्रेरणा देतो.
          जगात जर सगळ्यात कुठल्या महापुरुषाचे सगळ्यात जास्त पुतळे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. महाराष्ट्रात नव्हे, राष्ट्रात नव्हे, तर जिथं जिथं मानवजात अस्तित्वात आहे, तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर होतो हि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर माणुस गेल्यानंतर त्याचे पुतळे जरुर होतात, पण स्वताच्या जिवंतपणी ज्यांची स्मारके उभी राहिली असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घ्याव लागेल.
            "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले".छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यामध्ये नेमक हे घडलं, महाराजांनी आधी करुन दाखवलं. एक आदर्श समोर उभा केला आणि मग माणंस तशी वागायला ,जगायला लागली. हे महाराजांच सगळ्यात मोठ वैशिष्ट्य आहे.खरं तर काही माणसे पराक्रमी असतात, तर काही माणसे चारित्र्यशील असतात.पण जो पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्यवान आहे असा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.शिवाजी महाराजांनी राज्य उभ केलं, पण स्वताच्या राज्याच नाव त्यांनी शिवराज्य नाय ठेवल, ठेवता आलं असत पण नाही ठेवल. नाव काय ठेवल "हिंदवी स्वराज्य" स्व:-माझं, या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य माझं राज्य, अरे मग माझं आहे ना मग मलाच लढल पाहिजे, मलाच झुझंल पाहिजे, मलाच मेल पाहिजे हि उर्मी इथल्या प्रत्येकात रुजली. कुणाला काही न देता आपल्या मातीसाठी बलिदान द्यायची परंपरा तिथून महाराष्ट्रात सुरू झाली. ती पुलवामामध्ये जे शहिद झाले ना त्यातले हि दोन महाराष्ट्रातलेच आहेत.महाराजांच वारसा आजही या देशातला प्रत्येक जवान तसाच पुढे नेतोय हे महत्त्वाचं.भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अमलात आणाव्यात हे महाराजांच्या यशाचं सर्वात मोठ सुत्र.
        ५० वर्षाच्या आयुष्य आहे महाराजांच, पण या ५० वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही कि ज्याच महाराजांनी नियोजन केल नाही. ते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याच नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज शिवाय  दुसरं नाव नाही.२० नोव्हेंबर १६५९ महाराजांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काडला. अफजलखानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनट लागली, पण दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल  १ वर्ष आधी नियोजन केलं होतं.  लाल महालात ज्याची बोटं छाटली तो नवाब शाहिस्तेखान, दिलेरखान,चित्तरखान पठान,कारतलपखान, इंग्रज , फ्रेंच, डच या साऱ्यांचा महाराजांनी आपल्या ५०वर्षाच्या कारकिर्दीत पराभव केला.म्हणूनच औरंगजेब सुध्दा महाराजांपुढे नतमस्तक झाला. आणि देवाला म्हणाला "खुदा मेहेरबानी तेरी दुश्मन दिलास तोही शिवाजी सारखा".अरे परकीयांना हि आदर वाटावा आणि पर धर्मीयांना सुध्दा आदर वाटावा असा राजा, राजा शिवछत्रपती. 
            काळाच्या भिंती ओलांडून आणि वेळांच्या सीमा ओलांडून हा राजा अव्ह्यातपणे पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यासारख्या असंख्याना प्रेरणा देतोय, ती प्रेरणा आपण घ्यावी. शिवरायांचे आचार विचार स्वतःमध्ये रुजवावा आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नावाचा मंत्र निर्माण व्हावा.
        “श्वाशात रोखुनी वादळ।
         डोळ्यात रोखली आग। 
देव आमचा छत्रपती एकटा हिंदू  वाघ। 
         हातात धरली तलवार। 
          छातीत भरले पोलाद। 
धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य आपले महाराज! "

86 Comments to

  1. अप्रतिम �� अतिसुंदर ❣️

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads